Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Wednesday, August 21, 2019

बुलबुल

झावळीवर बसली, बुलबुलांची जोडी
कावळा करु लागला, त्यातच लाडीगोडी
त्या जोडीला ही, लाडीगोडी कांही रुचेना
कावळ्याच्या गोडीगुलाबीला, ती जोडी काही फसेना

बुलबुलांची जोडी,
कावळ्याची लाडीगोडी,
दूर दूर जाई जोडी
थोडी थोडी थोडी थोडी......

Wednesday, April 24, 2013

नराधम...........!!!


नराधमांना नसे जात,
नराधमांना नसे पात,
नराधमांना नसे वय,
नराधमांना नसे भय,
नराधमांना नसे कामधाम,
बलात्कार करण्यावाचून दुसरे काम,
नराधमांची एकच मानसिकता,
बलात्कार करणे हीच अगतिकता,
माता न म्हणती, भगिनी न म्हणती,
उठती सुटती स्त्रियांच्या चरित्रावर घाला घालती,
अशा नराधमांना काय बरे करावे?
ह्यांना फाशीवर लटकवावे कि,
      भर चौकात गोळ्या घालून मारावे?
ह्यांचे अवयव कलम करावे कि,
      ह्यांना यमसदनी धाडावे ?
हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
    नका घेवू विषाची परीक्षा........!!!
..............................मयूर तोंडवळकर 

Wednesday, March 28, 2012

यश.......!!!

यश 

यश हे शेवटी यशच असत,
यशासारख दुसर काहीही नसत......!!

अपयश ही यशाची पहिली पायरी असत,
अपयशाच्या पायरीच अपयश रीचवायचं असत.....!!

अशा अनेक अपयशातून पुढे पुढे सरकायच असत,
सरकत सरकत यश पदरात पाडून घ्यायचं असत.....!!

अपयशाने माघारी न फिरता, नव्या उमेदीन पुढे चालायचं असत,
प्रयत्नांती परमेश्वर न म्हणता, प्रयत्नांनी यशस्वी व्हायचं असत.....!!

अनेक अपयश पचवता पचवता, एक यश गाठायचं असत,
यश मिळवून झाल असता, जीवनाच सार्थक झाल अस म्हणायचं असत.....!!

यश हे शेवटी यशच असत,
यशासारख दुसर काहीही नसत......!!

मयुर तोंडवळकर .............9869704882

Thursday, February 9, 2012

मयूर टीका ........!!! काश्मीर कि कली ........!!!

काश्मीर की कली
आली आली थंडीची लाट आली,
काश्मीर की कली मुंबईत अवतरली.....(१)

थंडीच्या लाटेचा झाला रेकॉर्ड ब्रेक,
चला जाऊया, फिरुया आणि करुया मनालीचा ट्रेक......(२)

मनालीच कशाला हवी,
थंडीच आहे सर्वत्र हावी.......(३)

थंडीच्या या लाटेत सगळे झाले गप्प,
सार्-या जगातच सगळीकडे जीवन झाले ठप्प.......(४)

थंडीचा कहर.........!!!

चित्रात पाहतो आहे थंडीचा परिणाम,
सगळीकडेच असते खाली आलेले तपमान.......

तपमान खाली येताच गोठू लागते जनजीवन,
नाशिकात दवबिंदूंचे बर्फात होते अवतरण,

मुंबईत वाजू लागताच गारेगार थंडी,
आपोआपच बाहेर पडतात स्वेटर आणि बंडी,

सा-या जगभरच झाला थंडीचा कहर,
जनजीवन गेले गोठून, निसर्गाला येईना बहर.......!!!

मयुर तोंडवळकर ..............9869704882

Friday, December 23, 2011

घसरगुंडी

घसरगुंडी

मध्य रेल्वेची झाली घसरगुंडी,
त्यामुळे चाकरमान्यांची झाली कोंडीच कोंडी............

सकाळचा हा प्रहर नउचा,
सगल्यांची असते घाई गडबड
चाकरमानी ऑफिसात पोहचण्यासाठी
करू लागले जीवाची धडपड...........

धडपड करून सुद्धा,
नाही आले काही हाती,
पडायचा तो पडला लेट मार्क
सह्यांच्या वह्यान्वरती .................

मयुर तोंडवळकर...........9869704882

संवाद.........!!!

संवाद.........!!!
लिहिता नाही आले, वाचता नाही आले,
तरी वाटले असे काही तरी करून जावे,
पाहणा-यांच्या डोळ्यांचे,
पाहताच पारणे फिटावे........

हे चित्र नव्हे,
तर हि आहे भाषा अन्तरिची,
संवाद साधण्यासाठी
गरज नसे भाषेची..............

न बोलता, न लिहिता,
हि साधते संधान अंतराशी,
एक चित्र पाहोनी आपोआप,
संवाद घडतो इतरांशी.........

एक चित्र ते काय, एक चित्र ते काय,
डोळ्यांसमोर ते दिसू लागता,
भडभडा बोलू लागते,
भाषा सगळ्यांच्या मनीची..............
मयुर तोंडवळकर – 9869704882

अनगडवाणी