Thursday, March 3, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-6)



आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मूनिन्बरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते. मग, या अशा आसनाच्या सेवेक-याची पटली कशी हवी? तर अत्यंत उच्च गतीची हवी. जरी आपण या कलीयुगात असले तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत, मग आपल्या विचारांची गती, विशालता उच्च हवी. ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, “आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथे या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे.” त्यांनीच पुढे संदेश दिले, “तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ”. तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो अशा मानवाची जार तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ट नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठविल का? आमचे संदेशच असे आहेत, “सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुला मला डोळे भरून पाहता येईल.” पवित्र आचरण नसेल, तर तू कसा बरे मला पाहू शकशील. मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा का मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”
असा दृढ:निश्चयी भक्त असेल, त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणव वेदही प्रगट होतो.
हे जे स्थान आहे, ते सत् पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही, ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत. तेथे ऋद्धी-सिद्धी नाही. तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तीचा मार्ग आहे – तो म्हणजे नामस्मरण ! ध्यान धारणा अन् मन सत् चरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ती केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे त्याच्या ठिकाणीच अनंतांचा वास आहे. त्या ठिकाणीच अष्ट सिद्धी देखील वास करू शकतात. ज्या ठिकाणी ओम्कारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथे काय शिल्लक आहे? ज्या ओम्कारांच्या ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ती हात जोडून उभ्या असतात असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेक-याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा ! पण आपण एवढेच म्हणायचे, “अनंता ! मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो.” आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थूल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथे जवळच असते पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जार पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणव वेद पाहिजे. ज्योत पाहता आली पाहिजे तिच्या बरोबर बोलणे करता आले पाहिजे. जे भक्त आहेत ते सत् सान्निध्यात आहेत. सूक्ष्म त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामीनी म्हटले आहे, “वाजे पावूल अपुले, म्हणे मागोती कोण आले?”
जेथे शंकराचे स्थान तेथे पिशाच्च त-हा असणार पण जेथे श्रीहरीचे स्थान तेथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो भक्त आहे.

समाप्त .....................

Tuesday, March 1, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-5)



समजा पाचवा प्रणव वेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरू दर्शन तरी मिळवा. शुभ्र प्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होवू शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत, मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थूल गेले. तुमच्या स्थूलत वास करणारे तत्व तुमच्या बरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सातचे सत् चरण तुम्ही पाहणार आहात, ते तत्व! मनाला जाणीव देवून मनाला हलविते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही जरी गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जान असते. या पंचमहाभूताच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताला सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जे स्थूल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत. तू आणि सत् एकच आहेत. कवचात तूही आहेस अन् कवचात सत्, मी देखील आहे. आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याच्या प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंच महाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देवून कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुनांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलत कसे प्रवेश करतात हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे का? मनाने बाजार गप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते, सेवेकरनीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्च्यर्या केली? आपल्या आसनाजवळ लाघव आहेत, लाघव झाल्यावर, त्रास होवू लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, “लाघव करण्यासाठी चैत्यन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या, चैत्यन्याला त्यांनीच निर्माण केले, आम्हालाही त्यांनीच निर्माण केले, अधिकार देखील त्यानीच बहाल केलेत अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच ! जन्माला त्यानीच पाठविले. तुमचे पालन पोषणही तेच करीत आहेत. दही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेतांना आपणही स्थिर आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असून देखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतीना आपली चूक काय झाली हे कळू नये तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे? उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्या कडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे. आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड येणे शुध्द शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरू कधीही शांत बसणार नाहीत पण ते बनवाबनवीचे अश्रू असतील तर लक्ष हे देणार नाहीत. क्रमश:पुढेचालू ........................(५)

अनगडवाणी