Thursday, March 3, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-6)



आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मूनिन्बरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते. मग, या अशा आसनाच्या सेवेक-याची पटली कशी हवी? तर अत्यंत उच्च गतीची हवी. जरी आपण या कलीयुगात असले तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत, मग आपल्या विचारांची गती, विशालता उच्च हवी. ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, “आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथे या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे.” त्यांनीच पुढे संदेश दिले, “तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ”. तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो अशा मानवाची जार तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ट नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठविल का? आमचे संदेशच असे आहेत, “सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुला मला डोळे भरून पाहता येईल.” पवित्र आचरण नसेल, तर तू कसा बरे मला पाहू शकशील. मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा का मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”
असा दृढ:निश्चयी भक्त असेल, त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणव वेदही प्रगट होतो.
हे जे स्थान आहे, ते सत् पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही, ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत. तेथे ऋद्धी-सिद्धी नाही. तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तीचा मार्ग आहे – तो म्हणजे नामस्मरण ! ध्यान धारणा अन् मन सत् चरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ती केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे त्याच्या ठिकाणीच अनंतांचा वास आहे. त्या ठिकाणीच अष्ट सिद्धी देखील वास करू शकतात. ज्या ठिकाणी ओम्कारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथे काय शिल्लक आहे? ज्या ओम्कारांच्या ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ती हात जोडून उभ्या असतात असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेक-याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा ! पण आपण एवढेच म्हणायचे, “अनंता ! मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो.” आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थूल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथे जवळच असते पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जार पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणव वेद पाहिजे. ज्योत पाहता आली पाहिजे तिच्या बरोबर बोलणे करता आले पाहिजे. जे भक्त आहेत ते सत् सान्निध्यात आहेत. सूक्ष्म त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामीनी म्हटले आहे, “वाजे पावूल अपुले, म्हणे मागोती कोण आले?”
जेथे शंकराचे स्थान तेथे पिशाच्च त-हा असणार पण जेथे श्रीहरीचे स्थान तेथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो भक्त आहे.

समाप्त .....................

अनगडवाणी