Tuesday, March 1, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-5)



समजा पाचवा प्रणव वेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरू दर्शन तरी मिळवा. शुभ्र प्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होवू शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत, मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थूल गेले. तुमच्या स्थूलत वास करणारे तत्व तुमच्या बरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सातचे सत् चरण तुम्ही पाहणार आहात, ते तत्व! मनाला जाणीव देवून मनाला हलविते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही जरी गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जान असते. या पंचमहाभूताच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताला सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जे स्थूल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत. तू आणि सत् एकच आहेत. कवचात तूही आहेस अन् कवचात सत्, मी देखील आहे. आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याच्या प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंच महाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देवून कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुनांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलत कसे प्रवेश करतात हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे का? मनाने बाजार गप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते, सेवेकरनीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्च्यर्या केली? आपल्या आसनाजवळ लाघव आहेत, लाघव झाल्यावर, त्रास होवू लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, “लाघव करण्यासाठी चैत्यन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या, चैत्यन्याला त्यांनीच निर्माण केले, आम्हालाही त्यांनीच निर्माण केले, अधिकार देखील त्यानीच बहाल केलेत अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच ! जन्माला त्यानीच पाठविले. तुमचे पालन पोषणही तेच करीत आहेत. दही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेतांना आपणही स्थिर आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असून देखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतीना आपली चूक काय झाली हे कळू नये तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे? उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्या कडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे. आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड येणे शुध्द शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरू कधीही शांत बसणार नाहीत पण ते बनवाबनवीचे अश्रू असतील तर लक्ष हे देणार नाहीत. क्रमश:पुढेचालू ........................(५)

अनगडवाणी