Wednesday, July 9, 2014

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!



पाहतो मी वाट चातकासारखी
आषाढ मासे प्रथम दिवसे,
परंतु कोणालाही चाहूल,
त्या पावसाची न दिसे..........

त्यातच आली जवळ आषाढी एकादशी,
वारीयांची वारी जवळ जात असे,
नामाचा गजर जोरदार झाला,
परंतु तो पाऊस तरीही न आला..........

पाऊस नाही येत म्हणून,
लागले डोळे आकाशाकडे,
अंधारून येताच प्रकटे,
त्यात एक आशेचा किरण कि निराशेचा ढग.........

शेतकरी हवालदिल झाला,
शहरातही लोक झाले वेडेपिसे,
पाण्यावाचून माशाला वाटेल,
जीवन कसे जगावेसे?............

निराशेच्या ढगामुळे,
लागेल कां हो सगळ्यांना धग?
पाऊस नाही बरसला तर,
पाणी कसे मिळेल मग?...............
.........................मयुर तोंडवळकर



No comments:

अनगडवाणी