Friday, August 14, 2020

आत्मविश्वास

*आत्मविश्वास*
शब्द किती सोपा.
असे कां बरे म्हटले जाते?
काय असेल बरे हा शब्द?

आत्मविश्वास हा एकच शब्द आहे की हा संधी आहे.
या शब्दाची फोड करावयाची झाल्यास हा संधी देखील होऊ शकतो. जसे, खालीलप्रमाणे लिहिले, तर......

*आत + मधील + विश्वास*

येणे स्वत:च्या आत असणारा म्हणजे आत मनामध्ये असणारा विश्वास.

हा आत्म्याचा विश्वास होऊ शकत नाही, कारण आत्म्याला म्हणजे आपल्यात आत असणारी मा अर्थात ज्योत, जी बिंदू स्वरुपी असून, तिचा या पंचमहाभूताच्या देहाशी तसे पाहिले तर काही एक संबंध नसतो. परंतु तो आत्मा जर त्या पंचमहाभूताच्या देहात नसेल तर पंचमहाभूताचा देह हा असून नसल्यासारखाच असतो.

पंचमहाभूतांचा देह हा सदा न कदा मनाच्या ओढणीने कार्यरत असतो, त्यामुळे तो मायेत असतो. परंतु आत्मा हा स्वयं असतो. ना तो कोणाच्या इशा-याने चालत, ना कोणाच्या आदेशाने हलत. तो स्वतंत्र आहे.

हा ! तो चालतो फक्त नामाच्या गतीने. नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम.

जो भक्त नेहमी सदा न कदा, त्या भगवंताच्या, त्या सताच्या, त्या सद्गुरुंच्या, त्या ओंकारांच्या, त्या अनंतांच्या नामस्मरणात दंग असतो, त्या भक्ताचा त्याच्या *आत मधील विश्वास* हा कसा असणार, तर तो *आत्मविश्वासपूर्णच* असणार नाही कां?........अनगड

Wednesday, May 13, 2020

Traffic through Drone Shooting

This is #Mayurton's Visuals inviting you to please watch the below mentioned Video on my YouTube channel.

Please click the link below for new video:

If you like it, please Subscribe to, so that you can get latest updates and uploads immediately without fail.

For further watching my Videos previously published in this Lockdown you are welcome to click the links provided herebelow:


Thanks.

Tuesday, May 12, 2020

Saturday, March 28, 2020

पहाट झाली हे लक्षात आले कारण...

खिडकीतून ऐकू येत होता पक्षांचा किलबिलाट. बाहेर पाहिले तर अंधुकसा प्रकाश खिडकीतून झिरपण्यास प्रारंभ झाला होता. वा-याच्या झुळकीने झाडांच्या फांद्या आजूबाजूच्या फांद्यावर माना टाकीत होत्या. लडीवाळपणे आणि प्रेमाने जणू काय आपल्या माना एकमेकांवर घासून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करीत होत्या आणि त्यांचा तो लडीवाळपणा त्या होणा-या आवाजातून प्रगट करू लागल्या होत्या. त्यांना साथीला होता तो पहाटेचा समीर. 

कधी तो मंदपणे वाहत होता, तर कधी तो वेड लागल्यागत सुसाट वेगाने निघाला होता. त्या बेभान वा-याच्या बेभान स्पर्शाने मोठ मोठे वृक्ष जसे बेभान होऊन डोलत होते, तशा नाजूक, चाफेकळी सारख्या सुंदर नाजूक लयकारीने डोलणा-या लता-वल्लरी, किर्ती लहान पण कीर्ती महान असणारे छोटेखानी वृक्ष देखील एका नजाकतीने हळूवारपणे डोलतांना दिसून येत होते.

करकचून गाडीचा ब्रेक लागला आणि माझी तंद्रीच भंग पावली. एका गोड गुलाबी स्वप्नात मी हरवून गेलेलो होतो आणि आनंदात पुरता बुडालेला असतानाच ह्या एका ब्रेकने रंगाचा पूरा बेरंग करुन टाकला.

पहाटेच्या या स्वप्नात पार बुडालेलो असतानाच हा असूरी ब्रेक लागावा आणि स्वप्नभंग व्हावा यासारखे दु:ख ते कोणते? 

उठून अंथरुणात बसलो, तर खिडकीच्या बाहेरुन खरेच की पक्षांचा कलरव ऐकायला येत होता. झुंजूमुंजू पहाटेच्या संधीप्रकाशात तसे फारसे बाहेरचे दिसत जरी नव्हते तरी आजूबाजूच्या वातावरणातील गोडसा वाटणारा, स्पर्शाने थोडासा गारेगार वाटणारा वारा अंगावरुन जाताच डोळे विस्मयाने विस्फारले गेले आणि त्याचबरोबर जाणीव झाली, ती म्हणजे मी स्वप्नात नाही. हे तर सत्य समोर उभे ठाकले आहे. 

खरंच कां हे स्वप्न नव्हते. खरंच कां हे जे मी अनुभवत आहे ते सत्य आहे.

म्हणून अंथरुणातून ताडकन उठलो. खिडकीजवळ गेलो आणि बाहेरचा नजारा पाहण्याचा प्रयत्न करु लागलो.

तोपर्यंत मी साफ जागा झालेलो होतो. 

एका स्वप्नातून जागा होऊन, प्रत्यक्षात पृथ्वीवरील इतकी वर्षे हरविलेला स्वर्ग पहात होतो.

खरंच पृथ्वी इतकी सुंदर असू शकते कां? इतकी निरागस असू शकते कां? इतकी शांत-निवांत पाहावयास मिळाली असती कां? 

या अवनीवरील हे सुख आज जे पहावयास मिळाले, ते काय वर्णावे.

आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव आज ह्या एक दोन आठवड्यात घेतला असेल.

आपण खरोखरीच भाग्यवान. 

हे जरी खरे असले तरी ते भाग्य लिहीले गेले ते एका करोना व्हायरसमुळे. या करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग आपआपल्या घरांत बंदीस्त होऊन पडलेलं असतांना, प्रत्येकाला अनुभवायला मिळता आहेत ते हे क्षण. 

कधी माणसाला आपणा स्वत:कडे, आपल्या कुटुंबियांकडे पहाण्यास वेळ मिळत नव्हता, आजुबाजुला डोकावण्यासाठी सुध्दा तो आसूसलेला होता. ह्या वेळेच्या पांगुळगाड्याला तो जुंपलेला होता. 

अशा परिस्थितीत तो निसर्गाकडे कोठून पाहणार? निसर्गातील हे अनुभव कसे बरे घेणार? 

परंतु निसर्गच त्याच्या मदतीला धावून आला आणि
नकारात्मकतेतून सकारात्मक पहाण्याचा निसर्गानेच त्याला धडा दिला.

कोरोना - CORONA

Monday, February 17, 2020

साधना

साधना या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हे सत्य होय. यापैकी च एक म्हणजे *साधना* हा संधीयुक्त शब्द. 

*साधन* + *अ* = साधना (यामध्ये न+अ जोडला की ना होतो)

आता आपण हे लक्षात घेतले पाहिजे की *अ* हा *_अनंतामधील अ_* असे समजूया व त्यांच्याप्रत जाण्याचे जे *_साधन_* आहे ते समजूया *_अनंतांचे नाम_* म्हणजेच जे आपण _अनंतांचे म्हणा, आपल्या श्री सद्गुरू माऊलींचे जे नाम_ घेत असतो, ते असते, त्या _अनंताप्रत किंवा श्री सद्गुरू माऊलींप्रत पोहचण्याचे साधन_ आणि ह्या दोहोंचा जेव्हा व्याकरणातील संधी तयार होतो, त्यावेळेस आपण त्या संधीला *_साधना_*  ह्या नामाभिधानाने संबोधतो. _आहे की नाही गंमत._ याचाच अर्थ असा की *_साधना_*  ह्याचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ अर्थ आहे *_अनंताप्रत जाण्याचे जे साधन आहे, ते आहे, त्यांचे नाम_* आणि हेच *_नाम_* आपण ज्यावेळेस सातत्याने घेत असतो, त्यावेळेस आपल्याकडून होते ते *_नामस्मरण._*

_अशाप्रकारे जर आपण *_साधना_*  केली तर मग *_अनंत किंवा सद्गुरू माऊली आपणांपासून दूर राहू शकेल कां?_*

_म्हणून आपल्याला आयुष्यात काय "साधायचे" आहे हे ठरविणे, आणि ते प्राप्त होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच एका अर्थी साधना करने, हे आपले *_आद्य_* कर्तव्य ठरते._

*_अनगडाची ही बडबड,_*
*_आठवा मनोमनी सत्वर_*
*_कास धरुनीया नामाची_*
*_कापूया दोघांमधील अंतर_*

*_अंतराला देता अंतर_*
*_दिसो लागतील सद्गुरू चरण_*
*_चरणांत लिन होता_*
*_एकरुप होती सकलजण_*

*_द्वैत भाव मिटता ठायी_*
*_अद्वैत भाव जागे मनी_*
*_अनगडाचे चित्त लागे_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*

Sunday, February 16, 2020

दर्शन

*_दर्शन_*

*जय राम श्री राम जय जय राम*
*रामापरते अन्य नाही नाम*
*नामातच भरला आहे राम*
*मनी जपा सदा रामची नाम*

*नाम जरी असले राम*
*वेगळा नाही तो घनश्याम*
*श्याम म्हणा अथवा म्हणा राम*
*अखेर अनंतांचे अनेकची नाम*

*नामापरते नाही कोणते साधन*
*पूर्णत्वास जाईल अनुसंधान*
*मनोमनी धरता जाण*
*राम श्यामचे घडेल दर्शन........*
......... *_अनगड_* ..........

Saturday, February 15, 2020

देवाचा देव....

*🙏🏻" देव "🙏🏻*

कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही...

.....मनी नाही भाव
.....आणि म्हने देवा मला पाव.......

कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||

......देव माझ्यातच आहे
......हे मजला कळलेच नाही
.....देव आपल्यातच आहे
.....हेच मला समजले नाही.....

मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला, 
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक 
अजुनपर्यंत घावला नाही...||१||

......देव जरी मीच असलो
......माझ्यातच देव वसला
......उगाच वेड्यापरी मी
......आस लावून बसलो देवाला
.......देव काही बाहेर नाही
.......देव आपल्यातच आहे वसलेला
.......संस्कार माझ्यावर झाले नाहीत
.......मी कवटाळले सैतानाला

सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस...
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस...

.......पाऊस कुठं गेला नाही
.......हौसही माझी फिटत नाही
.......आभाळाकडं डोळे लावण्याऐवजी
.......कर्तव्यावर लक्ष देई
.......कर्म करने आपल्या हाती आहे
.......हातावर हात धरुन बसणे
.......आपला धर्म नाही

खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही...||२||

.......खुप करुन हरी हरी
.......मुखांत तो मावणार नाही
.......मुखी फक्त नाम
.......कर्तव्यापासून लांब
.......अशाला तो पावणार नाही
.......अशाला तो घावणार नाही

कधी स्वत: राहून उपाशी, 
भुक त्याची भागवली...
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली...
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही...||३||

.........फक्त उपास तापास करून
.........देव काही घावणार नाही
.........नैवेद्यावर साखर चढवून
.........देव काही पावणार नाही
.........देव बकरा काही मागत नाही
.........देव कोंबडा काही मागत नाही
.........ही सारी थेरं करुन
.........देव काही पावणार नाही
........तुच आहेस देव
........तुला सोडून नाही देव
........बाहेर काही तो घावणार नाही

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या...

........गाई असो किंवा माई
........कुणाला तो सोडून नाही

तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या...
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
त्यानं दावला नाही...

.........पुण्य आणि पापाच्या घागरी
.........आपणच आपल्या भरीत असतो
.........पाप पुण्याचा हिशेब
........आपणच आपला घडवित असतो

कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही...||४||

........कसा बरे सापडेल तो
........इथे तिथे भटकून
........मलाच माझी जाण नाही
........माझ्यातच आहे तो सामावून

कसे बरे सापडेल मला?
देव माझा मला सोडून
जाण नाही मजला तयाची
तोच आहे माझ्यात सामावून........

......अनगड म्हणे, 
.......मी कोणी नाही
.......मी नाही संत
......घ्यावयाचा असेल मजला
.......अंत तयाचा 
.......तर घ्यावा लागेल एकच मंत्र
........राम नाम घेता घेता
........करावे लागेल करतब (कर्तव्य)

*सौजन्य: संत गाडगे महाराज*

शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर

*_शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर........एक उमदे व्यक्तीमत्व.... संपूर्ण रोमारोमात शाहिरी भरलेला अवलिया... आपल्या श्री सद्गुरू दरबार परिवारातील बाबांच्या वेळचे एक सक्रिय कार्यकर्ते._*

_आपली मिलमधील नोकरी सांभाळून, दरबारात सातत्याने येणे-जाणे करणारे व त्यातूनही आपला शाहिरीचा व्यासंग हृदयापासून जोपासणारे.......असे हे तोडकर भाऊ सर्वस्वांबरोबर खेळीमेळीने वावरायचे...... दरबारच्या कार्यात सहभागी असायचे._

*_त्यांची आपल्या श्री सद्गुरूंप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी होती.....त्यांची दरबारसंबंधीची आस्था निर्विवादपणे बोध घेण्यालायक होती...... आणि त्याच तळमळीतून, त्याच तन्मयतेने, त्याच सहृदयतेने, त्याच कळकळीने त्यांनी आपले मनोगत शब्दांशब्दांतून वेळोवेळी प्रगट केले...._*

_ते मनाने जसे श्री सद्गुरू माऊलींचे होऊन गेलेले होते, तसेच त्यांनी शाहिरी पेशाला देखील वाहून घेतले होते.... आणि त्याच पोटतिडकीतून, त्यांनी आपल्या बाबांचे गुणगान गायिण्यासाठी शाहिरी तालात, शाहिरी सुरांत एका पोवाड्याची निर्मिती केली होती, तो पोवाडा आपणां समस्तांसाठी पुढे सादर करु......_

_त्यांनी आपल्या भूतलावरील छोट्याशा आयुष्यात कांही कवणे निर्मिली..... त्यापैकी एक होते....._

 *_समर्थ गुण गायिण मी, जरी जाहला माझा अंत_*
             *_परि गात मरावे श्री सद्गुरू गीत_*
             
 *_महन मंगले माऊली गे भगवंता_*
 *_तुझ्या चरणाशी नीत लागो, माझे हे चित्त_*

*_अखंड गुण गायिण मी, जरी जाहला माझा अंत_*
             *_परि गात मरावे श्री सद्गुरू गीत_*

याचबरोबर त्यांनीच आपल्या शब्दांत लिहिल्याप्रमाणे त्यांच्या पुढील कवणाची दखल घेणे येथे ह्यावेळी संयुक्तिक ठरेल. ते आपल्या कवणांत म्हणतात......

*_पुण्यवान माता ती, महान सत्याची जननी_*
*_तिच्या पोटी जन्म घेतला, श्री समर्थ बाबांनी_*
*_अमर किर्ती तिची पसरली, सर्व जगतावरती_*
*_त्या मातेचे उपकार मोठे, आम्हां सर्वांवरती_*
*_पूर्व जन्माची पुण्याई अमुची, फळास हो आली_*
*_म्हणून भेटली आज आम्हांला, श्री सद्गुरू माऊली_*

असे हे आमचे वंदनीय, आंतून बाहेरुन निर्व्याज प्रेमाने ओतप्रोत भरलेले, आपल्या उतारवयात देखील आपले श्री सद्गुरू माऊलींचे उत्सव न चुकविणारे आमचे मार्गदर्शक 
गुरुबंधू शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर, आज अनंतात विलीन झालेत. श्री सद्गुरू माऊली त्यांना आपल्या चरणाप्रत घेवोत हीच श्री सद्गुरू माऊली चरणी विनम्र प्रार्थना...........
*_अनगड_*


भाग्यवान आम्ही......

*_खरोखरच आपण आणि आपली पिढी ही खूप खूप भाग्यवान आहे, कारण आपणांस आपले सद्गुरू लाभले._*

*_इतकेच नव्हे तर आपल्या श्री सद्गुरू माऊलीने ह्याच वेळेस आणि काळात आपले सव्विसावे अवतारकार्य संपन्न करून आणि आपणा समस्त बंधु-भगिनींस आपल्या जवळ घेऊन, आपले नाम देऊन त्यांच्या प्रत जाण्याचा मार्ग प्रवचन रुपाने समजावून सांगून उपकृत केले._*

_खरोखरच आपण भाग्यवान नाही कां?_ 

*_उजळले भाग्य अमुचे,_*
*_उजळल्या अमुच्या ज्योती_*
*_चरणी घेता सामाऊनी_*
*_मनी गवसले मोती_*

*_मोतीयांचा हार करुनी_*
*_घातला तो गळा_*
*_सद्गुरु प्रसन्न होता_*
*_लाविला नामाचा हो टिळा_*

*_टिळा लाविता नामाचा_*
*_प्रकाश पसरे सारा_*
*_प्रकाशाच्या कल्लोळात_*
*_नजारा दिसे तो न्यारा_*

*_हरवूनी जातो मीपणा त्यात_*
*_उरतो फक्त ओंकार_*
*_ओंकार ध्वनी आळविता_*
*_एकलय होतो अपार_*

*_अनगडाची ही दुनिया सारी_*
*_ज्यास कुणा ती सापडे_*
*_कधीच मागे फिरून न पाही_*
*_लागे मनापासोनी ती आवडे_*

Sunday, January 19, 2020

गुरूकिल्ली

*_फार मोठी गोष्ट ह्या गुरुदेवांनी आपल्या भक्तांना उपदेश करताना सांगितलेली दिसून येते._*

_खरंच ! आहे कां हो वेळ आपल्या सारख्या कलियुगात राहणा-या भक्तांना ?_ 

_नेहमीच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ तरी असतो कां आपणाला?_

_हो हे ही खरेच म्हणा._ _सकाळी उठल्यापासून जे आपण या मायावी कर्तव्यात म्हणजेच आपल्या जबाबदा-यांमध्ये इतके लिप्त होऊन गेलेलो असतो की इतर ठिकाणी, आजुबाजूला बघण्यासाठीही आपल्याकडे वेळ नसतो, मग अशातच भगवंताची आठवण करायला वेळ कुठून असणार. नाही कां?_

_या गोष्टींवरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, भक्त सुज्ञ तर असतो, पण प्रत्यक्षात या आजुबाजूच्या मायावी स्थितीमुळे त्याच्या संज्ञा सगळ्या बोथट झालेल्या असतात._

_जो भक्त आपल्या गुरुदेवांना सांगत असतो की काय बरोबर आणि काय चुक, त्या भक्तालाच जर हे कळले असते की आपण कुणाला काय सांगतो आहोत, तर मग काय सांगावे?_ असे कदाचित घडलेही नसते.

*_ह्या गोष्टीवरुन असे वाटले की आपल्याकडेही असे हुश्शाsssर भक्तगण असतीलही नां?_*

अन्यथा ह्या अगोदर जे घडले, जे आता घडते आहे आणि जे पुढे भविष्यात देखील घडणार आहे, ते वरील उदाहरणात गुरूदेवांनी म्हटल्याप्रमाणे. 

*_ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह कधीच थांबणार नाही आणि वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला नदी पार करावी लागेल, त्याचप्रमाणे आपले हे (तुटपूंजे ६०/७० वर्षाचे) जीवन देखील संपुन जाईल, परंतु आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या कधीच संपणार नाहीत आणि आपणांस वेळही कधीच मिळणार नाही._*

_तरी सत् भक्तांनो ! वेळीच सावध व्हा आणि नदी आटण्याचा अट्टाहास करु नका._

*जो येईल तो वेळ आपला समजा आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा म्हणा, उपस्थिती म्हणा, सत् कर्तव्यता म्हणा, स्थानात येणे म्हणा, नामस्मरण करने म्हणा इत्यादी सात्त्विक गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न आपण सर्वस्वांनी करुया.*

*_सत् स्थानांचे महात्म्य कांहीं औरच आहे आणि त्याबद्दलची कल्पना आपल्याला आपल्या सतानेच दिलेली आहे._* 

*साक्षात श्री सद्गुरू माऊलींकडून आपणांस ते स्थुलात असतांना त्यांनी सर्वस्वांना समजावून सांगितलेलेच असल्यामुळे आपण आपला (अमुल्य) वेळ, थोडाबहुत कां होईना, वेळोवेळी श्री सद्गुरू माऊलींसाठी देऊन, त्यांच्या कर्तव्यात देऊन, आपले स्वत:चे कोटकल्याण करुन घेणे नाही कां उचीत ठरणार?*

एक लक्षात घ्या, हे सांगणारा मी कोण? मी कुणीही नाही. सद्गुरू माऊलींचा एक सेवेकरी, एक पाईक. परंतु, ह्या कथेवरून ह्या सर्वस्व गोष्टींची आठवण झाल्याने फक्त एक आठवण म्हणून येथे हे कथन करता झालो एवढेच. मनाला भावली, मनाला भुरळ घातली आणि अंत: करणापर्यंत पोहोचली. निमित्ते काही गोष्टी आठवल्या, वाटल्या, त्यांची उजळणी व्हावी या हेतूने येथे मांडल्या. कुणी किती घ्यावे, कुणी काय घ्यावे, कुणी किती महत्त्व द्यावे, हे सर्वस्व ज्याचे त्याने ठरवावयाचे आहे. 

बस इतकेच सांगावेसे वाटते की आपण, आपला दरबार, आपला मुळाश्रम, आपले सद्गुरू, आपल्या श्री सद्गुरू माऊलींची शिकवण, आपल्या दरबारची ठेवण अशी कितीतरी वैशिष्ट्यें ही बाहेर इतर कुठेही सामान्यरित्या सापडू शकणार नाहीत अशी आहेत.

आपले स्थान हे आदीअंतापासून असलेले व आदीअंतापर्यंत राहणारे असे, आपल्या, तसेच ह्या विश्र्वाचे जे मालिक आहेत, त्या सताचे, त्या ओंकाराचे हे स्थान आहे, जे स्वयम् आहे. या स्थानामध्ये स्वयंम् प्रकाश आहे आणि ह्या स्वयंम् प्रकाशात नुसते येऊन बसणे हे देखील भाग्याचे लक्षण आहे. मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्यावर बाहेरच्या वातावरणामुळे जी मायेची पुटें चढलेली आहेत, त्यांचा नाश करण्याची क्षमता ह्या स्थानातील स्वयंम् प्रकाशात आहे. 

इतकेच नव्हे तर ह्या स्थानात जसा आपल्या मानवी भक्तगणांचा वावर असतो, तसाच सतत चोवीस तास वावर अदृश्य रितीने असणा-या भक्तांचा देखील असतो, त्यामुळे जो कुणी ह्या स्थानांत उपस्थित असतो त्याला नकळतच त्या गोष्टीचा लाभ पोहोचतच असतो. मग तो नामस्मरण करीत असो वा नसो, ध्यानधारणा करीत असो वा नसो, अथवा कर्तव्यकर्म करीत असो वा नसो. त्याशिवाय चोवीस तास निरंतरपणे सतांचा शुभ आणि शुभ्रप्रकाशाचा वर्षाव देखील अव्याहतपणे बरसत असल्याने सोन्याहूनही पिवळे असाच हा योग असतो. अशा परम् पवित्र सत् स्थानांत, सान्निध्यात आपण आपला वेळ घालविला, तो वाया जाईल काय? आपला आपणच विचार करा आणि ठरवा आपल्या आयुष्याची वाटचाल कशी करावयाची ते !

*_अपले भाग्य अपुल्या हाती_*
*_चालवावी अपुली मती_*
*_अनगड म्हणे हे जगरिती_*
*_द्यावी आपण तिलांजली_*

👏🙏👏💐🌹🌷👏🙏👏💐🌹🌷

भगवान हैं........

*_भगवान है !_*
*_सभीमें है_* - तुममें, हममें !
इसीमें, उसीमें ! इन्सानोमें, जानवरोंमें ! जलमें, थलमें ! आकाशमें, पातालमें ! दश दिशाओंमे ! और इस सबसे परें भी!!!

*_वह जगह नहीं, जहां भगवान नहीं._* 

*_वो ना तुमें छोडकर है._* *_ना वो तुमसे अलग हैं_* 
*_वह तुम्हारे अंदरही, तुममें समा हुआ हैं_*

*_सिर्फ हम भुल गये हैं यह बात, जिस वजहसे हम एक दुसरेसे लडते है, झगडते है. इन्सानियत भूल जाते है और अपने ही कोशमें लिप्त रह जाते हैं_*

सबसे बढीया बात तो यह हैं की हम सभी लोग उस भगवान के साथ उनकेही घरमें होते हुएभी मेरी-तेरी करते रहते हैं ! इतना ही नहीं तो एक दुसरेकी पतंग कटवाने के लिये जंग जंग पछाडते हैं, चेष्टा करते हैं और मौका ही धुंडते रहते हैं की कब मैं इसको काट दूं और उसपर मात कर दूं !

क्या यह हमें शोभा देता हैं? कोई कभी ये भी गौरसे सोचता हैं की मेरे सद्गूरु यह कहते थे की यह मेरा परिवार हैं ! क्यों हम यह भूल जाते हैं, हमारे भगवान की यह सोच? सिर्फ और सिर्फ चंद स्वत:हके लाभके लिए ? की हम मानतेही नहीं हमारे सद्गूरु नें दी हुई सीख को की  *"यह मेरा परिवार हैं !"*

कितनी बडी बात कही हैं इस मायावी जगतमें हमारे सद्गूरुजीनें की यह मेरा परिवार हैं, जब की आपके खुदके रिस्तेदारभी कभी यह बात कहनेसे डरते दिखाई देते होंगे ! इस कलियुग में सचमें मानो तो कोई किसी का नहीं हैं ! और ऐसे समय सद्गुरूजींका यह कहना की *तुम सभी मेरा परिवार हो* परिवारसे एक रत्तीभी कम नहीं, बल्की ज्यादाही हो ! और बस ! यह बात सिर्फ कहनेके लिए ही नहीं, तो प्रत्यक्ष आचरणमें लाना, इससे और बडी बात कौनसी हो सकती हैं !

तो हम कब डरेंगे, अपनी गलत सोचसे? अपने गलत व्यवहारसे? अपने गलत रंगो-ढंगोंसें? कंपनी गलत रहन-सहनसें? 

हम कब पुछना छोड देंगे *क्या असलमें भगवान मौजूद हैं?* हम सब कब समजेंगे की हां, सारी सृष्टीका निर्माणकर्ता वो भगवान ही हैं ! 

देखो सृष्टी की ओर ! क्या दिखाई देता हैं? सृष्टी में जगह जगह बिखरी हुई अलगता ! जगह जगह बिखरी हुई वैविध्यता ! रंगों रंगोंका अलगपण ! आसमानकी ऊंचाई ! समुंदरकी गहराई ! अवकाश की निलाई ! सुरजकी गरमाई या फिर रोशनी ! चांदकी शितलता ! हर मनुष्य में पाया जानेवाला अलगपण ! क्या इस सभी की कभी हम छानबीन कर सकते हैं ? जिसका उत्तर नकारार्थी ही होगा ! तो हम कैसे पुछ सकते हैं की *क्या, भगवान हैं ?*

Thursday, January 16, 2020

बदलापूरायन

बदलापूर - एक सेंट्रल रेल्वेवरील कर्जतच्या दिशेने असणारे सर्वसामान्य रेल्वे स्टेशन. हे ठाणे जिल्ह्यात असून ह्याचे सर्वसाधारण क्षेत्रफळ अंदाजे ३५.६८ स्के.मी. इतके आहे. 

येथे आल्यावर पाहण्यासाठी जवळपास उपलब्ध असणारी ठिकाणे म्हणजे कोंडेश्वर मंदिर, मलंगगड, चिखलोली (अंबरनाथ) आणि बारवी धरण, माहुली शिखर, कोंडेश्वर तलाव, चंदेरी किल्ला, विस्परींग पिपल रिसाॅर्ट, धनगर धबधबा इत्यादी इत्यादी.

आम्ही येथे आलो कारण आमचे एक मित्र आणि सत्संग परिवारातील स्नेही चंद्रकांत येवले यांच्या आग्रहाखातर, जे गेल्या काही वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. 

येथे उतरल्यावर मुंबईच्या उपनगरीय स्टेशनांसारखेच हे छोटेखानी स्टेशन असून, बाजूलाच भलामोठा स्कायवाॅक बांधलेला दिसून येतो. ह्याचे नांव हेनरेपाडा फुट ओवरब्रीज असून, तो बाजूच्याच सर्वोदय नगर एरियाचा भाग आहे.

आमच्या यजमानांनी आमची चोख व्यवस्था अगोदरपासूनच करुन ठेवलेली होती. त्यामुळे जसे आम्ही स्टेशनवर उतरलो, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत करुन पलीकडे उभ्या करून ठेवलेल्या इको ह्या मोठ्या टॅक्सीत नेऊन बसविले. 

जाता जाताच यजमानांनी आम्हांस कल्पना दिलेली होती की आपणांस बदलापूरच्या एका प्रसिध्द वडेपाववाल्याकडे *मुळगांवचा वडापाव* जायचे आहे आणि तेथून पुढे मग डॅमवर (धरणावर) जावयाचे आहे.

दहा-पंधरा मिनिटांत आम्ही आमच्या संकेतस्थळावर पोहोचलो देखील. बाहेरच ब-याचशा गाड्या पार्क केलेल्या लांबूनच दिसून येत होत्या, त्यामुळे क्षणभर असे वाटून गेले की आपला नंबर लवकर काही लागणार नाही. परंतू घडले विपरीत. जसे आम्ही गाडीतून उतरून बाहेर पडलो, तेव्हाच कळले की आज म्हणावी तेवढी गर्दी नसल्याने, आम्हांला लवकरच एकत्र बसण्याची जागा उपलब्ध होणार आणि झालेही तसेच.

झाले. ताबडतोब आॅर्डर दिली गेली आणि कांहीं वेळातच गरमागरम मुळगांवचा फेमस वडापाव आमच्या टेबलांवर हजर झाला. प्रथमतःच कागदाच्या प्लेटवरील वडापाव पाहून मन समाधानी पावते न पावते तोच बाजूलाच प्लेटवर मिरचीच्या हिरव्यागार रंगाची ठेच्याची चटणी पाहून गर्भगळीत व्हावयास झाले. त्या ठेच्यातून हिरवट पिवळ्या रंगाचा तेलाचा पाट वाहताना पाहून वाटले, आता आपले काही खरे नाही.

परंतु, गंमत अशी की दृश्य जेवढे भयानक वाटत होते, तेवढे ते प्रत्यक्षात नव्हते. जरी हा हिरव्यागार मिरचीचा ठेचा होता, तरी तो आपल्या नावाला न जागणाराच होता आणि म्हणूनच की काय थोड्या वेळाने पाहतो तर ठेचा प्लेटवरून गायब झालेला होता आणि फक्त हिरवा पिवळा तेलाचा ओघळ तेवढा प्लेटवर शिल्लक राहिलेला होता.

अशाप्रकारे सकाळच्या नाश्त्यावर येथेच्छ ताव मारुन आमची पलटण पुढच्या प्रवासाला निघाली. झाले. थोड्याच वेळात आम्ही डॅमच्या एका कोपरावर आलो. दुर्दैव असे की धरण पाहण्यासाठी यावेळी रितसर परवानगी देण्यात आलेली नसल्याने सर्वचजण नाराज झालेले होते. कारण डॅमवर सैरसपाटा मारण्यास यावेळी मिळणार नसल्याने पुढील कार्यक्रमाचे आता काय करायचे अशा विचारात असतानाच, आमच्या सोबत आलेले, तेथीलच एक ग्रामस्थ श्री रवी यांनी एक उपाय सुचविला. म्हणाले, आपण धरणाच्या खालील भागात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाखाली जाऊया. थोडा वेळ पाण्यात पाय भिजवूया. 

ठरले. आयडियाची कल्पना सगळ्यांनाच आवडली. खाली उतरण्यासाठी असलेला रस्ता शोधू लागलो आणि शिवाजी महाराजांचा काळ आठवला. किल्ल्यावर जाताना जसा एकपदरी दगडाधोंड्यांचा रस्ता असायचा, बाजूलाच खोल दरी असायची, तसा हा रस्ता भासला. रस्ता कसला? हि तर पायवाटच होती. होय नाय होय नाय करीतच आम्ही शेवटी खाली उतरण्यात यशस्वी झालोच.

येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आम्ही भेट दिलेली ही वेळ येथे येण्याची नक्कीच नव्हती. त्यामुळे येथे जे दृश्य दिसत होते ते म्हणजे सर्वत्र पसरलेला काळा कातळ. काही ठिकाणी निसर्गानेच निर्माण केलेले पाण्याचे डोह. काही खोल, तर काही उथळ. पुलावरून पाणी वाहून जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण हा काही पावसाळी हंगाम नव्हता, ज्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देत असतात. 

खाली उतरतानाच रवी भाऊंनी कल्पना दिलेली होती की जो दूरचा डोह आहे, तेथे मात्र कुणी जाऊ नका, कारण तो एक अॅक्सिडंट स्पाॅट आहे. तेथे जाणे म्हणजे जाणूनबुजून आपण अपघात अंगावर ओढून घेतल्यासारखे होईल. तेथे पावसाळ्यात हमखास अपघात घडून येत असतात. कारण पावसाळ्यात पाण्याच्या खोलीची कल्पना नव्याने येणाऱ्या पर्यटकांना येत नाही आणि त्यामुळें नाहकच अपघात घडून जीवावर बेतण्याचे प्रसंग सुद्धा उद्भवतात.

थोड्या गमंती जमती करून, मनोरंजनात्मक कार्यक्रम करून पोटात कावळे ओरडायला लागल्याने आम्ही तेथून काढता पाय घेतला. रवी भाऊंच्या घरी अगोदरच जेवणाची सोय करून ठेवण्यात आलेली असल्यामुळे सगळ्यांचे पाय आपसूकच तिकडे वळले. जेवणाचा बेत हा घरगुतीच असल्याने कित्येक दिवसांनी गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळणार असल्याने पाहुणे मंडळी खूप खुष होती. दोन्ही प्रकार - वेज, नाॅनवेज उपलब्ध होते. नाॅनवेजमध्ये गावठीचा बेत होता, तर वेजमध्ये वरण भात, उसळ, चुलीवरची ताजी ताजी तांदळाच्या पिठाची भाकरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंडळींनी येथेच्छ मन सोडून भोजन केले, ते यजमानांचे गुणगान गातच. किती दिवसांत असे गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळाले नव्हते आणि मिळणारही नव्हते. याचे अप्रुप काही वेगळेच होते.

तेथेच कांहींनी आराम केल्यावर, पुढे कोंडेश्वर मंदिरास भेट देण्याचे ठरले. हे ठिकाणही एका बाजूला असून, तेथे आजूबाजूला डोंगर, डोह, कातळ, आणि जंगलच असल्याचे जाणवले. हा ही एक निर्जन भागच आहे. जुने शिवाचे मंदिर असून, बाजूलाच डोह देखील आहे. येथील डोहात देखील पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांचे अपघात घडत असतात. त्यामुळे हा ही भाग तसा सुरक्षित नाहीयय. परिसरात ह्यावेळी तरी स्वच्छता पाहावयास मिळाली. मुख्य कमानीपासून बरेच आत हे मंदिर छोटेखानीच आहे. येथे लिंग स्थापिलेले असून, गाभाऱ्यात मात्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य खुललेले असावे, हे आजूबाजूचा प्रदेश डोळ्याखालून घालताच जाणवते. श्री शंकराचे हे स्थान असल्यामुळे येथे जाणवणारी शांतता देखील भयाण असल्याचे जाणवते. माणसांचा वावर येथे दिसून येत नसल्याने, ती प्रकर्षाने जाणवली असावी इतकेच.

तेथून पुढे परतीचा प्रवास आटोपून आम्ही बदलापूर स्टेशन कधी गाठले हे कळलेच नाही.

अनगडवाणी