Saturday, September 29, 2018

*समर्थ तेच, तेच सद्गुरू*

👏🙏👏

आजच्या प्रवचनातील विशेष बाब म्हणजे - बाबा म्हणतात,
*समर्थ तेच, तेच सद्गुरू*
भुलू नका, चुकू नका. सर्व काही करणारे, तेच समर्थ !
पुढे बाबा असेही म्हणतात," *पण (समर्थ) मी त्यातला नाहीच म्हणणार.*" हे आपण लक्षात घ्यावयास हवे.
पुढे बाबा म्हणतात, *समर्थ कसे असतात? तर स्थिर असतात.*

आता हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, *त्यांच्यात त्रिगुणात्मक नटविले, ते (त्रिगुण) - (समर्थ म्हणा, सद्गुरू म्हणा, किंवा अनंत म्हणा) हुकुमाशिवाय (या जगताचे कार्य) करीत नाही.*

आणि म्हणूनच बाबा म्हणतात, *करून अकर्ते असे ते सत् पद आहे.*

*हे नामस्मरण अत्यंत उच्च व श्रेष्ठ प्रतीचे आहे.* हे साधे आणि सुलभ देखील आहे. दुनियेच्या उचापती म्हणा, उठाठेवी म्हणा करण्यापेक्षा *नामस्मरण* करा.

बरे ते कसे करा, *तर एका तत्वावर दृढभाव ठेवून* म्हणजेच आपण आपल्या सद्गुरूंवर पुर्णत्वाने विश्वास ठेऊन, आपला जो मनामध्ये भाव आहे तो डळमळीत न ठेवता, अढळ भक्तीभावाने ते करा. इतकेच नव्हे तर *नामस्मरण* करताना आपल्या मायावी स्थितीचे विस्मरण होऊ द्या, मग ते घरदार का असेना?

*एका तत्वावर दृढभाव ठेवून, त्या गतीवर नामस्मरण करा.*

बाबा आपणा सर्वांस्वांना आठवण करून देताना म्हणतात, *आपण माया म्हणजे परब्रह्म मानतो.* परंतु हे खरे नाही. बाबा विचारणा करतात, *जर स्थूल आपले नाही,  तर माया आपली कशी म्हणावी?*

पण पुढे बाबा असेही म्हणतात, *माया रहीत तिन्ही जगाचा (स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोक) स्वामी अर्थात भगवंतही नाही.* हे असे का म्हणतात बाबा? कारण, भगवंत म्हणा किंवा सत् म्हणा यांची जी माया आहे, ती माया कोणती? तर ती *सत माया*

बाबांनीच म्हटल्याप्रमाणे, माया ही दोन प्रकारची असते - एक म्हणजे *सत माया* आणि दुसरी *असत माया.* म्हणून सद्गुरूंची म्हणा, भगवंताची म्हणा जी माया असते, ती सत माया.

*माया* मग ती कोणतीही असो. ती सताच्या चरणांची दास आहे.

संत म्हणतात, *एक तत्व नाम, दृढ: धरी मना ।*

*नामस्मरण कोठेही करा* नामस्मरणाला स्थळकाळाचे बंधन नाही.

👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

No comments:

अनगडवाणी