Tuesday, December 25, 2018

दोष कुणाचे पाहु नयेत

👏👏👏

*मंदिरात दोष कुणाचे पाहु नयेत आणि तेथे घडणा-या गोष्टींची चिकित्सा करू नये*

"कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले."

*प्रसादाचे ताट पाहून तेथील *ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले.*

तेंव्हा *तेथील गुरू* फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले. पुजा संपल्यावर, *"श्री गुरु दत्तात्रेयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले."*

त्यानंतर तीन दिवस त्यांना *श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही.* ते बैचेन झाले. *त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार!*

तेव्हा *गुरुंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.* त्यांच्या मुखातून *करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले.*

*_"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता"।।_*
*_शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता"।।_*

*करुणा ञिपदीचे* हे बोल ऐकून *श्री गुरु दत्ताञेय*
गुरूंच्या समोर उभे राहिले. तेव्हा गुरू म्हणाले, *"देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला"*

तेव्हा *श्री गुरु दत्ताञेयांनी* प्रश्न केला,

*इथे सत्ता कोणाची?*

ह्या प्रश्नावर गुरू म्हणाले, *"देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते"*

त्यावर *श्री गुरु दत्ताञेय* म्हणाले, अरे! *तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्या साठी मी ते ताट पाठविले होते. ते त्याने खाल्ले.*

*त्यात तुझे काय गेले?*

*त्यावर गुरूना आपली चूक कळली. त्याक्षणी श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.*

या *अध्यात्मिक मार्गात* प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची *देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.*

*एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली.*

*आपण तर सामान्य माणस* आपण जर राग आवरु शकलो नाही तर, *आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.*

*प्रबोध :*

*आपण ज्या मंदिरात जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी,* *_त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये. कारण तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते._*

*"मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते"*

*कोण कोणत्या हेतूने बोलतो, कोण कोणत्या हेतूने करतो ह्याची संपूर्ण जाण त्या भगवंताला असते. फक्त ती आपल्याला नसते.*

*आपला बघण्याचा दृष्टिकोन मायेचा अथवा मायावी असतो, तर त्या ईश्वराचा दृष्टीकोन हा सात्विक विशाल सत् मायेचा असतो.*

*ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते* तेथे सामान्य माणसाने फक्त *ईश्वरी इच्छेचा आदर करावा.*

*श्री गुरुदेव दत्त!*
*॥जय श्री सद्गुरू माऊली॥*
साभार: आंतरजालावरून

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

No comments:

अनगडवाणी