Sunday, November 4, 2018

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज प्रवचने*

👏👏👏

*_भाग एक_*

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात त्यांची ओळख करून घेता आली पाहिजे, त्यांना स्वत:च्या दृष्टीने पाहता आले पाहिजे असे आपले बाबा कां म्हणतात?*
कारण त्यावेळेस आपण आपल्या बाबांना मानवी त-हेने आपल्यातीलच एक म्हणून पाहत होतो. म्हणून ते म्हणायचे, "आपले सद्गुरू कोण हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आपल्याला आपल्या स्वतःच्या दृष्टीने (येथे दृष्टी याचा अर्थ अंत:र्दृष्टीने म्हणजेच ज्ञान दृष्टीने अर्थात प्रकाशाच्या दृष्टीने डोळे बंद केलेले असोत वा उघडे असोत) पाहता आले पाहिजे." 

*हे होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?* 
त्यासाठी आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीने सत् पदाच्या आसनावरून बहाल केलेल्या *नामाची* उज्वलता करणे, त्या *नामाचा* जास्तीत जास्त उजाळा करणे, जास्तीत जास्त आपणाकडून *नामस्मरण* घडणे हे गरजेचे आहे.

बाबा म्हणतात, *ते आपण आचरणात आणा.*
याचाच अर्थ असा की, "सद्गुरू माऊलीने जी जी शिकवण आपणा समस्त भक्तगणांना आपल्या प्रवचनातून बहाल केली आहे, ती अंगीकारून आपल्या आचरणात आणावयास हवी. त्याबरहुकूम आपण आपले वागणे ठेवावयास हवे, तरच आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीना स्वतःच्या दृष्टीने पाहता येऊ शकेल."

आपले बाबा आपल्याला आठवण करून देताना म्हणतात, *जे अनन्य भावे माझ्या भक्तित निपूण आहेत त्यांना सत् कधीही उपाशी ठेवणार नाहीत.* 

*सद्गुरु महिमा किती अगाध आहे* ह्याची जाणीव करून देताना ते पुढे म्हणतात, "समर्थ मतलबी मायेला भाळणारे नाहीत. वेळेला समर्थ सेवेकऱ्याचे अर्धे संचित आपल्यावर घेतात आणि आपल्या भक्ताला पूर्व वाईट संचितातून मुक्त करतात. त्यांच्याखेरीज मायेचा पुत वा इतर कुणीही हे घेऊ शकणार नाही, घेणे शक्य नाही."

श्री सद्गुरू माऊली सर्वांना समत्व बुध्दीने पाहतात. त्यांच्याकडे लहान थोर, श्रीमंत गरीब, डावा उजवा, उच नीच असा भेदभाव कधीही नसतो. त्यांच्यासाठी सगळे समान असतात. ते सगळ्यांना तितक्याच आत्मियतेने समजावून सांगत असतात. तितक्याच ममत्वाने बोध देखीली करीत असतात.

"या आसनाच्या ठिकाणी असणारा सेवेकरी, आसनाजवळ सेवेकरी व बाह्य ठिकाणी सद्गुरु आहे" असे जेव्हा आपले बाबा म्हणतात त्याचा अर्थ आपले बाबा आपल्या सेवेक-यावर किती विश्वास टाकतात. तो विश्वास सार्थ करण्यासाठी येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्यामुळे आपली जबाबदारी वाढते व ती ओळखूनच, त्याप्रमाणे आपण वागावयास हवे. आपण आपली *कृती* आणि *उक्ती* अशी ठेवावयास हवी की आपल्या सताला किंवा त्यांच्या शिकवणीला कुठे गालबोट लागता कामा नये. उलट बाह्य स्थितीत तो चारचौघांत उठून दिसावयास हवा. त्याच्या उक्ती आणि कृतीमुळे बाह्य स्थितीने आवर्जून म्हटले पाहिजे की वाह् ! धन्य ते सद्गुरू आणि धन्य तो सेवेकरी !!

कारण आपण हे लक्षात घ्यावयास हवे की सद्गुरू हे एकच तत्व होऊ शकते. हा आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा मोठेपणा आहे की ते म्हणतात, "या आसनाचा सेवेकरी येथे सेवेकरी आणि *बाह्यठिकाणी सद्गुरू आहे.*"

💐👏💐👏💐👏💐👏💐👏

No comments:

अनगडवाणी