Saturday, January 22, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला)..............1


पाचवा प्रणव वेद (भाग पहिला)
पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होतो? तर तो आपणास ज्ञान मार्गामुळे मिळतो. स्वयं प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञान मार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद् गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरुंशी बोलणे, चालणे होवू लागले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला. जरी पाचवा प्रणव वेद प्रगट झाला तरी त्यातही आपल्याला भर घालवायची आहे. प्रणव येणे बोल. जसे आपण बोलणे ऐकतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ओमकारस्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगत झाला असे म्हणता येईल.

मग अशी ज्योत सद्गुरू सान्निध्याने कुठेही जावू शकते. सद्गुरू सान्निध्या शिवाय हे होणे शक्य नाही. पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्याशिवाय आपल्याला गुरुगुह्य काय आहे, हे समजणार नाही. जोपर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणव वेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही, तोपर्यंत आपले सद्गुरू काय आहेत याची तो जाणीव घेवू शकणार नाही. आपले सद्गुरू ओळखू शकणार नाही. पाचवा प्रणव वेद सुरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो. आम्ही हे म्हणतो हे खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते. सद्गुरूंना संदेश आपण पहातो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सुक्ष्माने कुठेही आदेशानुसार जावून येते की नाही?
पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्याखेरीज ही जी देवाण-घेवाणीची त-हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची त-हा साध्य होणार नाही, साध्य होवू शकणार नाही. पण पाचवा प्रणव वेद सिद्ध होण्यासाठी, सापडण्यासाठी भक्ताने वा सेवेक-याने काय केले पाहिजे? तर नामस्मरण केले पाहिजे. मनाने झटले पाहिजे. सेवेकरी नामस्मरण तर करतोच आहे. आम्ही नाही असे म्हणत नाही. पण नामस्मरण कसे केले पाहिजे? क्रमश:पुढे चालू ........................(२)

अनगडवाणी