Saturday, October 20, 2018

नर (मनुष्य) देहानंतर

👏👏👏

नर (मनुष्य) देहानंतर पुन्हा देह नाही हे म्हणने तितकेसे बरोबर नाही. कारण मनुष्य देहामध्ये असतांना आपण जे कांही कर्तव्य करीत असतो त्याचा लेखाजोखा आपणच तयार करून ठेवित असतो, त्याचा हिशेब पुढिल देह कोणता मिळणार - (जसे चत्वार खाणी म्हणजेच जे कांही दृश्यमान आहे अर्थात डोळ्यांना दिसू शकते - तसेच त्या व्यतिरिक्त असणारे) - हे अवलंबून असते. त्यामुळे मानव देह मिळणार किंवा नाही? कां इतर कोणता देह मिळणार? हे सर्वस्वी आपल्या ह्या जन्मीच्या कृतीवर अवलंबून
असणारे असते आणि म्हणूनच म्हटले जाते "चांगले ते पेरा म्हणजे उगवेल तेही चांगलेच असेल" अर्थात चांगले काय आणि 
वाईट काय? हे आपण कसे ठरविणार? 
हे ठरविण्यासाठी आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. म्हणजेच
गुरूची आवश्यकता असते. हे गुरू पहिल्या प्रथम आपले माता-पिता असतात, जे
वेळोवेळी आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून धडपडत असतात. तद्नंतर शाळेत जाऊ लागल्यावर शिक्षक हे आपले
गुरू होतात आणि मधल्या काळांत जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे समाजामध्ये
असणा-या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होत जातो आणि ह्या कसोटीच्या
वेळी आपण आपल्या माता-पित्यांनी तसेच गुरूजणांनी दिलेले संस्कार पाठीमागे सोडून
नविन संस्कार धारण करण्यास सुरूवात करीत असतो. त्यात मग घरी दारी रोजची भांडणे
आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. गोष्टी विकोपाला जाण्याची वेळ येते आणि मग आपल्याला
गरज भीसते ती अध्यात्मिक, धार्मिक गोष्टींची. अशा वेळेस धाऊन येतात ते आपले गुरू,
जे फक्त गुरू न राहता सद्गुरू होतात. ह्या सर्वस्व चक्रातून बाहेर पडण्यास आपणांस
मदत करतात. आपल्याला राजमार्ग दाखवितात आणि आपला पुढिल कल्याणाचा,
मुक्ती मोक्षाचा मार्ग खुला करून देतात आणि हा राजमार्ग खुला झाला की आपण पुनरपी 
जननम पुनरपी मरणम आणि ते सुद्धा हक्काने मानव देह मिळवून त्या सताची सेवा
करण्यासाठी सज्ज होतो. परंतु हे देणे म्हणजेच मानव देह देणे की इतर चत्वार खाणीत ज्या
मध्ये किड्या मुंग्यापासून ते साध्या डोळ्यांना न दिसणा-या (जे आपण डिस्कवरीवर पाहतो)
जीव-जंतूपर्यंत असणा-या कोणत्याही देहांत फेकले जाऊ शकतो) हे सगळे त्या सद्गुरू
माऊलीच्या हातात असते. म्हणून नर देह पुन्हा प्राप्त होऊ शकतो हे सत्य होय.
वरील उहापोह हा आपल्या श्री सद्गुरूंच्या प्रवचनातील कांही अंश आहे. हे सर्वस्व
विचार जे योग्य आणि चांगले आहेत हे त्यांचे असून त्यामधील अनवधानाने कांही चुकीचे
असल्यास ते माझे आहेत. तरी त्याबद्दल कोणी चुकीचा अर्थ काढू नये इतकेच सांगणे.
श्री सद्गुरू माऊलींची क्षमा मागून हे इथेच आवरते घेतो.
धन्यवाद. 🙏🙏🙏

No comments:

अनगडवाणी