Tuesday, November 27, 2018

जगत जननी

🙏👏🙏

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी*
*भगवान महाराज यांची*
*अमृतवाणी*

आपले बाबा आपणास सांगतात, *"आपण जिला जगत् जननी म्हणतो तीच जगद् माता!"* पुढे या गोष्टीची आठवण करून देताना म्हणतात, "जगत माया निराळी."

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, बाबा म्हणतात, *"जगत् जननीला सर्व अधिकार आहेत. पण या आसनासमोर अधिकार नाहीत."* आपले बाबा असे का बरे म्हणत असावेत? *कारण आपला हा दरबार सर्वसाधारण दरबार नव्हे, तर तो सताचा दरबार आहे. ॐ कारांचा दरबार आहे. येथे सताशिवाय इतर कुणाचाही अधिकार लागू होत नाही.* 

बाबा पुढे जगत् जननीला सांगताना म्हणतात, "कोणत्या सेवेक-यावर लाघव करावे, कोणावर करू नये ह्याची जबाबदारी तूझी, ते तू जाण."

आठवण करून देताना पुढे म्हणतात, "क्षमा द्यायची आहे. पण तशी क्षमा करता येणार नाही."

बाबा पुढे म्हणतात, "सेवेक-याची कसोटी घेतली तर तिची सुद्धा कसोटी घेणारा कोणीतरी आहे." म्हणजे काय? तर तिला जरी मानवांची परीक्षा घेण्याचे अधिकार असले, तरी सुद्धा ती देखील परीक्षाधीन असून, सताच्या परीक्षेला तिला देखील सामोरे जावे लागणारच आहे.

सत् काय करते? तर प्रथम कसोटी घेते आणि त्या कसोटीत पास झाल्यानंतरच कार्य सुपूर्द करते.

आपणा सर्वांना आठवण करून देताना म्हणतात, *"जगत् जननी सामान्य तत्व नाही, तर ते सुद्धा महान तत्व आहे."*

हे जरी खरे असले तरी बाबा जगत् जननीला म्हणतात, "सेवेकरी अडाणी असले तरी तू जाणीव घेतली पाहिजे." पुढे जाणीव करून देताना म्हणतात, "ज्याला परमपदाचा अधिकार आहे अशी तू सेवेकरीण असलीस तरी या दरबारात तूझी किंमत शून्य. जगत् जननी कुणाला वर पाठवीत नाही. नाना क्लुप्त्या करुन खालीच पाठवते." दरबारच्या बाबतीत तिची पायरी ठेवली आहे. तिला म्हणजे *"जगत् जननीला उत्पन्न करणारा कोणीतरी आहे."* 

बाबा पुढे सेवा, पूजा ह्या बाबतीत मार्गदर्शन करताना म्हणतात, *"सेवेक-याने वेडीवाकडी पण समाधानाने केलेली सेवा त्या ठिकाणी (सद्गुरू चरणांवर) पोहचते. पण पूजा करताना सेवेक-याची भावना कशी हवी? तर शुध्द. भावना शुद्ध नसेल तर सेवा पावन होणार नाही."* 

तसेच सेवेक-याला पूजेची माहिती नाही पण त्याने श्रध्देने केलेली पूजा मला पावन आहे असे बाबा म्हणतात. बाबा विचारणा करताना म्हणतात, "सेवेक-यामध्ये भोळा भाव व अखंड लीनत्व केव्हा येते? तर त्याच्याकडे शुद्ध आचार विचार असल्यासच ते असते. लीनत्व शुध्द असल्याशिवाय लीनत्व राहणार नाही." *लिनत्व असणा-या सेवेक-याच्या सानिध्यात परमेश्वर येतो.*

बाबा पुढे म्हणतात, "सेवेकरी एकतर अडाणी किंवा पूर्ण ज्ञानी तरी असावा, अतीविव्दान नसावा."

बाबा विद्वान कोणाला म्हणतात? 
जो प्रत्येक गोष्टीतून त्या चाकोरीच्या चौकटीत बसतो तो विव्दान. बाबा विद्वानाला महत्व देतात, अतीविद्वानाला नव्हे.

"जो योग्यतेचा सेवेकरी असेल, त्याची योग्य सेवा, योग्य तर्‍हेने त्याला शोभली पाहिजे. सद्भावना व लीनत्व ज्याच्याकडे आहे, त्याची सेवा सद्गुरू चरणी रुजु आहे."

*"समर्थांनी एकदा आदेश दिले तर ते कायमचे असतात"*, असे श्री सद्गुरू माऊली म्हणते.

पुढे सद्गुरू माऊली म्हणते, *"सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या."*

ह्या संदर्भात आठवण सांगाविशी वाटते ती म्हणजे, काही काही वेळा दरबार सुरू असताना, मध्येच असा काही सुगंध सुटायचा की तो सांगता यावयाचा नाही. तो फक्त अनुभवता यावयाचा. बरे ! तो कुठून येतो, कसा येतो, कशाचा येतो ते काहीही कळत नसे इतका तो अवर्णनीय असा परिमळ असायचा. संपूर्ण वातावरण एका अलौकिक सुवासाने दरवळून जायचे. असा तो सुगंध क्षणीक, काही क्षणांपुरताच असावयाचा, पण तो आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जायचा. आणि असे ज्यावेळेस घडायचे त्यावेळी नक्कीच श्री मालिक येऊन गेल्याची जाणीव व्हावयाची. असा तो काळ म्हणजे साक्षात श्री सद्गुरू माऊलीने आपल्या सर्वांसाठी प्रत्यक्ष अनुभव उघड करून सप्रमाण दाखवून दिल्याचा तो काळ होता. ह्यासाठीच बाबा म्हणायचे, "सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या." हे जरी सत्य असले तरी ती आपली कुवत होती कां? तर नाही.

बाबांचे सांगणे होते, *"सुगंध मिळणे हे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. तो सुगंध निराळाच वाटतो. त्या ठिकाणी एकाग्र व्हा. सुगंध आला, मालिक येऊन गेले असे समजू नका. सेवेक-यावर समर्थाचे अखंड लक्ष असते. कार्य करीत असताना सुगंध आला तर लीन व्हा.*

No comments:

अनगडवाणी