Showing posts with label Religion. Show all posts
Showing posts with label Religion. Show all posts

Thursday, March 3, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-6)



आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मूनिन्बरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते. मग, या अशा आसनाच्या सेवेक-याची पटली कशी हवी? तर अत्यंत उच्च गतीची हवी. जरी आपण या कलीयुगात असले तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत, मग आपल्या विचारांची गती, विशालता उच्च हवी. ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, “आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथे या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे.” त्यांनीच पुढे संदेश दिले, “तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ”. तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो अशा मानवाची जार तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ट नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठविल का? आमचे संदेशच असे आहेत, “सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुला मला डोळे भरून पाहता येईल.” पवित्र आचरण नसेल, तर तू कसा बरे मला पाहू शकशील. मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा का मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”
असा दृढ:निश्चयी भक्त असेल, त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणव वेदही प्रगट होतो.
हे जे स्थान आहे, ते सत् पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही, ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत. तेथे ऋद्धी-सिद्धी नाही. तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तीचा मार्ग आहे – तो म्हणजे नामस्मरण ! ध्यान धारणा अन् मन सत् चरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ती केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे त्याच्या ठिकाणीच अनंतांचा वास आहे. त्या ठिकाणीच अष्ट सिद्धी देखील वास करू शकतात. ज्या ठिकाणी ओम्कारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथे काय शिल्लक आहे? ज्या ओम्कारांच्या ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ती हात जोडून उभ्या असतात असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेक-याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा ! पण आपण एवढेच म्हणायचे, “अनंता ! मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो.” आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थूल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथे जवळच असते पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जार पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणव वेद पाहिजे. ज्योत पाहता आली पाहिजे तिच्या बरोबर बोलणे करता आले पाहिजे. जे भक्त आहेत ते सत् सान्निध्यात आहेत. सूक्ष्म त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामीनी म्हटले आहे, “वाजे पावूल अपुले, म्हणे मागोती कोण आले?”
जेथे शंकराचे स्थान तेथे पिशाच्च त-हा असणार पण जेथे श्रीहरीचे स्थान तेथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो भक्त आहे.

समाप्त .....................

Tuesday, March 1, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-5)



समजा पाचवा प्रणव वेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरू दर्शन तरी मिळवा. शुभ्र प्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होवू शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत, मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थूल गेले. तुमच्या स्थूलत वास करणारे तत्व तुमच्या बरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सातचे सत् चरण तुम्ही पाहणार आहात, ते तत्व! मनाला जाणीव देवून मनाला हलविते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही जरी गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जान असते. या पंचमहाभूताच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताला सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जे स्थूल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत. तू आणि सत् एकच आहेत. कवचात तूही आहेस अन् कवचात सत्, मी देखील आहे. आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याच्या प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंच महाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देवून कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुनांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलत कसे प्रवेश करतात हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे का? मनाने बाजार गप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते, सेवेकरनीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्च्यर्या केली? आपल्या आसनाजवळ लाघव आहेत, लाघव झाल्यावर, त्रास होवू लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, “लाघव करण्यासाठी चैत्यन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या, चैत्यन्याला त्यांनीच निर्माण केले, आम्हालाही त्यांनीच निर्माण केले, अधिकार देखील त्यानीच बहाल केलेत अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच ! जन्माला त्यानीच पाठविले. तुमचे पालन पोषणही तेच करीत आहेत. दही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेतांना आपणही स्थिर आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असून देखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतीना आपली चूक काय झाली हे कळू नये तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे? उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्या कडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे. आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड येणे शुध्द शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरू कधीही शांत बसणार नाहीत पण ते बनवाबनवीचे अश्रू असतील तर लक्ष हे देणार नाहीत. क्रमश:पुढेचालू ........................(५)

Sunday, February 20, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)



पाचवा प्रणव वेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जार सद्गुरुमय बनला, मग वेगळे काय शिल्लक राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरू मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरू म्हणतात, त्याली मी माझ्या वेगळा का ठेवू? जे मन सातावेगले दुसरे काही पाहत नाही मग ते सातपासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या वेदाचा घाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत् चरण मिळवावयाचे असतील तर सत् चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कालीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, “सत् युगात जसा कस होता तसा कस आता घ्यावयाचा नाही.” पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसत उतरत नाहीत. फक्त म्हणतात, “सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही.” लक्षात घ्या सेवेक-यानो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, “मन ते मजपासोनी जाण”. मन माझ्यावेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणव वेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा. पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन अम्हप्रात लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो, मन सत् मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणव वेद पाहता येणार नाही. क्रमश: पुढे चालू ........................(४)

Wednesday, December 1, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात. शैवाणी तिला आत नेवून ठेवले. तिची भक्ती श्रेष्ट होती, तिची तप:स्च्यर्या खूप ! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलून काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू, या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला.
भक्तीचे अंग म्हणजे अखंड नाम ! महान चैतन्य शक्ती, चित् शक्ती म्हणजेच अखंड नाम. या नामाच्या जोरावर या अघोरांचा नाश केला. अनंताचे संदेश घेणे तर ते केवळ नामाच्याच सत्तेने. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ, भक्तीचे हे मूळ द्वार आहे. नामाशिवाय भक्तीचा दरवाजा उघडणे शक्य नाही. तेथे अहंकार उपयोगाचा नाही. लबाड्या उपयोगाच्या नाहीत. सद्गुरुना बनविणे उपयोगाचे नाही. या सर्वस्वांची नोंद होते. सद्गुरूंच्या नजरेतून हे सुटणे शक्य नाही. ज्याचे अखंड नाम तुम्ही घेता, ज्याचे स्मरण तुम्ही करता तेच अखंड नामाच्या गतीने तुमच्यातच असतात. तुमच्या वेगळे जर ते नाहीत तर त्यांना तुम्ही कसे बनवू शकाल? सद्गुरुना सेवेकरी काही कमी त्रास देतात का? पण सद्गुरुंनी त्रास असे कधी म्हटले आहे का? ते विचार करतात, अरे या मानवी सेवेक-याने किती जन्म घेतले आहेत अन आता जर तो पुन्हा अनाठायी गेला, तर कुठे व कसा भात्केल हे सांगता येत नाही. हि चिंता सद्गुरुना असते. किती श्रेष्ठत्व आहे, हे लक्ष्यात घ्या. ते क्षणीक पाहत नाहीत.
“तूरत् दान महापुण्यम” नाही. पुढे हि ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरुना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग सेवेकरी चुकला तर मग सेवेक-यांची कशी प्रगती होईल? म्हणून सद्गुरू मार्गदर्शन करीत असतात. भक्तीनेच सेवेकरी पुढे जावू शकेल. स्वत:ची प्रगती साधू शकेल. तप:स्च्यर्येने अनंतना प्राप्त करून घेवू म्हणाल तर कितीही जन्म घेवून देखील हे शक्य होणार नाही. अनंत दर्शन मिळणे कालत्रयी शक्य होणार नाही. परंतू भक्तीने मात्र तुम्ही त्यांना थांबवू शकाल. पाहू शकाल.


पुढे चालू..........6

Friday, November 26, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला).....5


म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नाश / नि:प्पात kकरता आला. या सर्वस्वांचे मुळ कोणते तर भक्ती ! भक्तीपुढे अघोर तप:श्चर्या कुचकामी आहे. परंतू आजच्या कलियुगी मानवाना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही. तप:श्चर्या करायला हल्लीच्या कलीयुगात मानवांकडे वेळ आहे का? तपस्या करायची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामानसात रहा अन जो काही उर्वरित वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा. अन मला डोळे भरून पहा. अन हे दोघांचे एकदा समीकरण केलेत कि पाचवा प्रणव प्रगत होईल. अन एकदा का पाचवा प्रणव प्रगटला कि सर्वस्वाचा शोध तुम्ही घेवू शकता. सर्वस्वाचा अंत सत् भक्तीने लावला. भक्तीत अहंकार सापडणार नाही तर लीनत्व सापडेल. या राज मार्गामध्ये काय पाहिजे तर लीनत्व !
गुरुदेव कसे आहेत? तर अत्यंत लीन अन् अफाट शक्ती ! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळतात यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे. भक्ती अभक्तीत लीन होणार नाही अन् अभक्ती भक्तीत लीन होणार नाही. ज्या अखंड नामाचे आपण स्मरण करीत असतो त्याला नामस्मरण म्हणतात. त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्तीपुढे कोणाचे काही चालणार नाही. अन अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य या त्रिभुवनात कोणाकडे नाही. या नामाचा नाश हे तपस्वी देखील करू शकणार नाहीत. हे नाम देखील तपस्व्यांकडे होते, नाम् रहित ते नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले पण त्यांच्याकडे अहंकार होता. एक भक्ती अहंकार रहित तर दुसरी भक्ती अहंकारयुक्त ! ऋषी-मुनी, गुरुदेव सप्तऋषी यांची भक्ती तर अहंकार रहित ! तर इतरांची भक्ती अहंकार युक्त ! अहंकार षड् रिपू  रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत.
भक्तीमध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित् शक्ती आहे.
या एका नामावर त्रिभुवन तरलेले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करीत आहात. परंतू कलियुगी मानवाना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी मात्र वेळ मिळतो, परंतू नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. सेवेक-यानो ! किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे, दिवसातला तुमचा वेळ किती फुकट जातो.” 

जाते घडी हि अपुली साधा ! काय करता करा !!
आजचा दिवस गेला उद्याचा दिवस आला. आयुर्मान वाढते आहे, अन प्रत्येक मानवाच्या आयुर्मानाची मर्यादा किती आहे? मग आयुष्यात मिळवावयाचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमविता येत नाही. नामाच्या या महान चित् शक्तीनेच या अघोरांचा नाश करता आला. तीच चित् शक्ती तुम्हाला बहाल केली आहे. ध्यान करा, नामस्मरण करा अन तीच चित् शक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हीच ती भक्ती. सप्तऋषी देखील याच मार्गाने गेलेत. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सातच्या सान्निध्यात आहेत. आपणाला माहित आहे, कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकारणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंताची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाहीत. आपण जाणताच कि अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षीराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्य नाश केलेल्या ज्योतीना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षीराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येइना.
आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी? तर अघोरानी. परंतू शेवटी विजय कोणाचा तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे. वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात शैvaniवाणी तिला आत नेवून ठेविले होते. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तप:स्च्यर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार प्राप्त झाले होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलुन काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला. आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणे? तर अघोरांनी. परंतू शेवटी विजय कोणाचा ? तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे.

पुढे चालू..........5

Wednesday, November 24, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नत मस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे कि मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती? असे ते गुरुदेव पितामह ! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ठ यातायात करीत होता. त्याकरिता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगीनींचा छळ करायला निघाला, ब्रह्मर्षी पद हे भक्तीचे पद ! अनन्तानी बहाल केलेले पद ! ब्रम्ह म्हणजे सर्व व्यापक आहे. ते ब्रह्म. अन अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट आणि गुरुदेवांची बरोबरी होवू शकेल का? अघोरानि कितीही सिद्धी मिळविली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र – मंत्र, ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ असेल, तरी देखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहे. भक्तीच्या पुढे त्याचे काही चालत नाही. चालणारहि नाही. भक्ती म्हणजे काय, एकच नामस्मरण ! अन सद्गुरू ध्यान ! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करता या दोघांचे समीकरण झाले तीच भक्ती !!

हि भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे कि त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र या बरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली भक्ती कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत. गेल्या तीस वर्षात जी काही कर्तव्ये या आसना कडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो कि भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महा बलाढय चालत नसे. ह्या अघोरणी सर्व काही प्राप्त करून घेतले होते. तरीदेखील तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ती कि अघोर तप:श्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ. एकाच नामाच्या जोरावर चालणारी हि भक्ती ! अघोरांकडे मात्र अनेक त-हा, मंत्र-तंत्र, अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे? तर सताचे !


पुढे चालू..........

Friday, November 5, 2010

भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का?


भक्तीचे  स्वरुप - पुढे चालू .....
जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पाहायचे आहे, काय मिळवावयाचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता? तर भक्ती!! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे? भक्तीने !! आपल्याला काट्या कुटयातून जायचे नाही, गिरिकनदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राजमार्गाने वाटचाल करायची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपले इप्सित ठिकाणी पोहचणार. अघोरांची निर्मिती केली हि सतानेच आणि नाशहि सतच करणार आणि सतानेच तो केला आहे याबद्दल शंका नाही.
एवढी २५ अवतार कार्ये झाली पण ओमकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला. भक्तीचा नाश झाला नाही, तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ती, अहंकारी भक्ती, दुष्ठ बुद्धीने वागण्याची त-हा, मत्सर,द्वेष, याचा नाश झाला. आपल्याला माहीतच आहे, कोपिस्ठ विश्वामित्र कसा होता? गुरुदेवांचे नाव घेतल्यावर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिस्ठ? संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत, कधी-कधी आम्ही चिडतो, परंतू ते चिडत नाहीत. आम्ही त्यांना सांगितले, या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यानीही ते मान्य केले. ते सांगतात सता !! आम्ही त्या युगात पाळले, परंतू आता मीही पाळणार नाही. ते कसे आहेत तर दयाशील, क्षमाशील, शीतल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात. ब्रम्हरशी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात, असे ते पद आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात.
पुढे चालू..........

Sunday, October 31, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतीन शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतू शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले, तर सताने ! जरी अघोराना वरद्हस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापीटा केला तरी बाजू सताचीच घेणार परंतू अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत् बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच ! सत् सताचीच बाजू घेणार. अघोरांची बाजू कधीही घेणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पाहतच आहात. अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करत आहोत.

कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो कि सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पहातच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करीत आहोत. स्थूलातून गेलेल्या या अघोरानी सुक्ष्माने मानवांवर कब्जा केला. द्वापर युगापासून जेवढे अघोर अवतार कार्यात मारले, ते सर्व अघोर सूक्ष्माने होते. सुक्ष्माने ते कार्य करीत होते. गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थुलाने केला त्यांचा नाश सुक्ष्माने करणे तुम्हा मानवाना शक्य होइल का? ज्यांच्यासाठी ओम् कारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्या करिता अनन्तानी ओमकाराना आदेश देवून जन्म घ्यायला भाग पाडले अन त्यांना कर्तव्याची दिशा दिली, मग अशा अघोरांच्या सुक्ष्माचा नाश तुम्ही कलीयुगी मानव करू शकता का? आपण पाहतोच कि आपल्याकडे काही मानवांची शुद्दीकरण स्थिती होत असताना काही बलाढय, तर काही महाबलाढय, ८५० पाय-या च्या अघोर ज्योतीचा देखील नाश केला आहे. सर्वस्व ज्या राक्षसांकडे होते, ऋद्धी – सिद्धी, तंत्र – मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धी करणातून नाश केला गेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहेच,

आन्धळ्याशी जग सारेची आंधळे
पुढे चालू..........

Great discounts on Hotels around the world at Hotels.com

Wednesday, October 20, 2010

ध्यान


ध्यान म्हणजे ‘आत’ जाण, अंतरमुख होण, अज्ञाताच्या प्रांतात शिरण, याचाच अर्थ या घडीला आपण, ‘बाहेर’ आहोत, बहि:र्मुख आहोत आणि तथाकथीत ज्ञाताच्या प्रांतात आहोत. खर सांगायचं तर ज्ञात आणि अज्ञाताबाबत आपले आकलन आपल्या मर्यादानुसार आहे. पण, प्राथमिक पातळीवर साधकाच्या दृष्टीने ‘आत’ आणि ‘बाहेर’ अशी त्याच्या जगाची विभागणी झाली आहे. आपण जोवर बहि:र्मुखतेणे, आत्मकेंद्रित होवून जीवन जगत असतो तोवर ‘बाहेर’चं जगच आपल्याला खर वाटत असत. आपण दृष्याला, स्थूलाला चिकटलेलो असतो. आपण जसजस अंतरमुख होवू लागतो तसतस आपल्याच अंतरंगाला विराट पण सूक्ष्म चेतनेची ओढ लागते. मग आतल जग आणि बाहेरच जग अशा दोन जगात आपलच मन संघर्ष उत्पन्न करत. साधकाला हळू हळू  अस वाटू लागत कि, आपल जे आतल जग आहे ते अधिक खर आहे. ते आपल्या कह्यातल आहे. आपल्याशी प्रतारणा न करणार आणि आपल्याला आधार देणार आहे. बाहेरच जग मात्र क्षणोक्षणी बदलत राहणार आहे.
काळाच्या कह्यात असल्याने आपली सत्ता न जुमाननारे आहे – ते सम्बधांवर आधारित आहे. प्रत्येकाला हे जग स्वत:च्या मनासारखे असावे आणि व्हावे, असे वाटते आणि त्या दृष्टीनेच तो आपल्या सम्बंधांची उभारणी करीत असतो. अशा हजारो ‘मी’ च्या सापेक्ष भावनानवर हे सम्बंध उत्पन्न होत असल्याने त्या  समबंधातही कायमच्या आधाराची हमी नाहि. त्यामुळे हे बाहेरचे जग साधकाला अनिश्चित – अस्थिर वाटते. पण जन्मापासून याच जगाची त्याला सवय असते. जे सुख मिळवायचे ते याच जगात, अशी त्याची स्वाभाविक भावना असते. अंत:र्यामीचे जग त्याला अपरिचित असते. आपल्या ख-या स्वरूपाबद्दल तो अनभिज्ञ असतो. तेव्हा अज्ञातात शिरणे म्हणजे आपल्या आताच शिरणे ! कारण आपण आपल्याला सर्वाधिक अज्ञात आहोत !!! म्हणून आपल्या अंतर्यामी शिरणे – तेथे स्थिर होत राहणे, हेच ते ध्यान.
पण हे आत शिरणे आणि स्थिर होणे साधत नाही. याच कारण आपल्या मनात सुरु असलेले दोन जगातले द्वंद्व आणि बाहेरच्या दृश्याकडे या मनाची उपजत असलेली धाव.
मुख्य म्हणजे या दोन जगातले सर्वात श्रेष्ठ आणि आपल जग कोणत्, याच मूल्यमापन झालेलं नाही. त्यामुळे उपासना करू तेव्हा पटकन आत जाने साधाव, अशी आपली अपेक्षा असते. पण उपासनेला बसल कि बाहेरच्या जगातले आघात, कल्लोळ, लहरी आतमध्ये आदळू लागतात. बाहेरचे आघात आतून आपल्याला अस्थिर, अशांत, अस्वस्थ करीत राहतात. शांत व्हावयाचा प्रयत्न केला कि भले बुरे विचार,
ब-या-वाइट आठवणी उफाळू पाहतात आणि मनाचा ताबा घेउ पाहतात. मग आत जाणच साधत नाही तर तेथे स्थिर होणे कसे साधावे?
आता भल्याबू-या आठवणी किंवा अवती-भवतीच्या माणसानच बरेवाइट वागणे सोडा हो, उपासनेत लहान-सहान गोष्टीनचाही अडथळा होत असतो. अगदी क्षुल्लक वाटना-या गोष्ठीही मनाचा ताबा घेतात.
घराला ओल आहे., घरात पाली झुरळे किटकानपासून ते उनदरापर्यंतच्या प्रान्यानचा मुक्त संचाराचा त्रास आहे. इतक्या क्षुल्लक गोष्टीही साधकाला अस्वस्थ करू शकतात. त्या क्षणी उपासनेत मनात या गोष्टी मध्येच डोकावतात आणि साधक त्याच दिशेने विचार किंवा चिंता करू लागतो. गोष्टी फार साध्या आहेत खरे. पण जोवर बाहेरच्या या गोष्टी त्रास देत असतात तोवर तुम्ही आतूनही स्थिर होवू शकत नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे. पण यावर उपाय काय ? उपाय एकच – उपासनाच वाढवत राहावी.
उपासानेत खंड पडता काम नये. उपासनाच उपासनेची गोडी निर्माण करील आणि टीकवीलहि. तेव्हा बाहेरच जग आघात करीत असले तरी आत शिरणे थांबवू नये. बाहेरच्या जगात व्यवहारानुसार गरजेच ते कराव. प्रयत्नही चिकाटीने करावेत. ऐहिक सुखही अवश्य मिळवाव पण आत जाने थांबवू नये. ते साधत गेल कि जाणवेल जग एकच आहे. आत आणि बाहेर अस काहीच नाही. जे आहे ते एकच आहे. सर्वव्याप्त आहे. त्याच्या असनेपनात आनंद आहेच आणि त्यात आपणही आहोत. या जानिवेतही आनंद आहे.
चैत्यन्य प्रभू.

अनगडवाणी