Monday, September 10, 2018

सत वचने

👏🌷👏

*प.पूज्य भगवान महाराज परिवार*

*卐卐 || जय श्री सद्गुरू माऊली || 卐卐*

श्री सद्गुरू सांगतात, *"माझी इच्छा मी नाहीशी केली आणि भगवत इच्छेने सर्व होते ही जाण ठेवली तर मनाला स्वास्थ्य लाभेल आणि आनंदाची प्राप्ती होईल."*

*कर्तेपणाचा अभिमान सोडल्याने, हव्यास टाकल्याने मनाला स्वास्थ्य लाभते.*

*होते ते सर्व भगवंताच्या इच्छेनेच होते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग काळजीचे कारणच उरत नाही.*

सद्गुरू सांगतात, *"सतत भगवंताच्या नामात राहून देहाचे विस्मरण होऊ द्या.*

*भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली असता भगवंत भेटतो.*

*भगवंताचे नाम कधीही सोडू नये.*

*आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेनेच चालतो ही जाणीव सतत आपल्या मनाजवळ ठेवावी आणि जगात वावरावे आणि वागावे.*

*जगात शाश्वत सत्य एकच आहे, ते म्हणजे नाम*

*नामात राहिल्यानेच मुक्ती लाभेल*

*मुक्ती आणि मोक्ष म्हणजे काय?*
मुक्ती आणि मोक्ष म्हणजे आपल्या सद्गुरू माऊलींचे चरण प्राप्त होणे येणे नाम मुक्ती आणि मोक्ष. एवढेच नव्हे तर ते चरण प्राप्त झाल्यानंतर नामस्मरणाच्या गतीने जाऊन ते टिकविणे येणे नाम मुक्ती आणि मोक्ष.

*सत्संगांमध्ये आपल्याला आपले दोष कळतात आणि चित्त शुद्ध होण्यास मदत होते.*

👏🌷👏💐👏🌷👏💐👏

No comments:

अनगडवाणी