Friday, November 26, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला).....5


म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नाश / नि:प्पात kकरता आला. या सर्वस्वांचे मुळ कोणते तर भक्ती ! भक्तीपुढे अघोर तप:श्चर्या कुचकामी आहे. परंतू आजच्या कलियुगी मानवाना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही. तप:श्चर्या करायला हल्लीच्या कलीयुगात मानवांकडे वेळ आहे का? तपस्या करायची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामानसात रहा अन जो काही उर्वरित वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा. अन मला डोळे भरून पहा. अन हे दोघांचे एकदा समीकरण केलेत कि पाचवा प्रणव प्रगत होईल. अन एकदा का पाचवा प्रणव प्रगटला कि सर्वस्वाचा शोध तुम्ही घेवू शकता. सर्वस्वाचा अंत सत् भक्तीने लावला. भक्तीत अहंकार सापडणार नाही तर लीनत्व सापडेल. या राज मार्गामध्ये काय पाहिजे तर लीनत्व !
गुरुदेव कसे आहेत? तर अत्यंत लीन अन् अफाट शक्ती ! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळतात यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे. भक्ती अभक्तीत लीन होणार नाही अन् अभक्ती भक्तीत लीन होणार नाही. ज्या अखंड नामाचे आपण स्मरण करीत असतो त्याला नामस्मरण म्हणतात. त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्तीपुढे कोणाचे काही चालणार नाही. अन अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य या त्रिभुवनात कोणाकडे नाही. या नामाचा नाश हे तपस्वी देखील करू शकणार नाहीत. हे नाम देखील तपस्व्यांकडे होते, नाम् रहित ते नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले पण त्यांच्याकडे अहंकार होता. एक भक्ती अहंकार रहित तर दुसरी भक्ती अहंकारयुक्त ! ऋषी-मुनी, गुरुदेव सप्तऋषी यांची भक्ती तर अहंकार रहित ! तर इतरांची भक्ती अहंकार युक्त ! अहंकार षड् रिपू  रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत.
भक्तीमध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित् शक्ती आहे.
या एका नामावर त्रिभुवन तरलेले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करीत आहात. परंतू कलियुगी मानवाना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी मात्र वेळ मिळतो, परंतू नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. सेवेक-यानो ! किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे, दिवसातला तुमचा वेळ किती फुकट जातो.” 

जाते घडी हि अपुली साधा ! काय करता करा !!
आजचा दिवस गेला उद्याचा दिवस आला. आयुर्मान वाढते आहे, अन प्रत्येक मानवाच्या आयुर्मानाची मर्यादा किती आहे? मग आयुष्यात मिळवावयाचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमविता येत नाही. नामाच्या या महान चित् शक्तीनेच या अघोरांचा नाश करता आला. तीच चित् शक्ती तुम्हाला बहाल केली आहे. ध्यान करा, नामस्मरण करा अन तीच चित् शक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हीच ती भक्ती. सप्तऋषी देखील याच मार्गाने गेलेत. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सातच्या सान्निध्यात आहेत. आपणाला माहित आहे, कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकारणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंताची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाहीत. आपण जाणताच कि अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षीराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्य नाश केलेल्या ज्योतीना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षीराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येइना.
आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी? तर अघोरानी. परंतू शेवटी विजय कोणाचा तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे. वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात शैvaniवाणी तिला आत नेवून ठेविले होते. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तप:स्च्यर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार प्राप्त झाले होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलुन काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला. आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणे? तर अघोरांनी. परंतू शेवटी विजय कोणाचा ? तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे.

पुढे चालू..........5

Wednesday, November 24, 2010

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नत मस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे कि मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती? असे ते गुरुदेव पितामह ! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ठ यातायात करीत होता. त्याकरिता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगीनींचा छळ करायला निघाला, ब्रह्मर्षी पद हे भक्तीचे पद ! अनन्तानी बहाल केलेले पद ! ब्रम्ह म्हणजे सर्व व्यापक आहे. ते ब्रह्म. अन अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट आणि गुरुदेवांची बरोबरी होवू शकेल का? अघोरानि कितीही सिद्धी मिळविली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र – मंत्र, ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ असेल, तरी देखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहे. भक्तीच्या पुढे त्याचे काही चालत नाही. चालणारहि नाही. भक्ती म्हणजे काय, एकच नामस्मरण ! अन सद्गुरू ध्यान ! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करता या दोघांचे समीकरण झाले तीच भक्ती !!

हि भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे कि त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र या बरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली भक्ती कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत. गेल्या तीस वर्षात जी काही कर्तव्ये या आसना कडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो कि भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महा बलाढय चालत नसे. ह्या अघोरणी सर्व काही प्राप्त करून घेतले होते. तरीदेखील तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ती कि अघोर तप:श्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ. एकाच नामाच्या जोरावर चालणारी हि भक्ती ! अघोरांकडे मात्र अनेक त-हा, मंत्र-तंत्र, अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे? तर सताचे !


पुढे चालू..........

Friday, November 5, 2010

MAYUR TONDWALKAR: भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स...

MAYUR TONDWALKAR: भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स...: " Normal 0 false false false EN-US X-NONE X-NONE ..."

भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का?


भक्तीचे  स्वरुप - पुढे चालू .....
जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पाहायचे आहे, काय मिळवावयाचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता? तर भक्ती!! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे? भक्तीने !! आपल्याला काट्या कुटयातून जायचे नाही, गिरिकनदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राजमार्गाने वाटचाल करायची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपले इप्सित ठिकाणी पोहचणार. अघोरांची निर्मिती केली हि सतानेच आणि नाशहि सतच करणार आणि सतानेच तो केला आहे याबद्दल शंका नाही.
एवढी २५ अवतार कार्ये झाली पण ओमकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला. भक्तीचा नाश झाला नाही, तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ती, अहंकारी भक्ती, दुष्ठ बुद्धीने वागण्याची त-हा, मत्सर,द्वेष, याचा नाश झाला. आपल्याला माहीतच आहे, कोपिस्ठ विश्वामित्र कसा होता? गुरुदेवांचे नाव घेतल्यावर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिस्ठ? संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत, कधी-कधी आम्ही चिडतो, परंतू ते चिडत नाहीत. आम्ही त्यांना सांगितले, या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यानीही ते मान्य केले. ते सांगतात सता !! आम्ही त्या युगात पाळले, परंतू आता मीही पाळणार नाही. ते कसे आहेत तर दयाशील, क्षमाशील, शीतल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात. ब्रम्हरशी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात, असे ते पद आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात.
पुढे चालू..........

Wednesday, November 3, 2010

Greetings !!!

Dear Viewers,





Shubh Deepawali to you and your family.


From:
Mayur Tondwalkar & Family.

अनगडवाणी