Sunday, May 5, 2013

तरच आपला निभाव लागणार हाय............!!!


दोन सिमान्वरचे,  
दोन्हीही वैरी, झाडती फैरी, 
तरी आपण गप्प बसावे काय? 
गप्प बसण्याव्यतिरिक्त,  
आपण दुसरे काय करणार आहोत कि नाय ? 
किती दिवस लोकशाहीचे स्तोम माजवावे?   
ह्याला काय कालगणना आहे कि नाय? 

षंढत्वाची धरुनी कास, 
नाकर्तेपणाची धरुनी आस, 
मुत्सद्देगिरीची भाषा येथे कामाची नाय,  
एकाने खून केला,  
दुसर्र्याने सीमोलंघन केले, 
तरी सामोपचाराची भाषा वापरावी काय?  

हे कलियुग आहे,   
येथे गांधीगिरी चालणार नाय,

येथे हवी शिवबांची कठोरता,  
येथे हवी सुभाष चंद्रांची नितीमत्ता,  
येथे हवी सावरकरांची दैदीप्त्यमानता,  
येथे हवी भगत सिंगांची चपलता,  
तरच आपला निभाव लागणार हाय
         तरच आपला निभाव लागणार हाय............!!!
.................................................मयुर तोंडवळकर .




अनगडवाणी