Sunday, January 19, 2020

गुरूकिल्ली

*_फार मोठी गोष्ट ह्या गुरुदेवांनी आपल्या भक्तांना उपदेश करताना सांगितलेली दिसून येते._*

_खरंच ! आहे कां हो वेळ आपल्या सारख्या कलियुगात राहणा-या भक्तांना ?_ 

_नेहमीच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ तरी असतो कां आपणाला?_

_हो हे ही खरेच म्हणा._ _सकाळी उठल्यापासून जे आपण या मायावी कर्तव्यात म्हणजेच आपल्या जबाबदा-यांमध्ये इतके लिप्त होऊन गेलेलो असतो की इतर ठिकाणी, आजुबाजूला बघण्यासाठीही आपल्याकडे वेळ नसतो, मग अशातच भगवंताची आठवण करायला वेळ कुठून असणार. नाही कां?_

_या गोष्टींवरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, भक्त सुज्ञ तर असतो, पण प्रत्यक्षात या आजुबाजूच्या मायावी स्थितीमुळे त्याच्या संज्ञा सगळ्या बोथट झालेल्या असतात._

_जो भक्त आपल्या गुरुदेवांना सांगत असतो की काय बरोबर आणि काय चुक, त्या भक्तालाच जर हे कळले असते की आपण कुणाला काय सांगतो आहोत, तर मग काय सांगावे?_ असे कदाचित घडलेही नसते.

*_ह्या गोष्टीवरुन असे वाटले की आपल्याकडेही असे हुश्शाsssर भक्तगण असतीलही नां?_*

अन्यथा ह्या अगोदर जे घडले, जे आता घडते आहे आणि जे पुढे भविष्यात देखील घडणार आहे, ते वरील उदाहरणात गुरूदेवांनी म्हटल्याप्रमाणे. 

*_ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह कधीच थांबणार नाही आणि वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला नदी पार करावी लागेल, त्याचप्रमाणे आपले हे (तुटपूंजे ६०/७० वर्षाचे) जीवन देखील संपुन जाईल, परंतु आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या कधीच संपणार नाहीत आणि आपणांस वेळही कधीच मिळणार नाही._*

_तरी सत् भक्तांनो ! वेळीच सावध व्हा आणि नदी आटण्याचा अट्टाहास करु नका._

*जो येईल तो वेळ आपला समजा आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा म्हणा, उपस्थिती म्हणा, सत् कर्तव्यता म्हणा, स्थानात येणे म्हणा, नामस्मरण करने म्हणा इत्यादी सात्त्विक गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न आपण सर्वस्वांनी करुया.*

*_सत् स्थानांचे महात्म्य कांहीं औरच आहे आणि त्याबद्दलची कल्पना आपल्याला आपल्या सतानेच दिलेली आहे._* 

*साक्षात श्री सद्गुरू माऊलींकडून आपणांस ते स्थुलात असतांना त्यांनी सर्वस्वांना समजावून सांगितलेलेच असल्यामुळे आपण आपला (अमुल्य) वेळ, थोडाबहुत कां होईना, वेळोवेळी श्री सद्गुरू माऊलींसाठी देऊन, त्यांच्या कर्तव्यात देऊन, आपले स्वत:चे कोटकल्याण करुन घेणे नाही कां उचीत ठरणार?*

एक लक्षात घ्या, हे सांगणारा मी कोण? मी कुणीही नाही. सद्गुरू माऊलींचा एक सेवेकरी, एक पाईक. परंतु, ह्या कथेवरून ह्या सर्वस्व गोष्टींची आठवण झाल्याने फक्त एक आठवण म्हणून येथे हे कथन करता झालो एवढेच. मनाला भावली, मनाला भुरळ घातली आणि अंत: करणापर्यंत पोहोचली. निमित्ते काही गोष्टी आठवल्या, वाटल्या, त्यांची उजळणी व्हावी या हेतूने येथे मांडल्या. कुणी किती घ्यावे, कुणी काय घ्यावे, कुणी किती महत्त्व द्यावे, हे सर्वस्व ज्याचे त्याने ठरवावयाचे आहे. 

बस इतकेच सांगावेसे वाटते की आपण, आपला दरबार, आपला मुळाश्रम, आपले सद्गुरू, आपल्या श्री सद्गुरू माऊलींची शिकवण, आपल्या दरबारची ठेवण अशी कितीतरी वैशिष्ट्यें ही बाहेर इतर कुठेही सामान्यरित्या सापडू शकणार नाहीत अशी आहेत.

आपले स्थान हे आदीअंतापासून असलेले व आदीअंतापर्यंत राहणारे असे, आपल्या, तसेच ह्या विश्र्वाचे जे मालिक आहेत, त्या सताचे, त्या ओंकाराचे हे स्थान आहे, जे स्वयम् आहे. या स्थानामध्ये स्वयंम् प्रकाश आहे आणि ह्या स्वयंम् प्रकाशात नुसते येऊन बसणे हे देखील भाग्याचे लक्षण आहे. मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्यावर बाहेरच्या वातावरणामुळे जी मायेची पुटें चढलेली आहेत, त्यांचा नाश करण्याची क्षमता ह्या स्थानातील स्वयंम् प्रकाशात आहे. 

इतकेच नव्हे तर ह्या स्थानात जसा आपल्या मानवी भक्तगणांचा वावर असतो, तसाच सतत चोवीस तास वावर अदृश्य रितीने असणा-या भक्तांचा देखील असतो, त्यामुळे जो कुणी ह्या स्थानांत उपस्थित असतो त्याला नकळतच त्या गोष्टीचा लाभ पोहोचतच असतो. मग तो नामस्मरण करीत असो वा नसो, ध्यानधारणा करीत असो वा नसो, अथवा कर्तव्यकर्म करीत असो वा नसो. त्याशिवाय चोवीस तास निरंतरपणे सतांचा शुभ आणि शुभ्रप्रकाशाचा वर्षाव देखील अव्याहतपणे बरसत असल्याने सोन्याहूनही पिवळे असाच हा योग असतो. अशा परम् पवित्र सत् स्थानांत, सान्निध्यात आपण आपला वेळ घालविला, तो वाया जाईल काय? आपला आपणच विचार करा आणि ठरवा आपल्या आयुष्याची वाटचाल कशी करावयाची ते !

*_अपले भाग्य अपुल्या हाती_*
*_चालवावी अपुली मती_*
*_अनगड म्हणे हे जगरिती_*
*_द्यावी आपण तिलांजली_*

👏🙏👏💐🌹🌷👏🙏👏💐🌹🌷

भगवान हैं........

*_भगवान है !_*
*_सभीमें है_* - तुममें, हममें !
इसीमें, उसीमें ! इन्सानोमें, जानवरोंमें ! जलमें, थलमें ! आकाशमें, पातालमें ! दश दिशाओंमे ! और इस सबसे परें भी!!!

*_वह जगह नहीं, जहां भगवान नहीं._* 

*_वो ना तुमें छोडकर है._* *_ना वो तुमसे अलग हैं_* 
*_वह तुम्हारे अंदरही, तुममें समा हुआ हैं_*

*_सिर्फ हम भुल गये हैं यह बात, जिस वजहसे हम एक दुसरेसे लडते है, झगडते है. इन्सानियत भूल जाते है और अपने ही कोशमें लिप्त रह जाते हैं_*

सबसे बढीया बात तो यह हैं की हम सभी लोग उस भगवान के साथ उनकेही घरमें होते हुएभी मेरी-तेरी करते रहते हैं ! इतना ही नहीं तो एक दुसरेकी पतंग कटवाने के लिये जंग जंग पछाडते हैं, चेष्टा करते हैं और मौका ही धुंडते रहते हैं की कब मैं इसको काट दूं और उसपर मात कर दूं !

क्या यह हमें शोभा देता हैं? कोई कभी ये भी गौरसे सोचता हैं की मेरे सद्गूरु यह कहते थे की यह मेरा परिवार हैं ! क्यों हम यह भूल जाते हैं, हमारे भगवान की यह सोच? सिर्फ और सिर्फ चंद स्वत:हके लाभके लिए ? की हम मानतेही नहीं हमारे सद्गूरु नें दी हुई सीख को की  *"यह मेरा परिवार हैं !"*

कितनी बडी बात कही हैं इस मायावी जगतमें हमारे सद्गूरुजीनें की यह मेरा परिवार हैं, जब की आपके खुदके रिस्तेदारभी कभी यह बात कहनेसे डरते दिखाई देते होंगे ! इस कलियुग में सचमें मानो तो कोई किसी का नहीं हैं ! और ऐसे समय सद्गुरूजींका यह कहना की *तुम सभी मेरा परिवार हो* परिवारसे एक रत्तीभी कम नहीं, बल्की ज्यादाही हो ! और बस ! यह बात सिर्फ कहनेके लिए ही नहीं, तो प्रत्यक्ष आचरणमें लाना, इससे और बडी बात कौनसी हो सकती हैं !

तो हम कब डरेंगे, अपनी गलत सोचसे? अपने गलत व्यवहारसे? अपने गलत रंगो-ढंगोंसें? कंपनी गलत रहन-सहनसें? 

हम कब पुछना छोड देंगे *क्या असलमें भगवान मौजूद हैं?* हम सब कब समजेंगे की हां, सारी सृष्टीका निर्माणकर्ता वो भगवान ही हैं ! 

देखो सृष्टी की ओर ! क्या दिखाई देता हैं? सृष्टी में जगह जगह बिखरी हुई अलगता ! जगह जगह बिखरी हुई वैविध्यता ! रंगों रंगोंका अलगपण ! आसमानकी ऊंचाई ! समुंदरकी गहराई ! अवकाश की निलाई ! सुरजकी गरमाई या फिर रोशनी ! चांदकी शितलता ! हर मनुष्य में पाया जानेवाला अलगपण ! क्या इस सभी की कभी हम छानबीन कर सकते हैं ? जिसका उत्तर नकारार्थी ही होगा ! तो हम कैसे पुछ सकते हैं की *क्या, भगवान हैं ?*

अनगडवाणी