Friday, February 25, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-4)


पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-4)
पाचवा प्रणव वेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जार सद्गुरुमय बनला, मग वेगळे काय शिल्लक राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरू मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरू म्हणतात, त्याली मी माझ्या वेगळा का ठेवू? जे मन सातावेगले दुसरे काही पाहत नाही मग ते सातपासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या वेदाचा घाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत् चरण मिळवावयाचे असतील तर सत् चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कालीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, “सत् युगात जसा कस होता तसा कस आता घ्यावयाचा नाही.” पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसत उतरत नाहीत. फक्त म्हणतात, “सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही.” लक्षात घ्या सेवेक-यानो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, “मन ते मजपासोनी जाण”. मन माझ्यावेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणव वेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा. पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन अम्हप्रात लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो, मन सत् मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणव वेद पाहता येणार नाही. क्रमश: पुढे चालू ........................(४)

Sunday, February 20, 2011

MAYUR TONDWALKAR: पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)

MAYUR TONDWALKAR: पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)



पाचवा प्रणव वेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जार सद्गुरुमय बनला, मग वेगळे काय शिल्लक राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरू मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरू म्हणतात, त्याली मी माझ्या वेगळा का ठेवू? जे मन सातावेगले दुसरे काही पाहत नाही मग ते सातपासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या वेदाचा घाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत् चरण मिळवावयाचे असतील तर सत् चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कालीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, “सत् युगात जसा कस होता तसा कस आता घ्यावयाचा नाही.” पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसत उतरत नाहीत. फक्त म्हणतात, “सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही.” लक्षात घ्या सेवेक-यानो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, “मन ते मजपासोनी जाण”. मन माझ्यावेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणव वेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा. पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन अम्हप्रात लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो, मन सत् मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणव वेद पाहता येणार नाही. क्रमश: पुढे चालू ........................(४)

Saturday, February 19, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-2)



नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रह्मानन्दाप्रत घेवून गेला पाहिजे. त्या अनन्तांच्या कानापर्यंत त्या नामस्मरणाचा नाद पोहचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ओम् कारापर्यंत पोचली पाहिजे. लक्षात घ्या, ध्यान धारणेकरिता आसन आहे. अर्थात ध्यान धारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण करताना इकडे, तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना, नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार, म्हणून नामस्मरण करताना नाम अशा त-हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच काम नयेत. नेत्रासमोर केवळ सद्गुरुंचीच छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील, पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन् ते ध्यान ! दोघांची संयुक्तता साधली अन् त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहचतो. अशा त-हेने या चाकोरीतून एकदा का सेवेकरी ऊर्ध्वतेणे वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणव वेद प्रगत होणारच. पण पाचवा प्रणव वेद प्रगत होण्यासाठी सद्गुरू दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरू दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरू दर्शनानंतर सूक्ष्म गती ही पुढची पायरी.
पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होवून गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. लक्षात ठेवा, भक्तीमध्ये भेदभाव नाही कारण सर्वांठायी एकच तत्व वास करीत आहे. आपण पाहता महान महान ऋषी-मुनी होवून गेले. पण प्रत्येक जण आपापल्या पायरीप्रमाणे राहणार. संसार सांभाळून, कर्तव्य सांभाळून जो काही वेळ मिळेल त्या अवधीत नामस्मरण करणे हेच आपले आध्य कर्तव्य आहे. आजचे युग हे कलियुग आहे, येणेच संशय युग आहे. मन चलबिचल होते, द्विधा होते. लक्षात घ्या, तापते ते आपले मन, आत्मा कधीही तापत नाही. मन तापल्यानंतर दहा इंद्रिये तापतात. पण आत्मा मात्र शांत असतो. त्याला काही देणे घेणे नसते. तापलेले मन शांत करते कोण? तर आत वास करणारे येणेच सत्. येणेच सद्गुरू! आपण पाहता आपले गुरुदेव वशिष्ठ अत्यंत शांत आणि संयमी ! लक्षात ठेवा, शांत राहिल्या नंतर तुम्ही कधीही अनंतांपासून दूर जाणार नाही. क्रमश:पुढे चालू ........................(३)

अनगडवाणी