Showing posts with label भक्त. Show all posts
Showing posts with label भक्त. Show all posts

Sunday, January 19, 2020

गुरूकिल्ली

*_फार मोठी गोष्ट ह्या गुरुदेवांनी आपल्या भक्तांना उपदेश करताना सांगितलेली दिसून येते._*

_खरंच ! आहे कां हो वेळ आपल्या सारख्या कलियुगात राहणा-या भक्तांना ?_ 

_नेहमीच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ तरी असतो कां आपणाला?_

_हो हे ही खरेच म्हणा._ _सकाळी उठल्यापासून जे आपण या मायावी कर्तव्यात म्हणजेच आपल्या जबाबदा-यांमध्ये इतके लिप्त होऊन गेलेलो असतो की इतर ठिकाणी, आजुबाजूला बघण्यासाठीही आपल्याकडे वेळ नसतो, मग अशातच भगवंताची आठवण करायला वेळ कुठून असणार. नाही कां?_

_या गोष्टींवरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, भक्त सुज्ञ तर असतो, पण प्रत्यक्षात या आजुबाजूच्या मायावी स्थितीमुळे त्याच्या संज्ञा सगळ्या बोथट झालेल्या असतात._

_जो भक्त आपल्या गुरुदेवांना सांगत असतो की काय बरोबर आणि काय चुक, त्या भक्तालाच जर हे कळले असते की आपण कुणाला काय सांगतो आहोत, तर मग काय सांगावे?_ असे कदाचित घडलेही नसते.

*_ह्या गोष्टीवरुन असे वाटले की आपल्याकडेही असे हुश्शाsssर भक्तगण असतीलही नां?_*

अन्यथा ह्या अगोदर जे घडले, जे आता घडते आहे आणि जे पुढे भविष्यात देखील घडणार आहे, ते वरील उदाहरणात गुरूदेवांनी म्हटल्याप्रमाणे. 

*_ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह कधीच थांबणार नाही आणि वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला नदी पार करावी लागेल, त्याचप्रमाणे आपले हे (तुटपूंजे ६०/७० वर्षाचे) जीवन देखील संपुन जाईल, परंतु आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या कधीच संपणार नाहीत आणि आपणांस वेळही कधीच मिळणार नाही._*

_तरी सत् भक्तांनो ! वेळीच सावध व्हा आणि नदी आटण्याचा अट्टाहास करु नका._

*जो येईल तो वेळ आपला समजा आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा म्हणा, उपस्थिती म्हणा, सत् कर्तव्यता म्हणा, स्थानात येणे म्हणा, नामस्मरण करने म्हणा इत्यादी सात्त्विक गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न आपण सर्वस्वांनी करुया.*

*_सत् स्थानांचे महात्म्य कांहीं औरच आहे आणि त्याबद्दलची कल्पना आपल्याला आपल्या सतानेच दिलेली आहे._* 

*साक्षात श्री सद्गुरू माऊलींकडून आपणांस ते स्थुलात असतांना त्यांनी सर्वस्वांना समजावून सांगितलेलेच असल्यामुळे आपण आपला (अमुल्य) वेळ, थोडाबहुत कां होईना, वेळोवेळी श्री सद्गुरू माऊलींसाठी देऊन, त्यांच्या कर्तव्यात देऊन, आपले स्वत:चे कोटकल्याण करुन घेणे नाही कां उचीत ठरणार?*

एक लक्षात घ्या, हे सांगणारा मी कोण? मी कुणीही नाही. सद्गुरू माऊलींचा एक सेवेकरी, एक पाईक. परंतु, ह्या कथेवरून ह्या सर्वस्व गोष्टींची आठवण झाल्याने फक्त एक आठवण म्हणून येथे हे कथन करता झालो एवढेच. मनाला भावली, मनाला भुरळ घातली आणि अंत: करणापर्यंत पोहोचली. निमित्ते काही गोष्टी आठवल्या, वाटल्या, त्यांची उजळणी व्हावी या हेतूने येथे मांडल्या. कुणी किती घ्यावे, कुणी काय घ्यावे, कुणी किती महत्त्व द्यावे, हे सर्वस्व ज्याचे त्याने ठरवावयाचे आहे. 

बस इतकेच सांगावेसे वाटते की आपण, आपला दरबार, आपला मुळाश्रम, आपले सद्गुरू, आपल्या श्री सद्गुरू माऊलींची शिकवण, आपल्या दरबारची ठेवण अशी कितीतरी वैशिष्ट्यें ही बाहेर इतर कुठेही सामान्यरित्या सापडू शकणार नाहीत अशी आहेत.

आपले स्थान हे आदीअंतापासून असलेले व आदीअंतापर्यंत राहणारे असे, आपल्या, तसेच ह्या विश्र्वाचे जे मालिक आहेत, त्या सताचे, त्या ओंकाराचे हे स्थान आहे, जे स्वयम् आहे. या स्थानामध्ये स्वयंम् प्रकाश आहे आणि ह्या स्वयंम् प्रकाशात नुसते येऊन बसणे हे देखील भाग्याचे लक्षण आहे. मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्यावर बाहेरच्या वातावरणामुळे जी मायेची पुटें चढलेली आहेत, त्यांचा नाश करण्याची क्षमता ह्या स्थानातील स्वयंम् प्रकाशात आहे. 

इतकेच नव्हे तर ह्या स्थानात जसा आपल्या मानवी भक्तगणांचा वावर असतो, तसाच सतत चोवीस तास वावर अदृश्य रितीने असणा-या भक्तांचा देखील असतो, त्यामुळे जो कुणी ह्या स्थानांत उपस्थित असतो त्याला नकळतच त्या गोष्टीचा लाभ पोहोचतच असतो. मग तो नामस्मरण करीत असो वा नसो, ध्यानधारणा करीत असो वा नसो, अथवा कर्तव्यकर्म करीत असो वा नसो. त्याशिवाय चोवीस तास निरंतरपणे सतांचा शुभ आणि शुभ्रप्रकाशाचा वर्षाव देखील अव्याहतपणे बरसत असल्याने सोन्याहूनही पिवळे असाच हा योग असतो. अशा परम् पवित्र सत् स्थानांत, सान्निध्यात आपण आपला वेळ घालविला, तो वाया जाईल काय? आपला आपणच विचार करा आणि ठरवा आपल्या आयुष्याची वाटचाल कशी करावयाची ते !

*_अपले भाग्य अपुल्या हाती_*
*_चालवावी अपुली मती_*
*_अनगड म्हणे हे जगरिती_*
*_द्यावी आपण तिलांजली_*

👏🙏👏💐🌹🌷👏🙏👏💐🌹🌷

Friday, November 22, 2019

कोहम्-भाग दोन

🙏🙏🙏

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज परिवार*

*कोहम्! मी कोण आहे?*

*तसे पाहिले तर मी कोणीही नाही. मी एक पंचमहाभूतांचा पुतळा होय.*

(*पंचमहाभूते म्हणजे काय?*
*पंचमहाभूतें म्हणजे आप (पाणी अथवा जल), तेज (अग्नी), वायु, आकाश आणि पृथ्वी ही पांच तत्वें होत.* या पांच तत्वांनी सजीव सृष्टी निर्माण झाली असे म्हणतात.

तसेच सांख्यदर्शन शास्त्रानुसार सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात.)

जर मी कोणीही नाही, पंचमहाभूतांचा एक पुतळा आहे, मग मी, "मी मी" असे कां बरे म्हणत असतो? मीपणा माझ्या मध्ये कां बरे येत असतो? कां बरे मी माझ्यातील परमात्म्याला विसरतो?

कुणी विचारतील, बरे, आता हा परमात्मा कोण? तो कुठे असतो? तो कोठे वास करतो? तो कुठे राहतो?

*परम् + आत्मा* येणे नाम परमात्मा. ही दोन शब्दांची व्याकरणातील संधी होय.

*प्रथम *आत्मा* म्हणजे काय? हे समजून घेऊ. 

आपल्या आत असणारी *मा* म्हणजे ज्योत, म्हणजेच त्या परमेशाचा अंश, ज्यावेळी आईच्या गर्भात हा पंचमहाभूतांचा पुतळा आकार घेत असतो, त्यावेळी तीन-चार मासाच्या कालावधीनंतर किंवा अवधीनंतर, त्यामध्ये हा अंश कधीतरी प्रवेश करता होतो आणि तद्नंतरच त्या मातेच्या गर्भामध्ये हालचाल, चलन-वलन होण्यास सुरुवात होत असते. याचाच अर्थ असा की तो पंचमहाभूतांचा पुतळा, हा पुतळा न राहता, त्यात सजीवता येते. अन्यथा तो एक मांसाचा गोळाच बनून राहतो, ज्याला अचेतन किंवा निर्जीव देह म्हणतात, ज्यामध्ये हालचाल दिसून येत नाही. ह्याउलट सजीव म्हणजेच जीवा सहीत किंवा चेतन देह असून, त्यामध्ये हालचाल दिसून येते.

परम् ह्याचा अर्थ अंतिम, सर्वोत्कृष्ट, मुख्य, उच्च इत्यादी, म्हणजेच आपल्या आत वास करून असणारी मा, येणे आत्मा हा त्या अंतिमाशी, मुख्याशी, उच्चाशी एकलय होतो, एकजीव होतो त्यावेळेस तो *परमात्मा* ह्या नावाने ओळखला जातो.

म्हणून त्या परमात्म्याला आपण कधी विसरायचे नसते. आपण जर त्या परमात्म्याला विसरलो नाही तर तो ही आपल्याला विसरणार नाही आणि ही सर्वस्वाची जाण ठेवून जर आपण वागलो तर आपल्यामध्ये मी पणा कधीच येणार नाही आणि मी पणाच जर आपल्यात आला नाही, तर तुझे माझे होणार नाही आणि त्यामुळें आपणांस आपल्या भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा होईल. 

मी मी राहणारच नसल्याने तो भगवत भक्त परमेश्वरात एकलय होऊन जाईल. त्या परमात्म्याशी तादाम्य होईल. द्वैत भावना नाहीशी होऊन, तेथे अद्वैत भावना येईल. अशावेळेस *कोहम्* म्हणजेच मी कोण हा प्रश्नच उपस्थित होणार नाही.

अनगड म्हणे, *कोहम्* कोहम् न राहता, तो *ओहम्* ओहम् येणे *ओंकार*मय होईल.

ओंकार हा 'अ'कार,'उ'कार व 'म'कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.@विकीपिडीया...अनगड

हे वर्ण संपूर्ण ब्रम्हांडात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णु व महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.@विकीपिडीया...अनगड

👏💐👏💐👏💐👏💐👏💐👏

अनगडवाणी