Thursday, July 1, 2010

जया अंगी नाही द्वैत, अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जानितसे

जया अंगी नाही द्वैत, अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जानितसे

द्वैत म्हणजे हेतू—अद्वैत म्हणजे हेतुरहित, अशी जी ज्योत असेल, ती आत्म स्थितीचा अनुभव घेउ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टी ज्या मानवाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेउ शकतो. अशी स्थिती जाणून घेउ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे पण हेतुरहित केव्हा होईल? हेतुरहित झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव घेउ शकणार नाही. पण मानव हेतुरहित केव्हा होउ शकतो? अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतुरहित होउ शकेल.

अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे. शत्रू आहे. रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्वपरीने सद्-गुरु चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही. मानवावर अनेक प्रसंग येत असतात. परमेश्वराने,अनंतानी मानवाला शक्ती दिलेली आहे. ही शक्ती सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाहीत असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर सद्गुरु चरणात, सत् चरणात लय असेल तर् सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवितात. सद्गुगुरून्च्या ठिकाणी ज्योतीने सर्वस्व वाहने आवश्यक आहे. मन बाकी ठेउन जर सद्गुरु चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे. एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंमध्ये तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, "सता ! आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. माझ्याकडे अर्पण करण्यासारखे आत्ता काहीच उरले नाही. अनंत जर काही शिल्लक असेल तर ते तुम्हालाच माहित असेल."

मी रहित जे आहे ते अनंत. गुरुगीतेमध्ये महेशनी अंबेला सांगितले,


Mayur Tondwalkar

क्रोध हा मूर्खांचा तीव्र मनोविकार आहे. – वसिष्ठ मुनी

क्रोध हा मूर्खांचा तीव्र मनोविकार आहे. – वसिष्ठ मुनी



Mayur Tondwalkar

अनगडवाणी