Friday, November 15, 2013

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्य हे जगायचं असतं
क्षण आणि क्षण अनुभवायचं असतं...........!!
कधी तरी रडायचं असतं,
कधी कधी हसायचं असतं......................!!
मुलं मोठी होतात तशी, त्यांच्या कलानं घ्यायचं असतं,
सुनबाई घरात आल्यावर तर नातं आणि नातं जपायचं असतं...........!!
बालपणीच्या आठवणींवर आयुष्य हे पुढे ढकलायचं असतं,
मोठेपण आल्यावर,
त्याच आयुष्याला अनुभवाचं गाठोडं बांधायचं असतं........!!
बोलताना जिभेला हाड नसल्याची जान ठेवायचं असतं,
हातपाय गलितगात्र न होतील,
ह्याचही भान राखायचं असतं........!!
मनाच्या कप्प्या-कप्प्यांवर साचलेल्या जुनाट विचारांना
दूरवर फेकायचं असतं,
आयुष्यभर जपलेल्या हितकारक संस्कारांवर
उभं आयुष्य काढायचं असतं............!!
आयुष्य हे लढायचं असतं, आयुष्य हे कुढायचं नसतं,
आयुष्य हे येईल त्या प्रसंगांना सामोरं न्यायचं असतं........!!
आयुष्य हे रणांगणातून पळ काढायचं नसतं,
नको त्या प्रसंगांना टाळायचं असतं.........!!
कधी कधी माघार घेवूनसुद्धा,
आयुष्याच सोनं करायचं असतं........!!

No comments:

अनगडवाणी