Friday, November 22, 2019

कोहम्-भाग दोन

🙏🙏🙏

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज परिवार*

*कोहम्! मी कोण आहे?*

*तसे पाहिले तर मी कोणीही नाही. मी एक पंचमहाभूतांचा पुतळा होय.*

(*पंचमहाभूते म्हणजे काय?*
*पंचमहाभूतें म्हणजे आप (पाणी अथवा जल), तेज (अग्नी), वायु, आकाश आणि पृथ्वी ही पांच तत्वें होत.* या पांच तत्वांनी सजीव सृष्टी निर्माण झाली असे म्हणतात.

तसेच सांख्यदर्शन शास्त्रानुसार सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात.)

जर मी कोणीही नाही, पंचमहाभूतांचा एक पुतळा आहे, मग मी, "मी मी" असे कां बरे म्हणत असतो? मीपणा माझ्या मध्ये कां बरे येत असतो? कां बरे मी माझ्यातील परमात्म्याला विसरतो?

कुणी विचारतील, बरे, आता हा परमात्मा कोण? तो कुठे असतो? तो कोठे वास करतो? तो कुठे राहतो?

*परम् + आत्मा* येणे नाम परमात्मा. ही दोन शब्दांची व्याकरणातील संधी होय.

*प्रथम *आत्मा* म्हणजे काय? हे समजून घेऊ. 

आपल्या आत असणारी *मा* म्हणजे ज्योत, म्हणजेच त्या परमेशाचा अंश, ज्यावेळी आईच्या गर्भात हा पंचमहाभूतांचा पुतळा आकार घेत असतो, त्यावेळी तीन-चार मासाच्या कालावधीनंतर किंवा अवधीनंतर, त्यामध्ये हा अंश कधीतरी प्रवेश करता होतो आणि तद्नंतरच त्या मातेच्या गर्भामध्ये हालचाल, चलन-वलन होण्यास सुरुवात होत असते. याचाच अर्थ असा की तो पंचमहाभूतांचा पुतळा, हा पुतळा न राहता, त्यात सजीवता येते. अन्यथा तो एक मांसाचा गोळाच बनून राहतो, ज्याला अचेतन किंवा निर्जीव देह म्हणतात, ज्यामध्ये हालचाल दिसून येत नाही. ह्याउलट सजीव म्हणजेच जीवा सहीत किंवा चेतन देह असून, त्यामध्ये हालचाल दिसून येते.

परम् ह्याचा अर्थ अंतिम, सर्वोत्कृष्ट, मुख्य, उच्च इत्यादी, म्हणजेच आपल्या आत वास करून असणारी मा, येणे आत्मा हा त्या अंतिमाशी, मुख्याशी, उच्चाशी एकलय होतो, एकजीव होतो त्यावेळेस तो *परमात्मा* ह्या नावाने ओळखला जातो.

म्हणून त्या परमात्म्याला आपण कधी विसरायचे नसते. आपण जर त्या परमात्म्याला विसरलो नाही तर तो ही आपल्याला विसरणार नाही आणि ही सर्वस्वाची जाण ठेवून जर आपण वागलो तर आपल्यामध्ये मी पणा कधीच येणार नाही आणि मी पणाच जर आपल्यात आला नाही, तर तुझे माझे होणार नाही आणि त्यामुळें आपणांस आपल्या भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा होईल. 

मी मी राहणारच नसल्याने तो भगवत भक्त परमेश्वरात एकलय होऊन जाईल. त्या परमात्म्याशी तादाम्य होईल. द्वैत भावना नाहीशी होऊन, तेथे अद्वैत भावना येईल. अशावेळेस *कोहम्* म्हणजेच मी कोण हा प्रश्नच उपस्थित होणार नाही.

अनगड म्हणे, *कोहम्* कोहम् न राहता, तो *ओहम्* ओहम् येणे *ओंकार*मय होईल.

ओंकार हा 'अ'कार,'उ'कार व 'म'कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.@विकीपिडीया...अनगड

हे वर्ण संपूर्ण ब्रम्हांडात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णु व महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.@विकीपिडीया...अनगड

👏💐👏💐👏💐👏💐👏💐👏

अनगडवाणी