Saturday, August 21, 2010

गुरूचा महिमा !!!

तुमचा खरा गुरू तुमच्या ठायीच आहे. तुम्हाला त्याच्या घरी येण्याची वाट दाखवायला तो उत्सुक आहे. त्याच्या आज्ञेत राहूनच आपण आयुष्यात चांगलं काही करू शकतो. प्रार्थना करणं, ध्यान करणं, पवित्र राहून दानधर्म करणं हा आपल्या कर्माची थकबाकी चुकवण्याचा, आपलं कर्म भोगून संपवण्याचा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

...........................................................................................................................

कठीण परिस्थितीतून जाणारे लोक ब-याचदा आकाशाकडे पाहून, गुरूला किंवा देवाला दोष देतात आणि म्हणतात, माझ्याच वाट्याला हे दु:ख का आलं आहे? पण प्रत्यक्षात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, त्यांच्यावरील गुरू किंवा देवाच्या प्रेमामुळेच त्यांच्यावर ही कठीण परिस्थिती (आलेली नसून त्यांच्या पूर्व जन्माचे ते सुकृत आहे.) या परिस्थितीच्या रूपानं त्यांना 'स्वच्छ' केलं जातंय. अंगाला लागलेली घाण साफ करावी, तसं त्यांच मन, अंतरंग स्वच्छ केलं जात आहे. त्यांची शुश्रूषा केली जात आहे. जर त्यांना स्वच्छ होण्याच्या या प्रक्रियेतून जाताना मनोमन उमगलं की, त्यांच्या देवाचं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे की, त्याला त्याच्यावरील सारा चिखल, सारी घाण धुवून टाकून त्यांना स्वत:जवळ नेण्याची इच्छा आहे, तर ते जगणं मौजेचं होईल नाही का?

शुद्ध सोनं मिळविण्यासाठी सोन्याला अधिक दाहक आगीतून काढावं लागतं. शुद्ध पाणी हवं असेल तर उकळून घ्यावं लागतं. ही मोठी सुखकर क्रिया नव्हे. प्रत्येक गोष्टीला शुद्ध आणि पवित्र बनण्यासाठी त्याच्या स्वत:च्या अशा विस्तवातून जावं लागतं. सितामाईला नाही का अग्नीदिव्यातून जावे लागले?

कल्पना करा, दोन मुलं मातीत खेळत आहेत. दोघांनाही इजा झालेली आहे. त्यातल्या एका मुलाची आई मुलाला गरम पाण्यानं स्वच्छ करते. जिथं मुलाला लागलं आहे, तो भाग जंतुनाशकानं स्वच्छ करते. त्या जंतुनाशकानं त्या मुलाला नक्कीच झोंबेल. ते मूल वेदनांनी ओरडेल. यातनांनी रडेल. कदाचित् आईवर ओरडेल. परंतु, ती माऊली काळजावर दगड ठेवून मुलाच्या जखमा साफ केल्यावाचून राहणार नाही. कारण तिच्या हृदयात आपल्या मुलांबद्दलचं खरंखुरं प्रेम असतं.

परंतु, दुसरं मूल अजूनही घाणीत खेळत असतं. त्याच्या जखमेवर कुणी औषध लावत नाही. या दोघा मुलांमध्ये फायदा कोणाचा आहे?

वास्तविक सर्व समस्यांची उत्तरं, प्रत्येक माणसापाशीच असतात. त्या माणसाला फक्त शांत राहून अंतर्मनाचा मागोवा घ्यायचा असतो. आपल्या श्वासावर चित्त केंन्द्रित करा आणि हळुहळू आपल्या खऱ्या घराकडे प्रवास सुरू करा. त्यासाठी कोणत्याही माध्यमाची, आश्रमाची, पुस्तकांची, खोट्या गुरूची आपल्याला गरज नसते. गरज असते, फक्त विश्वासाची. तुमचा खरा गुरू तुमच्या ठायीच आहे आणि तुम्हाला आपल्या घरी नेण्याची वाट दाखवायला उत्सुक आहे.

तुम्ही शांत बसा, डोळे मिटून घ्या, सारे विचार बाजूला सारा, तुमचं चित्त श्वासावर केंन्द्रित करा. तुम्हाला जाणीव होईल की, तुम्ही म्हणजे तुमचा मूतिर्मंत श्वासच झाला आहात. तुमच्या श्वासाबरोबर तुम्ही अशा दुनियेत पोहोचला आहात, जिथं प्रसन्नता, शांतता, आध्यात्मिकता, ऋषी आणि साक्षात्कारी महापुरुषांचं राज्य चालतं. तुमची सारी उत्तरं तुमच्या ठायीच आहेत. ती बाहेर नाहीत. ऊर्जावलयं, चक्र, अतिमानवी, नवं जग, सारे भपकेबाज शब्द विसरा. आधी प्राथमिक शब्दाशी संपर्क साधा, हा शब्द आहे, शून्याची पोकळी. त्या शून्याच्या पोकळीतच तुम्हाला जगाचा निर्माता भेटेल. त्यानं सारं काही शून्यातून उभं केलं. त्याच्यापाशी पोहचायला तुम्हाला शून्याच्या पोकळीकडे वाटचाल केली पाहिजे.

आपण शून्याकडे जायला वेळ लावतो. का? उत्तर सोपं आहे. जर तुम्ही कोडं निर्माण केलंत, तर ते सोडवायला खूप कठीण पडेल. खरंतर कोडं सोडवायला अगदी सोपं असतं. पण आपण घेतलेला प्रत्येक मार्ग, प्रत्येक पाऊल आपल्याला त्या सोपेपणापासून दूर, गहनतेच्या जाळ्याकडे घेऊन जातं. आपण उत्तरापासून दूर दूर जाऊ लागतो. देव साधा आहे, इतर सारं गहन आहे. तुम्ही साधेपणा, पावित्र्य यांच्याकडे वळा. त्याद्वारे देवस्वरूप बना. ध्यान आणि प्रार्थनेनं माणूस फक्त कर्माचं किल्मिषच जाळून टाकत नाही, तर त्यामुळे संरक्षक कवचही निर्माण होतं. एकतर प्रार्थनेमुळे संकट टळेल किंवा नशिबात लिहिलेलं संकट स्वीकारण्यासाठी माणसाला बळ, शहाणपण आणि प्रेम लाभेल. हे संकट उमदेपणानं, आनंदानं आणि समर्पणाच्या भावनेनं स्वीकारता येईल.

आयुष्यात माणूस सर्वांत चांगलं जे करू शकतो, ते म्हणजे, प्रार्थना करणं, ध्यान करणं, पवित्र, मृदू आणि दयाळू राहून दानधर्म करणं. आपल्या कर्माची थकबाकी चुकवण्याचा, कर्म भोगून संपवण्याचा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रार्थना, ध्यानधारणा आणि देवानं आपल्यासाठी योजलेल्या साऱ्याचा सकारात्मक भावनेनं केलेला स्वीकार.

गुरूला पूर्ण शरण जाणं म्हणजेच देवाशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग. देता येईल तेवढं द्या, देत राहा... जमेल तेवढं देत राहा. गरीब माणूस फारसे पैसे देऊ शकणार नाही. पण तो किंवा ती एक चांगलं माणूस बनू शकतील. कुटुंबीय, मित्र आणि शक्य तेवढ्या सर्वांना मदत करू शकतील. एक चांगलं माणूस बनून, तुम्ही सवोर्त्कृष्ट प्रकारचा दानधर्म करत राहाल.

........................................................................................

(
लेखकाच्या 'द फकीर' (रूझबेह एन भरूचा ) (अनुवाद: सुनीती काणे) या पुस्तकातील अंश) सौजन्य : लोकसत्ता


Mayur Tondwalkar

Wednesday, August 18, 2010

Fantastic Answer by Dr. Abdul Kalam

Hi Friends,

Fantastic Answer by Dr. Abdul Kalam to Question asked in BBC interview.

Define : BIRTH

Ans : The only day in your life, when you CRIED and your MOTHER was smiling





Monday, August 16, 2010

सुविचार !!!

तात्पुरती सुरक्षितता मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सोडण्यास तयार होणारे दोन्ही गोष्टीसाठी लायक नसतात.


Mayur Tondwalkar

Saturday, August 14, 2010

Re: सुविचार



2010/8/13 Mayur Tondwalkar <mayurteem@gmail.com>
द्वेषाला सहानुभूतीने व निश्कपटतेणे जिंका !!!!
Mayur Tondwalkar



--
आभारी,
दीपक बिनेकर
माझा गाव माझा देश
मेरा गाँव मेरा देश
My Villages My Country.
A Social organisation for building of India.


Friday, August 13, 2010

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ६)

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल

तर भावना शुद्ध राहील (पान क्रमांक ६)

-परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज-

 

 

हे मना ! सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तुही वाटचाल कर. बरेच जान देवळात जातात, कुणी लोटांगण घालून घेतात तर कोणी जोरजोरात घंटानाद करतात आणि आपली देवावरची श्रद्धा, भक्ती दाखविण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवळातील दगडाची मूर्ती काही करते का हो? परंतु जागृत मूर्ती मात्र सर्व काही करते. आत वास करणारे म्हणते, "अरे ! जे काही करतोस हे सर्व तू करतोस." त्यावेळी तुझ्यात वास करणारे आहेत त्याची तू जाण घेतोस का? काही लोक आपण पाहतो की कपाळाला गंध-टीळे लाऊन स्वतःला पांडुरंगाचा सेवेकरी म्हणवितात आणि भजने, कीर्तने करतात. परंतु तुम्हीच सांगा, अशाने पांडुरंग प्राप्त होतो का? आणि हे करत असताना तुमचे आतले मन स्थिर राहू शकते का? अरे ! बाह्य अंगाने निरनिराळे वेश परिधान करून आतले मन स्थिर राहू शकेल का? अरे ! आत वास करणा-या सातच, सद्गुरूंचा माग तुम्ही काढू शकणार आहात का? तुमच्या मनाची एवढी कुवत आहे का? काही सेवेकरी दरबारातून घरी गेल्यानंतर सद्गुरुंबद्दल काही प्रणव काढतात, त्यांना वाटते सद्गुरू आपल्या बरोबर नाहीत, त्यांना थोडेच कळणार आहे? यातच खरी मेख आहे. अनन्तानी आमच्या गृहाला नाव दिले आहे, "मुळाश्रम". अनन्तानी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. ते जाणणे कठीण. तुकाराम महाराज म्हणतात ना,

तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नोहे l l

    पण जो भक्त, जो सेवेकरी हे साधू शकेल ज्याचे मन सद्गुरुंबद्दलच्या सद्भावनेने ओथंबलेले असेल तोच हे जाणू शकेल. काही भक्त आपल्यावर प्रसंग आला की धावत येतात, इतर वेळी टंगळमंगळ करतात. अशी जर भक्ती असेल, भावना असेल, तर हृदयस्थ विराजमान असलेली सद्गुरुंनी तरी काय करावे? प्रवचन करत असताना थोडे बहुत टोकले हे पाहिजेच. परंतु सद्गुरू माऊली दयाघन आहे. ते त्यातूनही भक्ताला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरू कसे आहेत, तर अतिविशाल, अतिशांत, अतिकोमल !! भगवद् गीतेत कृष्णानी अर्जुनाला सांगितले,

    नाचतो मी तेथे भावो, न भावो विद्यते सता

    आहे ते सत् आहे, सद्भावनेने पाहता आले तर ते आहे. सद्भावना नसेल तर पाहता येणार नाही. ज्योत जर सताबद्दल, सद्गुरुंबद्दल सद्भावनेने ओथंबलेली असेल तर तिला सत् पाहता येईल, अन्यथा नाही. त्या सेवेक-याला, त्या ज्योतीला दाखवितात पहा मी कसा आहे. नुसत्या मायाब्रह्मात गुरफटलेला असेल तर त्या सेवेक-याला त्यांचे रूप पाहता येणार नाही. अनुभव घेता येणार नाही. हे मना ! माझ्या हृदयस्थ जे सत्, जे सद्गुरू विराजमान झालेले आहेत, त्यांना शरण जा. सर्वस्व त्यांना अर्पण करून ते कसे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न कर. हे मना ! त्या सताची शक्ती अमर्याद आहे. ते क्षणात त्रिगुनानाही लय करू शकतात, तेथे तुम्हा आम्हा मानवांचा काय पाडाव लागणार? आपल्या सद्गुरुना, आपल्या बाबाना जर सेवेक-यांनी ओळखले आणि जर त्यांनी सहज जरी प्रश्न विचारले तर सत्शुद्ध भावनेने उत्तर देता आले पाहिजे. हेतू रहित, आत-बाहेर काही न करता सांगता आले पाहिजे. उत्तर हेतू रहित दिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्या सेवेक-यांवर प्रसंग येतो, त्यावेळी त्याचे मायाब्रह्म त्याच्या उपयोगी येते का?

    काही सेवेकरी दरबारात आल्यानंतर जवळ बसण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा, "जवळ असो अगर लांब असो, सद्गुरूंचे प्रत्येक सेवेक-यावर संपूर्ण लक्ष असतेच." मन विशाल असेल तर असे तरंग, असे विचार मनात येणार नाहीत. जे मन विशाल, मोकळे असते तेच सताबद्दल, सद्गुरुंबद्दल सद्भावनेने ओथंबलेले असते. म्हणून सेवेक-यानो हे लक्षात घ्या, माया हीच तुम्हाला सतापासून दूर नेते. सद्गुरू, सत् जाणून बुजून कोणत्याही भक्ताला दूर करत नाहीत. मन जर सद्भावनेने ओथंबलेले असेल, तर तो सतापासून, सद्गुरुंपासून कदापीही दूर जाणे शक्य नाही. प्रत्येक सेवेक-याने ही भावना सदैव मनात बाळगवयाला हवी की ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझे सद्गुरू माझ्या बरोबर असणारच. मी आणि सद्गुरू वेगळे नाहीत. जगात सर्वकाही तुम्हा-आम्हापासून दूर जाऊ शकेल, परंतु सद्गुरू कदापीही तुमच्यापासून दूर जाणार नाहीत.


Mayur Tondwalkar

सुविचार

द्वेषाला सहानुभूतीने व निश्कपटतेणे जिंका !!!!
Mayur Tondwalkar

Thursday, August 12, 2010

Sunday, August 1, 2010

सुविचार

जगात खरे स्वातंत्र्य एकच आहे, ते म्हणजे आपल्या सद्सद्विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याचे. मानवाजवळ ही गोष्ट आहे म्हणून त्यांच्या जीवनाला अर्थ आहे.


Mayur Tondwalkar

अनगडवाणी