Thursday, July 29, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ४)

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ४)

-परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज-

 

सेवेक-यानो तो महाल पहायचा, अनुभवयाचा प्रयत्न करा. या नकली मायावी महालामध्ये काय सापडणार आहे. तुम्हीच सांगा, उद्या काही स्थित्यन्तरे घडली तर हा तुमचा नकली महाल टिकणार आहे का? जर त्या अनंत तत्वाने पंचमहाभूताना आदेश सोडले तर हा तुमचा नकली महाल किती टिकणार आहे? परंतु सद्गुरू दयाघन तत्व आहे, ते अनंताना सांगतात कि हे माझे सेवेकरी आहेत त्यांना पूर्णत्व संरक्षण देवून स्थित्यन्तरे घडवा आणि अनंत तत्व सद्गुरूंच्या प्रणवाला किंमत देवून त्याप्रमाणे स्थित्यन्तरे घडवतात, तुमच्या या मायावी नगरीत त्यांनी आपले स्थान प्रस्थापित करून त्या स्थानाला अद्वितीय कर्तव्याची दिशा दिलेली आहे. तुम्ही त्यांना सद्गुरू म्हणता. तेच सत् आहे. त्यांना मार्गदर्शक कोण आहे? तर अनंत तत्व! तेच सताला, सद्गुरुना कर्तव्याचे मार्गदर्शन करतात. अनंतान्शिवाय ह्या विश्वाचा कारभार चालला नाही, चालत नाही आणि चालणार नाही. अनंतान् खेरीज त्रिगुणांचा कारभार कोणीही हाकने शक्य नाही, त्या अनंतांशी सम्बधीत असणारे तत्व सत् आहे, सद्गुरू तत्व आहे.

          अशा त्या सद्गुरुंबद्दल आपल्या मनात सद्भावना निर्माण व्हावी हि इच्छा ! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार नाही, पाहता येणार नाही. खरोखरच येथील सर्व सेवेक-यांनी आपल्या सद्गुरुंकरीता मनामध्ये सद्भावना, सत्शुद्धपणा आणणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

सेवेक-याच्या मनाची भावना सत् शुध्द असेल तर त्याचे क्रियाकर्म सत्शुध्द असावयास पाहिजे. परंतु आपले सेवेकरी कसे आहेत, "वाटता जड भारी, मग आठवावा श्रीहरी." सद्गुरुंनी कर्तव्याकरिता प्रणव दिले तर वेळ नसतो, परंतु सद्गुरुंनी जर असे सांगितले कि "आता मला वेळ नाही, नंतर पाहू", तर सेवेक-यांची काय अवस्था होईल? परंतु सद्गुरू तत्व दयाघन आहे, त्यांना आपल्या सेवेक-यांकरिता माया आहे, ओढ आहे, आपुलकी आहे, ते त्याला प्रसंगातून मुक्त करतात. ते सदैव सेवेक-यांना सांगत असतात, मनात सद्भावना निर्माण कर. मन सद्गुरुमय बनविण्याच्या प्रयत्न कर आणि एकदा मनाने ते आकारले की त्यांची भावना सदैव सतच राहणार. पण जर एखाद्या सेवेक-याने स्वत:ला यापासून वंचित केले, गैरकृत्ये केलीत, तर विचार करा, तुम्हाला परत सद्गुरू सान्निध्य कसे मिळेल? मनाला आकार देणे, ही त्या सताची शक्ती आहे. तुम्हाला परत सान्निध्यात पाठविणे ही देखील त्या अनंतांची, सताची, सद्गुरुंचीच शक्ती आहे. म्हणून सेवेक-यानो आपल्या सद्गुरुंबद्दल आपल्या मनात सद्भावना जागृत ठेवा. मनाला परोपरीने सांगा की आपले सर्वस्व त्या अचलाप्रत ठेव तरच तुला पुढची गती प्राप्त होईल आणि एकदा गती मिळून सर्वस्व तुझ्यातच प्रगटले मग तुला कशाचीही ददात नाही. हे मना ! तू त्यांची, सद्गुरूंची जान घे. पूर्ण सत्मय हो. सद्गुरुमय हो. माझ्या सद्गुरुंशिवाय ह्या त्रिभुवनात वेगळे तत्व नाही. पण हे मन स्थिर करणे अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे. एकच तत्व त्याला स्थिर करू शकते, ते म्हणजे सत् किंवा सद्गुरू तत्व! पण हे कधी होईल ज्यावेळी सेवेकरी शारीरिक, मानसिक, संपूर्णपणे सताकरिता, सद्गुरुंकरिता ओथंबलेला असेल तेव्हाच ते होऊ शकेल. त्यावेळी त्याचे मन स्थिर होईल.


Mayur Tondwalkar

अनगडवाणी