Friday, December 3, 2010

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

धन संपत्तीत देखील फरक आहे. एक सात्विक संपत्ती आणि एक अघोर संपत्ती. कष्ठ करून, कर्तव्य करून किंवा जी वडिलोपार्जीत प्राप्त झाली ती सत संपत्ती. परंतू इतरांना त्रास देवून, खोटे बोलून, विश्वासघात करून, प्राप्त झाली ती अघोर संपत्ती. सात्विक संपत्तीला विचार असतो. अघोर संपत्तीला विचार कोठला ? अघोर संपत्ती कमविणारे अघोर अविचाराने पाहणार. कितीही अघोर संपत्ती एकाद्याकडे असली तरी अंतिम त्याची अधोगतीच होणार. परंतू भक्ती मार्गाने जाणारे, सत संपत्तीचा संचय करणा-यांच्या ठायी मात्र शांती, समाधान आणि प्रगतीच असणार. सात्विक संपत्तीला पुरवणी असते. अघोर संपत्तीला पुरवणी नसते. अघोर संपत्ती ज्याच्याजवळ असते त्यांच्याजवळ समाधान कधीही नसते. परंतू सात्विक संपत्ती ज्या ठिकाणी असते तेथे सदैव समाधान असते. समाधान हीच खरी आपली लक्ष्मी आहे. भक्तीचे मूळ अंग म्हणजे समाधान! समाधानी वृत्तीच मानवाजवळ हवी.
ठेविले अनंते तैसेची राहावे ! चित्ती असू द्यावे समाधान !!
आपले सद्गुरू जे आपल्याला सांगत असतात त्यांची छानणी करणे, उजळणी करणे, प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जर सद्गुरुंनी सांगितलेली एखादी गोष्ठ लक्षात आली नाही तर समजावून सांगतील. परंतू तुम्ही भक्तीची चाकोरी सोडू नका. एक अखंड नाम हि महान चित् शक्ती आहे. भक्ती आणि तपोभूमी यांची तुलना होवू शकत नाही. या दोघांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ट आहे. सतयुगापासून ज्योतींना अदृश्य त-हेने सत सान्निध्य मिळवावयाचे आहे. प्रत्येक सेवेक-याने याकरिता मनाने अत्यंत शुद्ध राहणे आवश्यक आहे. नामस्मरणाच्या गतीने गेल्यानंतर अनंताना तुम्ही डोळे भरून पाहू शकाल.

समाप्त ..........

Wednesday, December 1, 2010

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात. शैवाणी तिला आत नेवून ठेवले. तिची भक्ती श्रेष्ट होती, तिची तप:स्च्यर्या खूप ! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलून काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू, या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला.
भक्तीचे अंग म्हणजे अखंड नाम ! महान चैतन्य शक्ती, चित् शक्ती म्हणजेच अखंड नाम. या नामाच्या जोरावर या अघोरांचा नाश केला. अनंताचे संदेश घेणे तर ते केवळ नामाच्याच सत्तेने. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ, भक्तीचे हे मूळ द्वार आहे. नामाशिवाय भक्तीचा दरवाजा उघडणे शक्य नाही. तेथे अहंकार उपयोगाचा नाही. लबाड्या उपयोगाच्या नाहीत. सद्गुरुना बनविणे उपयोगाचे नाही. या सर्वस्वांची नोंद होते. सद्गुरूंच्या नजरेतून हे सुटणे शक्य नाही. ज्याचे अखंड नाम तुम्ही घेता, ज्याचे स्मरण तुम्ही करता तेच अखंड नामाच्या गतीने तुमच्यातच असतात. तुमच्या वेगळे जर ते नाहीत तर त्यांना तुम्ही कसे बनवू शकाल? सद्गुरुना सेवेकरी काही कमी त्रास देतात का? पण सद्गुरुंनी त्रास असे कधी म्हटले आहे का? ते विचार करतात, अरे या मानवी सेवेक-याने किती जन्म घेतले आहेत अन आता जर तो पुन्हा अनाठायी गेला, तर कुठे व कसा भात्केल हे सांगता येत नाही. हि चिंता सद्गुरुना असते. किती श्रेष्ठत्व आहे, हे लक्ष्यात घ्या. ते क्षणीक पाहत नाहीत.
“तूरत् दान महापुण्यम” नाही. पुढे हि ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरुना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग सेवेकरी चुकला तर मग सेवेक-यांची कशी प्रगती होईल? म्हणून सद्गुरू मार्गदर्शन करीत असतात. भक्तीनेच सेवेकरी पुढे जावू शकेल. स्वत:ची प्रगती साधू शकेल. तप:स्च्यर्येने अनंतना प्राप्त करून घेवू म्हणाल तर कितीही जन्म घेवून देखील हे शक्य होणार नाही. अनंत दर्शन मिळणे कालत्रयी शक्य होणार नाही. परंतू भक्तीने मात्र तुम्ही त्यांना थांबवू शकाल. पाहू शकाल.


पुढे चालू..........6

अनगडवाणी