Thursday, July 22, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक २)

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक २)

शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास हा होणारच! काही शारीरिक त्रास झाला, काही प्रसंग ओढवला तरी देखील मन बेचैन होतेच! अशा वेळी मन शांत राहते का? मन बेचैन झाले कि शरीर बेचैन होते आणि शरीर बेचैन झाल्यावर मन देखील बेचैन होते. जर तू आपले मन दृढ श्रद्धेने सद्गुरु माऊलींच्या चरणांवर पूर्णत्व अर्पण केलेस तर सद्गुरु तुला अशा व्याधींपासून दूर ठेवतात आणि मन सद्गुरु चरणांवर अर्पण करताना काही हातचे राखून केलेस तर त्याची बेरीज वजाबाकी त्याच त-हेने होणार कि नाही? हे मना! तुझ्या ठिकाणी सद् गुरुन्बद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूनबद्दल, हे मना! तू मागे-पुढे का होतोस? आपणच आपल्या मनाला असा प्रश्न करावा. आपले जे सद्गुरू आहेत ते प्रत्यक्ष अनंत तत्वाशी, परम तत्वाशी व्यवहार करतात. त्या करिता हे मना! तू साशंक का असावे? सद्गुरूंच्या प्रणवाला अनंत किंमत देतात, साक्षात गुरुदेव पितामह (वशिष्ठ गुरुदेव) किंमत देतात, महान महान तत्वे किंमत देतात अशा ठिकाणी हे मना! तू का स्थिर होत नाहीस? माझ्या सद्गुरुनबद्दल तुझ्या मनात का आदरभाव निर्माण होत नाही? हे मना! तू ठाम, निष्काम गतीने का वाटचाल करीत नाहीस? महान महान तत्वे, ऋषी-मुनी ज्या माझ्या सद्गुरूंच्या चरणांवर लीन आहेत त्या सताच्या, सद्गुरूंच्या चरणांवर हे मना! तू का बरे लीन होत नाहीस?

    प्रारब्धाप्रमाणे, पुर्वसंचीतानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सान्निध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना! तू का बरे स्थिर होत नाहीस? मन म्हणते अरे! मला तू असा प्रश्न करतोस, पण तुझी कृती कशी आहे याचा तू विचार केलास का? तुझी क्रिया, कृती, कर्तव्य कोणत्या त-हेने चालू आहे याचा विचार तू केला आहेस का? आणि मग मलाच का बरे प्रश्न करतोस कि सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी मी का स्थिर होत नाही? तुझी क्रिया, कर्तव्य, कृती जर सद्भावनेने ओथंबलेली असेल तर मी का बरे तुझ्या सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर होणार नाही, का बरे माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी असणार नाहीत? म्हणूनच म्हटले आहे,


Mayur Tondwalkar

अनगडवाणी