Tuesday, December 25, 2018

अवघाची संसार सुखाचा करीन

👏🙏👏

येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे.

*अवघाची संसार सुखाचा करीन*
*आनंदे भरीन तिन्ही लोक*
*जाईन गे माये तया पंढरपूरा*
*भेटेन माहेरा आपुलिया*
बाबांनी ह्या अगोदर संसार म्हणजे काय? हे सांगताना सांगितले आहेच की *संसार येणे नाम सगुणाचे सार*

*संत येणे स + अंत* जो कोणी सताचा येणे सद्गुरूंचा अंत लावण्या किंवा घेण्या गेला तो तेथेच शांत झाला. त्यांची *वाचा हे निमाली ते श्री गुरू*

सद्गुरूंचा अंत कुणीच लावू शकत नाही, लावणे शक्य नाही, लावणारही नाही, जोपर्यंत ते आपली जाण देऊ इच्छित नाही.

प्रपंचाबद्दलही असे म्हणता येईल की, पर + पंच येणे नाम प्रपंच.

*अहं ब्रह्मास्मी* मीच ब्रह्म आहे. हे निर्विवाद सत्य होय. पण कोणासाठी? कोण म्हणू शकतो असे? तर बाबाच ह्याची फोड करताना सांगतात, *आपल्या रूपाचे, आपली दृष्टी बंद करून जर कां आपण दर्शन घेण्यात यशस्वी झालो, म्हणजेच तो भक्त आपल्या स्वरूपात जातो, त्यावेळीच तो ब्रह्म होतो.*

बाबा पुढे किती साध्या आणि सोप्या शब्दात सांगतात, *आपल्या हृदयी जो अविनाशी आहे, त्याला ओळखले म्हणजेच संसार* *ज्यावेळी आपण आकाराची जाणीव घेऊ तेव्हाच निराकाराचा शोध लागेल.*

बाबा म्हणतात, *गरीब, श्रीमंत हे पूर्व संचित आहे* म्हणून भक्ती मार्गातील, त्यातही एकाच सद्गुरू माऊलींच्या सेवेक-यांमध्ये *गरीब, श्रीमंत* हा भेदभाव कुणी करू नये किंवा कुणी आणूही नये.

येथे *कृष्ण-सुदाम्याचे* उदाहरण बरेच काही सांगून जाते. ह्यापासून आपण बोध घेण्यास काहीच हरकत नाही.

तुकाराम महाराज म्हणतात, *सगुणाचे सार घेतल्यावर *सत् + चित् + आनंद = सच्छिदानंद* लांब नाही. म्हणजेच सताच्या चित्तात अर्थात सद्गुरू माऊलींच्या चिंतनात, सद्गुरू माऊलींच्या आठवणीत किंवा स्मरणात म्हणा आपण आपला अमूल्य असा वेळ जर कां कारणीभूत लावला तर तो *सच्छिदानंद* आपणास दूर नाही.

हे आहे, ते सर्व परमेश्वराचे आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत, ही जाण जर आपणास सदोदित असेल, तरच बाबा म्हणतात, *संसार सुखाचा होईल.*

*जी ज्योत मनाने सुस्वरूपी असेल तीच सद्गुरूंना पाहू शकेल.*

एकनाथ महाराज म्हणतात, *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल* जर आपण काया म्हणजे हे आपले पंचमहाभूतांचे शरीर हे जर कां पंढरपूर मानले, तर त्या शरीरात जो वास करून राहिलेला *आत्मा* आहे, तो म्हणजे विठ्ठल होय.* हे खरेच आहे, परंतु हा आत्मा रूपी विठ्ठल कोण? पंढरपूरात युगाने युगे उभा असलेला विठ्ठल की इतर कोणी?

 _तर तो हा विठ्ठल नव्हे. विठ्ठलांचा विठ्ठल जो आहे तो. तो कोण? तर ते म्हणजे ज्यांनी ह्या अगोदर 25 अवतार कार्ये नटविलीत ते, आपली श्री सद्गुरू माऊली, ज्यांनी ह्या कलियुगात 26 वे अवतार कार्य नुकतेच संपन्न केले, ते आपले बाबा._

बाबा म्हणतात, *तुकाराम* येणे *तुच का तो राम?*

बाबा पुढे म्हणतात, *ज्या ठिकाणी सत् आहे, त्या ठिकाणी भगवंत आहे.* आणि वेळ प्रसंगी अशा भक्ताचे संचितही ते स्थीर करतात. अशी कित्येक उदाहरणे बहुतेकानी *ह्याची देही, याची डोळा* प्रत्यक्षात अनुभवली आहेत.

शेवटी ती दयाघन श्री सद्गुरू माऊली समस्त भक्तगणांना आठवण करून देताना म्हणते, *जर भक्ती आपल्याकडून झाली नाही, तर जन्माला येऊन आपला उभा जन्म फुकट आहे.*

*तुम्ही या भवसागरी संसार करून, आणि करता करता तो तरून या भवसाग-याच्या पलीकडे चला.* _म्हणजेच त्या श्री सद्गुरू माऊलींच्या चरणी लीन होऊन, त्यांचे दर्शन मिळवून आयुष्याचे सार्थक साधा._

No comments:

अनगडवाणी