Sunday, October 31, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतीन शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतू शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले, तर सताने ! जरी अघोराना वरद्हस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापीटा केला तरी बाजू सताचीच घेणार परंतू अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत् बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच ! सत् सताचीच बाजू घेणार. अघोरांची बाजू कधीही घेणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पाहतच आहात. अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करत आहोत.

कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो कि सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पहातच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करीत आहोत. स्थूलातून गेलेल्या या अघोरानी सुक्ष्माने मानवांवर कब्जा केला. द्वापर युगापासून जेवढे अघोर अवतार कार्यात मारले, ते सर्व अघोर सूक्ष्माने होते. सुक्ष्माने ते कार्य करीत होते. गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थुलाने केला त्यांचा नाश सुक्ष्माने करणे तुम्हा मानवाना शक्य होइल का? ज्यांच्यासाठी ओम् कारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्या करिता अनन्तानी ओमकाराना आदेश देवून जन्म घ्यायला भाग पाडले अन त्यांना कर्तव्याची दिशा दिली, मग अशा अघोरांच्या सुक्ष्माचा नाश तुम्ही कलीयुगी मानव करू शकता का? आपण पाहतोच कि आपल्याकडे काही मानवांची शुद्दीकरण स्थिती होत असताना काही बलाढय, तर काही महाबलाढय, ८५० पाय-या च्या अघोर ज्योतीचा देखील नाश केला आहे. सर्वस्व ज्या राक्षसांकडे होते, ऋद्धी – सिद्धी, तंत्र – मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धी करणातून नाश केला गेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहेच,

आन्धळ्याशी जग सारेची आंधळे
पुढे चालू..........

Great discounts on Hotels around the world at Hotels.com

Wednesday, October 20, 2010

ध्यान


ध्यान म्हणजे ‘आत’ जाण, अंतरमुख होण, अज्ञाताच्या प्रांतात शिरण, याचाच अर्थ या घडीला आपण, ‘बाहेर’ आहोत, बहि:र्मुख आहोत आणि तथाकथीत ज्ञाताच्या प्रांतात आहोत. खर सांगायचं तर ज्ञात आणि अज्ञाताबाबत आपले आकलन आपल्या मर्यादानुसार आहे. पण, प्राथमिक पातळीवर साधकाच्या दृष्टीने ‘आत’ आणि ‘बाहेर’ अशी त्याच्या जगाची विभागणी झाली आहे. आपण जोवर बहि:र्मुखतेणे, आत्मकेंद्रित होवून जीवन जगत असतो तोवर ‘बाहेर’चं जगच आपल्याला खर वाटत असत. आपण दृष्याला, स्थूलाला चिकटलेलो असतो. आपण जसजस अंतरमुख होवू लागतो तसतस आपल्याच अंतरंगाला विराट पण सूक्ष्म चेतनेची ओढ लागते. मग आतल जग आणि बाहेरच जग अशा दोन जगात आपलच मन संघर्ष उत्पन्न करत. साधकाला हळू हळू  अस वाटू लागत कि, आपल जे आतल जग आहे ते अधिक खर आहे. ते आपल्या कह्यातल आहे. आपल्याशी प्रतारणा न करणार आणि आपल्याला आधार देणार आहे. बाहेरच जग मात्र क्षणोक्षणी बदलत राहणार आहे.
काळाच्या कह्यात असल्याने आपली सत्ता न जुमाननारे आहे – ते सम्बधांवर आधारित आहे. प्रत्येकाला हे जग स्वत:च्या मनासारखे असावे आणि व्हावे, असे वाटते आणि त्या दृष्टीनेच तो आपल्या सम्बंधांची उभारणी करीत असतो. अशा हजारो ‘मी’ च्या सापेक्ष भावनानवर हे सम्बंध उत्पन्न होत असल्याने त्या  समबंधातही कायमच्या आधाराची हमी नाहि. त्यामुळे हे बाहेरचे जग साधकाला अनिश्चित – अस्थिर वाटते. पण जन्मापासून याच जगाची त्याला सवय असते. जे सुख मिळवायचे ते याच जगात, अशी त्याची स्वाभाविक भावना असते. अंत:र्यामीचे जग त्याला अपरिचित असते. आपल्या ख-या स्वरूपाबद्दल तो अनभिज्ञ असतो. तेव्हा अज्ञातात शिरणे म्हणजे आपल्या आताच शिरणे ! कारण आपण आपल्याला सर्वाधिक अज्ञात आहोत !!! म्हणून आपल्या अंतर्यामी शिरणे – तेथे स्थिर होत राहणे, हेच ते ध्यान.
पण हे आत शिरणे आणि स्थिर होणे साधत नाही. याच कारण आपल्या मनात सुरु असलेले दोन जगातले द्वंद्व आणि बाहेरच्या दृश्याकडे या मनाची उपजत असलेली धाव.
मुख्य म्हणजे या दोन जगातले सर्वात श्रेष्ठ आणि आपल जग कोणत्, याच मूल्यमापन झालेलं नाही. त्यामुळे उपासना करू तेव्हा पटकन आत जाने साधाव, अशी आपली अपेक्षा असते. पण उपासनेला बसल कि बाहेरच्या जगातले आघात, कल्लोळ, लहरी आतमध्ये आदळू लागतात. बाहेरचे आघात आतून आपल्याला अस्थिर, अशांत, अस्वस्थ करीत राहतात. शांत व्हावयाचा प्रयत्न केला कि भले बुरे विचार,
ब-या-वाइट आठवणी उफाळू पाहतात आणि मनाचा ताबा घेउ पाहतात. मग आत जाणच साधत नाही तर तेथे स्थिर होणे कसे साधावे?
आता भल्याबू-या आठवणी किंवा अवती-भवतीच्या माणसानच बरेवाइट वागणे सोडा हो, उपासनेत लहान-सहान गोष्टीनचाही अडथळा होत असतो. अगदी क्षुल्लक वाटना-या गोष्ठीही मनाचा ताबा घेतात.
घराला ओल आहे., घरात पाली झुरळे किटकानपासून ते उनदरापर्यंतच्या प्रान्यानचा मुक्त संचाराचा त्रास आहे. इतक्या क्षुल्लक गोष्टीही साधकाला अस्वस्थ करू शकतात. त्या क्षणी उपासनेत मनात या गोष्टी मध्येच डोकावतात आणि साधक त्याच दिशेने विचार किंवा चिंता करू लागतो. गोष्टी फार साध्या आहेत खरे. पण जोवर बाहेरच्या या गोष्टी त्रास देत असतात तोवर तुम्ही आतूनही स्थिर होवू शकत नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे. पण यावर उपाय काय ? उपाय एकच – उपासनाच वाढवत राहावी.
उपासानेत खंड पडता काम नये. उपासनाच उपासनेची गोडी निर्माण करील आणि टीकवीलहि. तेव्हा बाहेरच जग आघात करीत असले तरी आत शिरणे थांबवू नये. बाहेरच्या जगात व्यवहारानुसार गरजेच ते कराव. प्रयत्नही चिकाटीने करावेत. ऐहिक सुखही अवश्य मिळवाव पण आत जाने थांबवू नये. ते साधत गेल कि जाणवेल जग एकच आहे. आत आणि बाहेर अस काहीच नाही. जे आहे ते एकच आहे. सर्वव्याप्त आहे. त्याच्या असनेपनात आनंद आहेच आणि त्यात आपणही आहोत. या जानिवेतही आनंद आहे.
चैत्यन्य प्रभू.

Tuesday, October 12, 2010

सत् भक्तीचे स्वरूप

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला)


हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गाप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे. पण दोन्ही टोके सांभाळायची. आपण जाणताच हाताच्या बाजू दोन. एक उजवी अन् दुसरी डावी. त्या दोन बाजुमध्ये उजवा गट भक्ती अन् डावा गट तामस, हटयोग, प्राणायाम ही तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी ही सर्व तामस लोकांची उपासना. अन् भक्तियुक्त उपासना कोणती तर अखंड नाम ! त्या परते दुसरे काही नाही. जे सत् पदाने अखंड नाम सत् पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शनयुक्त राहणे, हेच त्याचे मर्म !! अशा स्थितीत राहिले ते ऋषी-मुनी, ब्रह्मऋषी, सप्तऋषी आणि त्यांची गुरुकुले !! अन् या चौकट मुनींच्या कोपीष्ट मुनींची, तामस मुनींची गुरूकुले त्यात शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन् त्यांची गुरुकुले, राक्षस. अघोर ज्यांना संजीवनी मिळाली होती. ही वेगळी चाकोरी आणि भक्ती ही वेगळी चाकोरी. तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मऋषी, सप्त ऋषी यांचा ताफा मात्र लहान होता. परंतू तेजस्वी होता, तेजोबलासहित होता. याचे कारण सत् कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या ! सत् त्यानाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे की मी तुमच्या बरोबर आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती, सत् आणि तामस असलेले लोक हे त्यांचेच भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त. तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी ! म्हणजेच भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग. भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे. त्यात काटे कुटे खाच खळगे काही नाही. परंतु तामसी वृत्तीच्या मार्गात काटे कुटे, खाच खळगे सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात ! परंतू भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे. आता आपण जाणताच की वेगवेगळी शुद्धीकरणे आपण पहिली, अनुभवली. या शुद्धीकरणात आपणा सर्वाना हे कळून चुकले होते की अघोरांकडे वेगवेगळे वरद् हस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्ठी होत्या.

Urgent opening.



Dear Friends,

I have following urgent openings in 100% Export Oriental Unit which is private limited in Pune.
Need dedicated and hardworking candidates. 

Job are full time in nature

Following are the details.

- Store In-charge - 1 post - Min Qualification - 12th Pass & above
- Store Assistant - 1 post - min Qualification - 12th Pass
- Office Administrator - 1 post - minimum -12th Pass
- Office Boy - 1 post - 10th pass

Basic requirement
- Computer minimum knowledge is must
- English literacy - read and write is must, speaking will be optional.

Salary would be decide based on Candidate profile and his presence during interview.
Accommodation can be provided for outskirt and selected candidates (optional)

Candidate who is interested can send latest updated resume / CV on mazagaonmazadesh@gmail.com

After scrutiny, respective candidate will call for an interview with suitable time.
--
आभारी,
दीपक बिनेकर
माझं गाव माझा देश
 





--
आभारी,
दीपक बिनेकर
माझं गाव माझा देश
मेरा गाँव मेरा देश
My Villages My Country.
A Social organisation for building of India.


अनगडवाणी