Friday, December 23, 2011

घसरगुंडी

घसरगुंडी

मध्य रेल्वेची झाली घसरगुंडी,
त्यामुळे चाकरमान्यांची झाली कोंडीच कोंडी............

सकाळचा हा प्रहर नउचा,
सगल्यांची असते घाई गडबड
चाकरमानी ऑफिसात पोहचण्यासाठी
करू लागले जीवाची धडपड...........

धडपड करून सुद्धा,
नाही आले काही हाती,
पडायचा तो पडला लेट मार्क
सह्यांच्या वह्यान्वरती .................

मयुर तोंडवळकर...........9869704882

संवाद.........!!!

संवाद.........!!!
लिहिता नाही आले, वाचता नाही आले,
तरी वाटले असे काही तरी करून जावे,
पाहणा-यांच्या डोळ्यांचे,
पाहताच पारणे फिटावे........

हे चित्र नव्हे,
तर हि आहे भाषा अन्तरिची,
संवाद साधण्यासाठी
गरज नसे भाषेची..............

न बोलता, न लिहिता,
हि साधते संधान अंतराशी,
एक चित्र पाहोनी आपोआप,
संवाद घडतो इतरांशी.........

एक चित्र ते काय, एक चित्र ते काय,
डोळ्यांसमोर ते दिसू लागता,
भडभडा बोलू लागते,
भाषा सगळ्यांच्या मनीची..............
मयुर तोंडवळकर – 9869704882

Thursday, March 3, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-6)



आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मूनिन्बरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते. मग, या अशा आसनाच्या सेवेक-याची पटली कशी हवी? तर अत्यंत उच्च गतीची हवी. जरी आपण या कलीयुगात असले तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत, मग आपल्या विचारांची गती, विशालता उच्च हवी. ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, “आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथे या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे.” त्यांनीच पुढे संदेश दिले, “तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ”. तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो अशा मानवाची जार तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ट नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठविल का? आमचे संदेशच असे आहेत, “सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुला मला डोळे भरून पाहता येईल.” पवित्र आचरण नसेल, तर तू कसा बरे मला पाहू शकशील. मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा का मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”
असा दृढ:निश्चयी भक्त असेल, त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणव वेदही प्रगट होतो.
हे जे स्थान आहे, ते सत् पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही, ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत. तेथे ऋद्धी-सिद्धी नाही. तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तीचा मार्ग आहे – तो म्हणजे नामस्मरण ! ध्यान धारणा अन् मन सत् चरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ती केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे त्याच्या ठिकाणीच अनंतांचा वास आहे. त्या ठिकाणीच अष्ट सिद्धी देखील वास करू शकतात. ज्या ठिकाणी ओम्कारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथे काय शिल्लक आहे? ज्या ओम्कारांच्या ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ती हात जोडून उभ्या असतात असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेक-याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा ! पण आपण एवढेच म्हणायचे, “अनंता ! मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो.” आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थूल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथे जवळच असते पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जार पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणव वेद पाहिजे. ज्योत पाहता आली पाहिजे तिच्या बरोबर बोलणे करता आले पाहिजे. जे भक्त आहेत ते सत् सान्निध्यात आहेत. सूक्ष्म त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामीनी म्हटले आहे, “वाजे पावूल अपुले, म्हणे मागोती कोण आले?”
जेथे शंकराचे स्थान तेथे पिशाच्च त-हा असणार पण जेथे श्रीहरीचे स्थान तेथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो भक्त आहे.

समाप्त .....................

Tuesday, March 1, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-5)



समजा पाचवा प्रणव वेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरू दर्शन तरी मिळवा. शुभ्र प्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होवू शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत, मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थूल गेले. तुमच्या स्थूलत वास करणारे तत्व तुमच्या बरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सातचे सत् चरण तुम्ही पाहणार आहात, ते तत्व! मनाला जाणीव देवून मनाला हलविते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही जरी गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जान असते. या पंचमहाभूताच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताला सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जे स्थूल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत. तू आणि सत् एकच आहेत. कवचात तूही आहेस अन् कवचात सत्, मी देखील आहे. आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याच्या प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंच महाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देवून कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुनांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलत कसे प्रवेश करतात हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे का? मनाने बाजार गप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते, सेवेकरनीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्च्यर्या केली? आपल्या आसनाजवळ लाघव आहेत, लाघव झाल्यावर, त्रास होवू लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, “लाघव करण्यासाठी चैत्यन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या, चैत्यन्याला त्यांनीच निर्माण केले, आम्हालाही त्यांनीच निर्माण केले, अधिकार देखील त्यानीच बहाल केलेत अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच ! जन्माला त्यानीच पाठविले. तुमचे पालन पोषणही तेच करीत आहेत. दही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेतांना आपणही स्थिर आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असून देखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतीना आपली चूक काय झाली हे कळू नये तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे? उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्या कडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे. आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड येणे शुध्द शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरू कधीही शांत बसणार नाहीत पण ते बनवाबनवीचे अश्रू असतील तर लक्ष हे देणार नाहीत. क्रमश:पुढेचालू ........................(५)

Friday, February 25, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-4)


पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-4)
पाचवा प्रणव वेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जार सद्गुरुमय बनला, मग वेगळे काय शिल्लक राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरू मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरू म्हणतात, त्याली मी माझ्या वेगळा का ठेवू? जे मन सातावेगले दुसरे काही पाहत नाही मग ते सातपासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या वेदाचा घाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत् चरण मिळवावयाचे असतील तर सत् चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कालीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, “सत् युगात जसा कस होता तसा कस आता घ्यावयाचा नाही.” पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसत उतरत नाहीत. फक्त म्हणतात, “सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही.” लक्षात घ्या सेवेक-यानो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, “मन ते मजपासोनी जाण”. मन माझ्यावेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणव वेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा. पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन अम्हप्रात लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो, मन सत् मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणव वेद पाहता येणार नाही. क्रमश: पुढे चालू ........................(४)

Sunday, February 20, 2011

MAYUR TONDWALKAR: पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)

MAYUR TONDWALKAR: पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)



पाचवा प्रणव वेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जार सद्गुरुमय बनला, मग वेगळे काय शिल्लक राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरू मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरू म्हणतात, त्याली मी माझ्या वेगळा का ठेवू? जे मन सातावेगले दुसरे काही पाहत नाही मग ते सातपासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या वेदाचा घाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत् चरण मिळवावयाचे असतील तर सत् चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कालीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, “सत् युगात जसा कस होता तसा कस आता घ्यावयाचा नाही.” पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसत उतरत नाहीत. फक्त म्हणतात, “सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही.” लक्षात घ्या सेवेक-यानो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, “मन ते मजपासोनी जाण”. मन माझ्यावेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणव वेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा. पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन अम्हप्रात लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो, मन सत् मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणव वेद पाहता येणार नाही. क्रमश: पुढे चालू ........................(४)

Saturday, February 19, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-2)



नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रह्मानन्दाप्रत घेवून गेला पाहिजे. त्या अनन्तांच्या कानापर्यंत त्या नामस्मरणाचा नाद पोहचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ओम् कारापर्यंत पोचली पाहिजे. लक्षात घ्या, ध्यान धारणेकरिता आसन आहे. अर्थात ध्यान धारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण करताना इकडे, तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना, नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार, म्हणून नामस्मरण करताना नाम अशा त-हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच काम नयेत. नेत्रासमोर केवळ सद्गुरुंचीच छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील, पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन् ते ध्यान ! दोघांची संयुक्तता साधली अन् त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहचतो. अशा त-हेने या चाकोरीतून एकदा का सेवेकरी ऊर्ध्वतेणे वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणव वेद प्रगत होणारच. पण पाचवा प्रणव वेद प्रगत होण्यासाठी सद्गुरू दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरू दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरू दर्शनानंतर सूक्ष्म गती ही पुढची पायरी.
पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होवून गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. लक्षात ठेवा, भक्तीमध्ये भेदभाव नाही कारण सर्वांठायी एकच तत्व वास करीत आहे. आपण पाहता महान महान ऋषी-मुनी होवून गेले. पण प्रत्येक जण आपापल्या पायरीप्रमाणे राहणार. संसार सांभाळून, कर्तव्य सांभाळून जो काही वेळ मिळेल त्या अवधीत नामस्मरण करणे हेच आपले आध्य कर्तव्य आहे. आजचे युग हे कलियुग आहे, येणेच संशय युग आहे. मन चलबिचल होते, द्विधा होते. लक्षात घ्या, तापते ते आपले मन, आत्मा कधीही तापत नाही. मन तापल्यानंतर दहा इंद्रिये तापतात. पण आत्मा मात्र शांत असतो. त्याला काही देणे घेणे नसते. तापलेले मन शांत करते कोण? तर आत वास करणारे येणेच सत्. येणेच सद्गुरू! आपण पाहता आपले गुरुदेव वशिष्ठ अत्यंत शांत आणि संयमी ! लक्षात ठेवा, शांत राहिल्या नंतर तुम्ही कधीही अनंतांपासून दूर जाणार नाही. क्रमश:पुढे चालू ........................(३)

Saturday, January 22, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला)..............1


पाचवा प्रणव वेद (भाग पहिला)
पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होतो? तर तो आपणास ज्ञान मार्गामुळे मिळतो. स्वयं प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञान मार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद् गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरुंशी बोलणे, चालणे होवू लागले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला. जरी पाचवा प्रणव वेद प्रगट झाला तरी त्यातही आपल्याला भर घालवायची आहे. प्रणव येणे बोल. जसे आपण बोलणे ऐकतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ओमकारस्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगत झाला असे म्हणता येईल.

मग अशी ज्योत सद्गुरू सान्निध्याने कुठेही जावू शकते. सद्गुरू सान्निध्या शिवाय हे होणे शक्य नाही. पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्याशिवाय आपल्याला गुरुगुह्य काय आहे, हे समजणार नाही. जोपर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणव वेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही, तोपर्यंत आपले सद्गुरू काय आहेत याची तो जाणीव घेवू शकणार नाही. आपले सद्गुरू ओळखू शकणार नाही. पाचवा प्रणव वेद सुरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो. आम्ही हे म्हणतो हे खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते. सद्गुरूंना संदेश आपण पहातो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सुक्ष्माने कुठेही आदेशानुसार जावून येते की नाही?
पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्याखेरीज ही जी देवाण-घेवाणीची त-हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची त-हा साध्य होणार नाही, साध्य होवू शकणार नाही. पण पाचवा प्रणव वेद सिद्ध होण्यासाठी, सापडण्यासाठी भक्ताने वा सेवेक-याने काय केले पाहिजे? तर नामस्मरण केले पाहिजे. मनाने झटले पाहिजे. सेवेकरी नामस्मरण तर करतोच आहे. आम्ही नाही असे म्हणत नाही. पण नामस्मरण कसे केले पाहिजे? क्रमश:पुढे चालू ........................(२)

अनगडवाणी