Tuesday, November 27, 2018

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात*........

👏👏👏

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात*........

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात त्यांची ओळख करून घेता आली पाहिजे* असे जेव्हा आपले बाबा म्हणतात, त्यावेळी त्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे?

बाबांजवळ एखादी नवीन व्यक्ती दर्शनासाठी आली की, बाबा त्यांना सांगत की, आंधळेपणी मला शरण जाऊ नका. मला आपण सद्गुरू म्हणून जर स्वीकारत असाल, तर तत्पूर्वी मला जाणून घ्या, आपले होणारे सद्गुरू हे कोण आहेत? ते पडताळून पहा. त्याना हवे तर तावून-सुलाखून घ्या. हे सगळे केल्यानंतर जर आपणास वाटले की, आपले सद्गुरू पदासाठी योग्य आहेत, मगच त्याना शरण जा. पण हे लक्षात ठेवा की, एकदा का तुम्ही त्यांना शरण गेलात की मग आपल्या सद्गुरूना चाचपण्याचा, त्यांच्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.

इतकेच नव्हे तर, *आपले सद्गुरू हे कोण आहेत हे जाणल्यानंतर, आपणास त्यांना स्वतःच्या दृष्टीने पाहता आले पाहिजे,* असे आपले बाबा आपणास सांगतात. याचा अर्थ काय?

येणे आपणास डोळे बंद करून ज्यावेळेस नामस्मरण करावयाचे असते, त्यावेळेस आपल्या बंद असलेल्या डोळ्यांसमोर आपल्या सद्गुरूंची मूर्ती साकारावयास हवी. आपले बाबा आपणास, जसे ते आपल्या चर्मचक्षूना दिसत असत, तसे ते दृष्टी बंद केल्यानंतरही पाहता आले पाहिजेत. मग आपणाला कळू शकेल की आपले बाबा हेच सतही आहेत. म्हणजेच आपणास कल्पना येईल की *सगुण आणि निर्गुण* हे दोन्ही तेच आहेत. अर्थात त्यासाठी आपले नामस्मरण सुद्धा तेवढ्याच उच्च पातळीवरचे असावयास हवे. आपली सता प्रतीची भक्ती देखील तेवढ्याच उच्च गतीची असावयास हवी. तेव्हाच हे शक्य होईल.

बाबा पुढे म्हणतात, "ते (सद्गुरू) सांगतात ते आपण आचरणात आणा. *जे अनन्य भावे माझ्या भक्तित निपूण आहेत, त्याला समर्थ कधीही उपाशी ठेवणार नाहीत*" आणि हे आपणांपैकी कित्येकांनी अनुभवले तर आहेच, तद्वत ते अजून सुद्धा अनुभवत आहेत.

श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, *"समर्थ मतलबी मायेला भाळणारे नाहीत."* हे आपल्या बाबांचे म्हणणे शंभरच काय तर एकशे एक टक्के सत्य होय. आपल्या बाबानी मायावी मायेला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व कधीच दिले नाही. मायेने देखील, सुरुवातीच्या काळात बाबांचा येणे सताचा कस घेतला असताना देखील, बाबांनी तिला कधीही महत्व दिले नाही, म्हणून तिने बाबांना स्थूलात असताना भरपूर त्रास देखील दिला. परंतु बाबा त्यावेळेला तिला किंवा तिच्या मायावी त-हेला कधीही भुलले नाहीत.

सद्गुरु महिमा किती अगाध आहे, याबाबत ते म्हणतात, *"वेळेला समर्थ सेवेकऱ्याचे अर्धे संचित आपल्यावर घेतात. त्यांच्याखेरीज मायेचा पुत सुद्धा हे घेऊ शकणार नाही."* ह्याची बरीच उदाहरणे आपल्यापैकी ब-याच गुरूबंधु भगिनींनी प्रत्यक्षात या दरबारात अनुभवली देखील आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, *ते समत्व बुध्दीने पाहतात.* त्यांच्याकडे द्वैत भाव नसून, ते अद्वैत भावाचे पाठीराखे होते. त्यांच्याकडे दुजाभाव अजिबात नव्हता. माझे तुझे नावाला देखील नव्हते. एक जवळचा व दुसरा दूरचा असेही नव्हते. सगळे त्याना समान होते. त्यांच्याकडे लहान मोठा, गरीब श्रीमंत हा भेदभाव था-याला देखील उभा राहू शकत नव्हता. असे ते आपले सद्गुरू होते. अशा सद्गुरूंचे आपण सेवेकरी आहोत, हे प्रत्येकांने लक्षात घेऊन आपली वाटचाल करावयास हवी.

💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷

No comments:

अनगडवाणी