Friday, October 5, 2018

*मम तुजविण कोण...*

👏👏👏👏👏

*मम तुजविण कोण...*

करा एकचित्त अपुलेची मन
होऊ द्या सद्गुरूंचे नामस्मरण
अहंभाव जाऊ या विसरून
राग, लोभाचे होऊ द्या विस्मरण

एक असे नामाचे स्मरण
एक असे रागाचे विस्मरण
साधता दोन्ही एकची मन
लाभतील आपणास सद्गुरू चरण

सद्गुरूंचे लाभता चरण
मुक्ती मोक्ष चरणांत लिन
न दिसे या त्रिभुवनी कोण
आलो मी तुजशी शरण
सद्गुरू राया मम तुजविण कोण,
                  मम तुजविण कोण..
💐🙏💐👏💐🙏💐👏💐

*ॐ कार* म्हणजे काय?

👏👏👏

आपल्या श्री सद्गुरू माऊलीने म्हणजेच बाबानी *ॐ कारांची* फोड करून सांगताना संपूर्ण विश्वाची माहिती आपणा सगळ्यांसमोर प्रगट केली आहे.

*ॐ कार* म्हणजे काय?
*ॐ कार* म्हणजे सर्व त्रिभुवन व्यापून असणारे तत्व. त्रिभुवन म्हणजे तीन भुवने !! *ॐ कार* हे आकारी आहे. *ॐ कार* हे अक्षर आहे. *अक्षर* म्हणजेच *पंचमहाभूतें* हि *पंचमहाभूतें* - आप (जल), तेज, वायु, आकाश आणि पृथ्वी. 

(त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक. *[महाराष्ट्र राज्य शब्दकोश खंड चार]* )

आता महत्वाची गोष्ट ही की, *ओम* हे अक्षर *पूर्णत्व अक्षर* होत नाही व त्याचा उच्चारही करता येत नाही, जोपर्यंत त्यावर अर्ध चंद्राकृती कोर येत नाही, तसेच त्या अर्ध चंद्राकृती कोरीवर बिंदू जोडला जात नाही.

आता बाबा पुढे सांगतातच की, ही जी कोर आहे, ती कशाचे प्रतिक आहे? तर ती *मायाच* होय. या मायेमध्ये काय काय सामावलेले आहे? तर यामध्ये *आकार* आहे, *उकार* आहे आणि *मकार* देखील आहे.

हे *आकार, उकार, मकार* म्हणजेच क्रमाने *ब्रह्मा*, *विष्णू* आणि *महेश* होत.

जसे - *ब्रह्मा* मध्ये *आकार* आहे
*विष्णू* मध्ये *उकार* आहे तसे
*महेशा* मध्ये *मकार* आहेच.

पुढे बाबा म्हणतात, *पण त्यात बिंदू टाकल्यावर ॐ तयार झाला.* म्हणजेच बाबांच्या सांगण्यानुसार या पंचमहाभूतांमध्ये *माया* असून देखील उपयोगाची नाही, तर त्या ॐ ला पूर्णत्वता येण्यासाठी त्या अनंतांचा म्हणा, त्या परमेशाचा म्हणा तो बिंदू रूपी अंश टाकला गेला तरच तो ॐ कार पूर्ण होतो, पूर्णत्वास जातो.

(सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. *[विकिपीडिआ]*) हीच ती पंचमहाभूतें होत.)

ह्याचाच अर्थ असा की, "आपले हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे, परंतु ते पूर्णत्व नाही. कारण ते माया रहीत आहे, त्याशिवाय त्यामध्ये तो बिंदू देखील नाही."

तर ते पूर्णत्वास कधी जाईल? तर ज्यावेळेस ते मायेने आपल्या ताब्यात घेतले जाऊन, त्यामध्ये अनंतांचा अंश म्हणजेच बिंदू प्रवेश घेईल, त्यावेळीच ते ख-या अर्थाने पूर्णत्व होईल.

या *ॐ* लाच, बाबा म्हणतात, *आम्ही समर्थ म्हणतो. तेच ते निर्गुण, निराकार."* हे निर्गुण, निराकार फक्त मानवासाठी आकार घेतात आणि येथेच न थांबता, ते मानवाना परम् गतीला घेऊन जातात. या मानवी देहाला ते इहलोक सोडून परलोकात देखील घेऊन जातात. अणू, रेणु, परमाणू आणि त्याच्याही पलीकडे ते घेऊन जाऊ शकतात. परंतु, त्यासाठी मानव सुद्धा त्या गतीचा, त्या पद्धतीचा, त्या पायरीचा पाहिजे. अशा भक्ताला कोणतीही उणीव पडणार नाही, असे ते स्वतः सांगतात.

पण हे सगळे मिळवण्यासाठी मानवाला सत् मार्गाने जाणे, हे त्याचे आद्य कर्तव्य आहे ह्याची जाणीवही करून देतात.

🙏💐🙏💐👏💐🙏💐🙏

सकाळच्या पारी

🙏🍀🌸🌷🌻🌺👏🍀🙏

सकाळच्या पारी
ऊभा क्षणभरी
तुझीया मी द्वारी
तुझा सेवेकरी

मागतो हे मागणे
सेवा मजला देणे
नाम तुझे घेणे
हे लागतो मी देणे

🙏🍀🌺🌻🌷🌸🍀👏🙏

*समर्थ तेच, तेच सद्गुरू*

👏🙏👏

आजच्या प्रवचनातील विशेष बाब म्हणजे - बाबा म्हणतात,
*समर्थ तेच, तेच सद्गुरू*
भुलू नका, चुकू नका. सर्व काही करणारे, तेच समर्थ !
पुढे बाबा असेही म्हणतात," *पण (समर्थ) मी त्यातला नाहीच म्हणणार.*" हे आपण लक्षात घ्यावयास हवे.
पुढे बाबा म्हणतात, *समर्थ कसे असतात? तर स्थिर असतात.*

आता हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, *त्यांच्यात त्रिगुणात्मक नटविले, ते (त्रिगुण) - (समर्थ म्हणा, सद्गुरू म्हणा, किंवा अनंत म्हणा) हुकुमाशिवाय (या जगताचे कार्य) करीत नाही.*

आणि म्हणूनच बाबा म्हणतात, *करून अकर्ते असे ते सत् पद आहे.*

*हे नामस्मरण अत्यंत उच्च व श्रेष्ठ प्रतीचे आहे.* हे साधे आणि सुलभ देखील आहे. दुनियेच्या उचापती म्हणा, उठाठेवी म्हणा करण्यापेक्षा *नामस्मरण* करा.

बरे ते कसे करा, *तर एका तत्वावर दृढभाव ठेवून* म्हणजेच आपण आपल्या सद्गुरूंवर पुर्णत्वाने विश्वास ठेऊन, आपला जो मनामध्ये भाव आहे तो डळमळीत न ठेवता, अढळ भक्तीभावाने ते करा. इतकेच नव्हे तर *नामस्मरण* करताना आपल्या मायावी स्थितीचे विस्मरण होऊ द्या, मग ते घरदार का असेना?

*एका तत्वावर दृढभाव ठेवून, त्या गतीवर नामस्मरण करा.*

बाबा आपणा सर्वांस्वांना आठवण करून देताना म्हणतात, *आपण माया म्हणजे परब्रह्म मानतो.* परंतु हे खरे नाही. बाबा विचारणा करतात, *जर स्थूल आपले नाही,  तर माया आपली कशी म्हणावी?*

पण पुढे बाबा असेही म्हणतात, *माया रहीत तिन्ही जगाचा (स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोक) स्वामी अर्थात भगवंतही नाही.* हे असे का म्हणतात बाबा? कारण, भगवंत म्हणा किंवा सत् म्हणा यांची जी माया आहे, ती माया कोणती? तर ती *सत माया*

बाबांनीच म्हटल्याप्रमाणे, माया ही दोन प्रकारची असते - एक म्हणजे *सत माया* आणि दुसरी *असत माया.* म्हणून सद्गुरूंची म्हणा, भगवंताची म्हणा जी माया असते, ती सत माया.

*माया* मग ती कोणतीही असो. ती सताच्या चरणांची दास आहे.

संत म्हणतात, *एक तत्व नाम, दृढ: धरी मना ।*

*नामस्मरण कोठेही करा* नामस्मरणाला स्थळकाळाचे बंधन नाही.

👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

वृत्ती शुद्ध असेल तर....

💐👏💐

वृत्ती शुद्ध असेल तर
मन स्थिर राहिल
वृत्ती निर्भीड असेल तर
मनावर ताबा राहिल
वृत्ती शुद्ध असेल तर
कानानेही शुद्ध ऐकाल
वृत्ती शुद्ध असेल तर
मन शुद्ध राहिल.

वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.

मन सूक्ष्माला सोडून नाही आणि सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. 

*वृत्ती त्रिकुटाच्या अधिन असते. वृत्ती शुद्ध असली तरच त्रिकुटी स्थिर राहते. त्रिकुटी स्थिर झाली तरच मन स्थिर होते आणि ज्यावेळेस मन स्थिर होते, तेव्हाच आपण आपल्या श्री सद्गुरू माऊलींना म्हणजेच भगवंताला पाहू शकतो.*

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

अनगडवाणी