Tuesday, December 25, 2018

वादे वादे जायते तत्वबोध:

👏👏👏

*_वादे वादे जायते तत्वबोध:_*

अर्थ - शब्दशः अर्थ असे सांगतो की, सुसंवाद केल्याने चांगले तत्वविवेचन होऊन ज्ञानप्राप्ती होते.

*अभिमान कशाने निर्माण होतो?*
तर *_असंगाने अभिमान निर्माण होतो._* (म्हणजेच वाईट माणसांशी संगत केल्याने वृथा अभिमान निर्माण होत असतो.) ह्यासाठी बाबा म्हणतात, *"अहंकाराची बाधा आपल्या मनाला लागू द्यायची नाही. अहंकार आपल्या मनाला शिवू द्यावयाचा नाही."*

बाबा पुढे म्हणतात, "आपला जो सत्संगाचा पाया आहे तो मजबूत करण्यासाठी नितीमत्ता अंगीकारा व त्या सताजवळ त्यांचे अखंड दर्शन मिळण्यासाठी टाहो फोडा. मानवाने सत्संग हा केलाच पाहिजे."

त्यासाठी मानवाने काय केले पाहिजे?
तर *मानवाने सत्संग केला पाहिजे.* त्यासाठी *सद्गुरू माऊलीना शरण गेले पाहीजे.* *सद्गुरू हे परब्रह्म मानले पाहिजे.* सदासर्वकाळ त्या *सद्गुरू माऊलींचे नाम मुखी घ्यावयास हवे.*

*_सद्गुरू हे सेवेक-यास अज्ञानाच्या अंध:कारातून बाजूला सारून पूर्ण प्रकाशाच्या मार्गाने घेऊन जाणारे तत्व असून, ते सर्वव्यापकही आहे._*

सर्व व्यापक म्हणजे सर्व ठिकाणी व्याप्त (चरात चर, परात पर, क्षरात क्षर, इतकेच नव्हे तर ते अणू, रेणू, परमाणू ह्यामध्ये असूनही अलिप्त असणारे असे ते तत्व आहे) असणारे असे ते तत्व आहे.

बाबा पुढे म्हणतात, "तुमची भूमी शुद्ध असेल तर *(भूमी शुद्ध करी, ज्ञान बीज पेरी)* पुरुष / स्त्री हा भेदाभेद त्यांच्याकडे नसतो, त्यामुळे अशावेळी ते भक्तात ज्ञान बीज पेरून, नाम बहाल करून, त्या भक्ताला भगवंताप्रत पोहोचण्याचा राजमार्ग खुला करून देतात."

तो राजमार्ग कसा असावा? तर त्या सद्गुरू माऊलींचे स्मरण करताच तेथे ज्ञान प्रसवावयास हवे. अर्थात ती दिव्य दृष्टी त्या भक्तास प्राप्त होते. त्या दृष्टीच्या सहाय्याने तो भक्त त्या सद्गुरू माऊलींच्या चरणांत तादात्म्य होऊन जातो.

म्हणून श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, "नितीने जा, अनितीस दूर सारा. मी नितीने जाणार अशी भीष्म प्रतिज्ञा करा."

 *अंतकाळीचा बा पांडुरंग !* हे नेहमी लक्षात ठेवा. इतर कुणीही अंतकाळी आपल्या मदतीला धावून येणार नाही, शिवाय श्री सद्गुरू माऊली. आणि अशात-हेने तुम्ही जर वाटचाल केलीत, तर तो भगवंत आपल्या पासून कधीही दूर राहणार नाही. ती श्री सद्गुरू माऊली आपणापासून कदापिही दूर राहू शकणार नाही.

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐

No comments:

अनगडवाणी