Tuesday, July 13, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील

श्रद्धेचे स्थान जे असावे लागते ते भक्ताजवळ नसेल तर भावना शुद्ध राहू शकेल का? श्रद्धेचे जे वसतीस्थान आहे ते जर शुद्ध नसेल, श्रद्धा आहे पण ती कशी, आम्हाला काळजी नाही, आपले बाबा आहेत, काही जरी झाले तरी ते बघतील. काही प्रसंग आल्यावर व हाक मारल्याबरोबर सद्गुरू येतील. आम्हाला प्रसंगातून सोडवतील, आमचे सांत्वन करतील, माझे बाबा किंवा माझे सद्गुरू मला बिकट प्रसंगातून सोडवतील अशी

सेवेक-याना खात्री असते. त्यांची श्रद्धा असते. परंतु सेवेकरी हा विचार अडचणीच्या वेळेला करतो. हा त्याचा भाव त्याच्यावर प्रसंग आल्यानंतर असतो. परंतु सेवेक-यानो तुम्हीच सांगा यासाठीच केवळ शक्ति आहे का? आपण पाहतो आपल्यात काही ज्योती, काही सेवेकरी असे आहेत की त्यांची मुलेच त्यांना दाद देत नाहीत, त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत. अर्थात सद्गुरूंचे हे कर्तव्य आहे की अशा सेवेक-यांना शांत करणे, कारण जर सेवेक-याचे मन बेचैन झाले तर भक्ति होणे शक्य नाही.


Mayur Tondwalkar

दुष्टपणाने थोडावेळ सरशी मिळवता येईल. पण अंतिम विजय कधीच मिळवता येणार नाही.

दुष्टपणाने थोडावेळ सरशी मिळवता येईल. पण अंतिम विजय कधीच मिळवता येणार नाही.
Mayur Tondwalkar

अनगडवाणी