Friday, November 26, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला).....5


म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नाश / नि:प्पात kकरता आला. या सर्वस्वांचे मुळ कोणते तर भक्ती ! भक्तीपुढे अघोर तप:श्चर्या कुचकामी आहे. परंतू आजच्या कलियुगी मानवाना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही. तप:श्चर्या करायला हल्लीच्या कलीयुगात मानवांकडे वेळ आहे का? तपस्या करायची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामानसात रहा अन जो काही उर्वरित वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा. अन मला डोळे भरून पहा. अन हे दोघांचे एकदा समीकरण केलेत कि पाचवा प्रणव प्रगत होईल. अन एकदा का पाचवा प्रणव प्रगटला कि सर्वस्वाचा शोध तुम्ही घेवू शकता. सर्वस्वाचा अंत सत् भक्तीने लावला. भक्तीत अहंकार सापडणार नाही तर लीनत्व सापडेल. या राज मार्गामध्ये काय पाहिजे तर लीनत्व !
गुरुदेव कसे आहेत? तर अत्यंत लीन अन् अफाट शक्ती ! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळतात यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे. भक्ती अभक्तीत लीन होणार नाही अन् अभक्ती भक्तीत लीन होणार नाही. ज्या अखंड नामाचे आपण स्मरण करीत असतो त्याला नामस्मरण म्हणतात. त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्तीपुढे कोणाचे काही चालणार नाही. अन अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य या त्रिभुवनात कोणाकडे नाही. या नामाचा नाश हे तपस्वी देखील करू शकणार नाहीत. हे नाम देखील तपस्व्यांकडे होते, नाम् रहित ते नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले पण त्यांच्याकडे अहंकार होता. एक भक्ती अहंकार रहित तर दुसरी भक्ती अहंकारयुक्त ! ऋषी-मुनी, गुरुदेव सप्तऋषी यांची भक्ती तर अहंकार रहित ! तर इतरांची भक्ती अहंकार युक्त ! अहंकार षड् रिपू  रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत.
भक्तीमध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित् शक्ती आहे.
या एका नामावर त्रिभुवन तरलेले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करीत आहात. परंतू कलियुगी मानवाना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी मात्र वेळ मिळतो, परंतू नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. सेवेक-यानो ! किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे, दिवसातला तुमचा वेळ किती फुकट जातो.” 

जाते घडी हि अपुली साधा ! काय करता करा !!
आजचा दिवस गेला उद्याचा दिवस आला. आयुर्मान वाढते आहे, अन प्रत्येक मानवाच्या आयुर्मानाची मर्यादा किती आहे? मग आयुष्यात मिळवावयाचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमविता येत नाही. नामाच्या या महान चित् शक्तीनेच या अघोरांचा नाश करता आला. तीच चित् शक्ती तुम्हाला बहाल केली आहे. ध्यान करा, नामस्मरण करा अन तीच चित् शक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हीच ती भक्ती. सप्तऋषी देखील याच मार्गाने गेलेत. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सातच्या सान्निध्यात आहेत. आपणाला माहित आहे, कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकारणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंताची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाहीत. आपण जाणताच कि अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षीराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्य नाश केलेल्या ज्योतीना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षीराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येइना.
आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी? तर अघोरानी. परंतू शेवटी विजय कोणाचा तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे. वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात शैvaniवाणी तिला आत नेवून ठेविले होते. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तप:स्च्यर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार प्राप्त झाले होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलुन काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला. आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणे? तर अघोरांनी. परंतू शेवटी विजय कोणाचा ? तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे.

पुढे चालू..........5

अनगडवाणी