Thursday, April 11, 2013

वाह रे ! नौजवान..... !!!


वाह रे ! नौजवान..... !!!

किधर है तेरा ध्यान,
मत मांगते मांगते मतदाताओन्से,
फिसल गयी तेरी जबान......!!!
 वाह रे ! नौजवान..... !!!

धरनोंसे पाणी हो गया बाहर,
तेरी जबान ने ढाया बहोत हि कहर,
घुस्सेसे तू इतना हो गया बेखबर,
कि तेरी जबानसे निकली जहर कि लहर,
 वाह रे ! नौजवान..... !!!

तू मांगते रहा माफिकी सौगात,
यह लहर बन गयी तेरी औकात,
मुह्से मांगने वाला था तू मत
लेखीन निकाल गया गलतीसे ? "X X"
 वाह रे ! नौजवान..... !!!

यह गलती हि पडी तुझे बहोत भारी,
कौन लढायेगा केस अब तेरी,
अब जिंदगीभर पस्ताते रहो,
मस्तीमे अपने गुर्राते रहो,
 वाह रे ! नौजवान..... !!!

जबांको अपने
फिसलने मत दो अब,
याद करो, नौजवान !
छुडाने तुझे तभी आयेगा रब !!
 वाह रे ! नौजवान..... !!!

यह "रब" कही बाहरसे नही आता ,
वह तो अपनो और अपनोमेही है बसता,
जब सुधर जायेगी अपनी यह लड्खडाती जुबान,
तभी हि मिलेगा "रब" का संपूर्ण वरदान........!!!
  वाह रे ! नौजवान..... !!!


Thursday, April 4, 2013

पेवरचा ताप......!!!

हे पेवर ब्लोक नसून,
फेवर ब्लोक आहेत,
सामन्यांच्या पैशांची
हि विल्हेवाट आहे..........

               "फेवर ब्लॉकचे" पेवच फुटले,
              सगळीकडे हे लावत सुटले,
              म्हणून सगळ्या मुंबईभर,
              पेवर आणि फेवर ब्लोकच दिसले......................

हे पेवर ब्लोक कसले?
हे तर असुविधेचे मासले,
रस्त्यारस्त्यात उखडलेले,
सगळीकडे पेवर ब्लोकच दिसले............

Saturday, March 30, 2013

MAYUR TONDWALKAR: माझा पहिला विमान प्रवास..........!!!

MAYUR TONDWALKAR: माझा पहिला विमान प्रवास..........!!!

माझा पहिला विमान प्रवास..........!!!

sgs4-wallpaper
Image courtesy: The Android Soul
माझा पहिला विमान प्रवास..........!!!
चेन्नईला निघण्याची लगबग, त्यातच सकाळी १० चे इंडिगो पकडायची घाई. साधारणपणे एक तास अगोदरच विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. सुख म्हणजे डोमेस्टिक हवाई तळावर विमान पकडावयाचे असल्यामुळे त्यात वेळ जाणार नव्हता, कारण हा तळ हायवे पासून जवळच होता. एक तास अगोदर जाण्याचे कारण म्हणजे विमानात प्रवेश देण्यापूर्वी सिकीरुटी चेक केला जातो, तो पार पडणे गरजेचे होते.
विमानात बसने हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. पहिल्यांदाच विमानात बसणार होतो, त्यामुळे रात्रभर झोप म्हणता झोप काही येईना. कधी एकदा हि रात्र संपते, कधी एकदा मी एअरपोर्टला पोहचतो आणि विमानात बसतो असे झाले होते. विमानात बसल्यावर ते वर जाताना, कसे बरे वाटणार, काय अनुभव येणार ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली होती. वर गेल्यावर खालचे काही दिसत नाही, असे ऐकण्यात  होते, ते खरे असणार काय? सर्वत्र ढगच दिसणार कि आणखी काही दिसणार ह्याबद्दल चिंता लागून राहिली होती. चेन्नईचा हा विमान प्रवास तसा थोडक्या अवधीचा म्हणजे फक्त दीड ते दोन तासांचा होता. ह्या दीड दोन तासात काय काय घडणार ह्याची मनामध्ये विचारधारा चालू होती.
नेहमी जमिनीवरून आकाशातील उडत असलेले विमान पहात आलो, आणि आज तर मी विमानातून जमीन पाहणार होतो. खरच वरून जमीन दिसेल का, कि फक्त ढगच दिसतील? पायलट हवेतून मार्ग कसा बरे काढेल, ह्याची काळजी होती तशीच मनाजवळ हुरहूरही होती. मनामध्ये बालिश प्रश्न उभे राहत होते. त्याला कसे बरे हे कळत असेल कि चेन्नईचा हाच मार्ग बरोबर आहे? खरोखरीच आपण योग्य मार्गाने जावू ना, कि कुठेतरी आकाशात भरकटत राहू, अशी मनाची चलबिचलता चालू होती, घालमेल होत होती. परंतु मनामध्ये एक प्रकारचा आनंदही दाटला होता. ह्या चेन्नई सफरीच्या निमित्ताने माझ्या मनातील इतक्या वर्षाच्या शंकांचे निरसनही होणार होते व प्रत्यक्षात हवाई सफारीचा आनंदही लुटता येणार होता.
अशा स्थितीत रात्री झोप कधी लागली ते समजलेच नाही. सकाळचा ६-३० चा अलार्म लावलेला होताच. त्यामुळे अलार्म वाजताच झोपेतून खडबडून जागा झालो आणि माझी जाण्याची, प्रवासाला निघण्याची लगबग सुरु झाली. कसे बसे एकदाचे सर्व कार्यक्रम भराभर आटोपले आणि भगवंतांचे दर्शन घेवून मार्गस्थ झालो. बरोबर नऊ वाजताच एअरपोर्टला हजर झालो. माझ्याबरोबर चेन्नईला जाण्यासाठी माझी बहिण, भाची, भाचा, भाचे सून आणि भावोजी असे पाचजण मिळून वसईवरून वेळेवर पोहचले होते. मी हि दक्षिण मुंबईतील माझ्या घरून निघून त्यांच्याबरोबर एकाच वेळी तेथे हजर झालो होतो, त्यामुळे वेळेचा खोळंबा झाला नाही. ताबडतोब इंडिगोच्या काऊन्टरवर हजर झालो, ई-तिकीटची प्रिंट दाखवून विमानात चढण्याचा बोर्डिंग पास घेतला आणि सिकिरूटी चेकसाठी पुढे प्रयाण केले.
सिकिरूटी चेक करणे किंवा हा सोपस्कार पार पाडणे हा मोठा वेळखाऊ प्रकार असतो. हल्ली सगळीकडे होणारे बॉम्ब स्फोट व त्यासाठी घेण्यात येणारी काळजी, हि ह्या सिकिरूटी चेक करून घेण्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. (कारण पासपोर्ट काढताना पूर्वी ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर यांना यातून मोकळीक देण्यात आलेली होती, परंतु आता नवीन सोयी सवलतींप्रमाणे दहावी व वरील इयत्ता पास झालेल्यांना ती मोकळीक आहे. परंतु सिकिरूटीच्या कारणांवरून ती सवलत मिळत नाही.) त्यामध्ये एक कॅालम असतो, त्यामध्ये नमूद केलेले असते, कि इमिग्रेशन चेक नॅाट रिक्वायर्ड, ज्याला संक्षिप्त स्वरुपात इसीएनआर असे म्हटले जाते, परंतु हे सगळे बाजूला ठेवून हल्ली सिकिरूटी चेक हा मात्र केलाच जातो. त्यामुळे तो टाळून पुढे जाताच येत नाही आणि आपण जर एक तास आधी किंवा लवकर पोहोचलो नाही, तर त्यामुळे आपल्याला त्यासाठी रखडून राहिल्यामुळे आपले विमान चुकण्याची भीती असते.  
तर हे रामायण येथेच थांबवून आपण आता विमानात बसण्याची पुढील पायरी गाठलेली बरे. हे सोपस्कार पूर्ण करून आपली विमानात बसण्याची तयारी पूर्ण झालेली असते. त्यामुळे तेथून पुढे आपण लाउंज मध्ये जातो व आपल्या इच्छित विमानाच्या बोर्डिंग गेटकडे रवाना होतो. त्याप्रमाणे आम्ही आमच्या विमानाच्या बोर्डिंगसाठी ई-६ गेटकडे वळलो आणि तेथे लवकर पोहोचल्यामुळे स्थानापन्न झालो. आता आमचे विमान कधी एकदा येते व आम्ही त्यात बसतो असे झाले. हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी मन अगदी आसुसलेले होते. मनात घालमेल चालू होती. असाच थोडा अवधी गेला आणि आमचे विमान आमच्यासमोर गाडी जशी फलाटाला लागते, तसे गेटच्या समोरील भागात आले आणि उभे राहिले. ताबडतोब प्रवाशांची लगबग सुरु झाली, गेटच्या समोर लाईन लावली गेली आणि एका मागोमाग एक प्रवाशांना आतमध्ये सोडण्यात येवू लागले.
आमचा नंबर आला आणि आम्ही पाऊले पुढे टाकू लागलो. पहिल्यांदाच आतून विमान पाहण्याचा योग आला होता. त्यामुळे जरा हबकूनच आम्ही सगळेजण विमानात प्रवेश करते झालो. समोरच विमान कंपनीच्या क्रु मेम्बरनी आमचा बोर्डिंग पास तपासला आणि पुढे जावू दिले. पुढे जाताच समोरच सुहास्य मुद्रेने प्रवाशांच्या स्वागत करणाऱ्या दोन हवाई सुंदरी विमानात तुमचे स्वागत असो असे म्हणत सगळ्यांना सामोर्या जात होत्या. हवाई सुंदरी का म्हणतात ते त्यावेळेस कळले. कारण खरोखरीच त्या रूपाने सुंदर होत्या. सडपातळ बांधा, चेहऱ्यावर हास्य, डोक्यावर गांधी टोपीसारखी दिसणारी परंतु त्यांच्या कंपनीची निळसर रंगाची टोपी त्यांनी डोक्यावर ठेवलेली होती. संपूर्ण निळ्या रंगाचा युनिफोर्म त्यांनी परिधान केला होता. एकंदरीत त्या आमच्या छोटेखणी विमानात चारजनी होत्या. विमानात प्रवेश करता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे दोन्ही बाजूला तीन तीन खुर्च्यांच्या अशा मागेपर्यंत जवळ जवळ २८ ते ३० रांगा होत्या. अगदी दाटीवाटीने त्या बसविलेल्या असल्यामुळे अंमळशा एकमेकाला खेटूनच त्यामध्ये बसावे लागणार होते. तशा त्या पाठीमागेही जास्त सरकत नसल्यामुळे पाय काही लांब करता येत नव्हते. चित्रपटात किंवा जाहिरातींमध्ये बघतो तसे हे विमान प्रशस्त नव्हते. परंतु एकंदरीतच जवळ जवळ १५० ते १८० किंवा २०० प्रवाशांसाठी हे विमान असावे, आणि त्यामुळे त्याची तशी रचना केलेली असावी हे आतील व्यवस्था पाहताक्षणीच लक्षात येत होते. आमचा नंबर मागेच असल्यामुळे आम्ही मागे आलो. आपापल्या जागेवर स्थानापन्न झालो. इतरांची लगबग न्याहाळू लागलो. मनामध्ये एकप्रकारची कंपनता होती. आता पुढील प्रवास आणि पुढील अनुभव कसा असणार ह्याचीच उत्सुकता लागून राहिली होती.
सगळे प्रवाशी आपापल्या जागेवर बसताच विमानाचा दरवाजा बंद करण्यात आला. जस जशी प्रवाशी मंडळी स्थिरावू लागली व बसली, त्यानंतर हवाई सुंदरीने घोषणा दिली कि आता थोड्याच वेळात आपले विमान सुटणार आहे, तरी सगळ्यांनी आपल्या खुर्च्यांचे बेल्ट बांधून घ्यावेत व आपले लॅपटोप व मोबाईल बंद करावेत.
बरोबर दहा वाजता विमानाचे इंजिन सुरु झाले. पायलटने विमान सुरु करून एक वळसा मारून आमचे विमान रन वे कडे घेण्यास सुरुवात केली. मध्ये मध्ये थोडा वेळ ते थांबायचे व पुन्हा सुरु होवून पुढे सरकायचे. इकडे तर मन नुसते बेचैन झाले होते. धाकधूक सुरूच होती. कधी हा रन वे मोकळा होणार व आम्ही आकाशात झेपावणार असे झाले होते. ह्या गडबडीत जवळ जवळ २५ मिनिटे गेली आणि एकदाचा रन वे मोकळा मिळाला, त्याबरोबर इंजिनाचा जोराचा आवाज करीत आमचे विमान धावपट्टीवरून लगबगीने जोरात पळू लागले आणि थोड्याच अवधीत ते जे जमिनीबरोबर धावत होते, त्याचा पुढील भाग आकाशाकडे झेपावला गेला आणि आमच्या विमानाने धावपट्टी सोडली. मनात थोडीसी भीती दाटून आली. पुढे ते एका ठराविक उंचीवर जाईपर्यंत त्याची थरथर सुरु होती. अंदाजे १० मिनिटानंतर ते आकाशात स्थिरावले.
मी आतील बाजूला बसलेला असल्यामुळे मला खिडकीतून बाहेर खाली पाहता येत नव्हते, परंतु नजरेसमक्ष असणारे दृश्य दिसत होते. वर गेल्यावर विमान चालत आहे असे वाटतच नव्हते. नजरेसमोरील खिडकीतून फक्त ढग व क्षितीज तेव्हढे दिसत होते. सर्वत्र निळे आकाश आणि मधून मधून पांढरे ढग मात्र दिसत होते.
अशाप्रकारे आकाशात विमानाचा प्रवास चालू होता, परंतु तो होतो आहे असे कुठेही जाणवत नव्हते. आपण एका ठिकाणी अवकाशात स्थिर उभे आहोत अशी जाणीव सतत होत होती. त्यामुळे सर्वसाधारणपणे रेल वे ने गेल्यास चेन्नईला जाण्यास कमीत कमीत २३ तास लागतात, मग आपण विमानाने दीड दोन तासात कसे बरे पोहचणार? अशी मनी उगीचच शंका निर्माण झाली. सगळे स्थिरस्थावर झाल्यावर हवाई सुंदरींची लगबग सुरु झाली. हवाई प्रवासात घेण्यात यावयाची खबरदारी “सेफ्टी रुल्स” चे हवाई सुंदरींनी प्रात्यक्षिक करून दाखविले. आपल्या समोरील खुर्चीच्या आपल्या कडील भागात पुस्तक होते ते डोळ्याखालून घालण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारे पाच दहा मिनिटांचा हा कार्यक्रम आटोपण्यात आला. त्यानंतर त्यांनी प्रवाशांसाठी पदार्थ भरलेली ढकल गाडी आणली व ज्याला कोणाला काही हवे नको का ते त्या विचारता विचारता त्या त्या वस्तू त्यांना देवू लागल्या. मधूनच एकाद दुसरी उद्घोषणा सुरूच होती.
ज्यावेळेस विमानाने आकाशात झेप घेतली त्यावेळेस थोडे जाणवले कि आपण हवेत उचलले गेलो आहोत. त्यानंतरची थोडी थरथर, त्यानंतर विमानाचे हवेत स्थिर असल्यासारखे वाटणे, पण प्रत्यक्षात ते फारच गतीने पुढे जात असल्याचे जाणवणे, इत्यादी प्रकार माझ्यासाठी व माझ्या नातलगांसाठी एक नवीनच अनुभव होता. त्यात बहिणीची तब्येत थोडीशी नाजूक असल्यामुळे, तिने विमान प्रवासाचे जे धैर्य दाखविले ते खरोखरीच वाखाणण्याजोगे होते.
मधील तासाभराचा प्रवास झाल्यावर माझा भाचा जो पुढे बसला होता, तो माझ्या मागील सीटवर आला व मला पुढे जाण्यास सांगितले. त्यामुळे हवेत विमान असताना मी पुढे जाण्यासाठी निघालो, परंतु मला हे जाणवले कि मघापासून जे मला वाटत होते कि विमान स्थिर आहे, ते तसे मुळीच नव्हते, कारण चालताना माझा तोल इकडून तिकडे जात होता. एकदाचा मी पुढील सीटवर पोहोचलो. भाच्याची सीट हि खिडकी लगतच असल्यामुळे, मला पुढील पंधरा वीस मिनिटांचा प्रवास हा खिडकी बाहेरील दृश्य बघून करता आला. ती सीट पुढून २ -या रांगेत असल्यामुळे हा पंधरा वीस मिनिटांचा प्रवास हा प्रवास केल्यासारखा वाटला, हि एक पर्वणीच होती व ती मी साधू शकलो. बाहेरील दृश्य बघत, क्षितीज न्याहाळत, खालील भाग कसा दिसतो त्याची जी उत्कंठा अगोदर होती, ती शमवत कधी हा प्रवास संपला ते कळलेच नाही.
ह्यातून एक समजले कि वरून जमीन दिसत नाही, फक्त ढगच दिसतात, हि समजूत खोटी ठरली. कदाचित आमचे डोमेस्टिक विमान असल्यामुळे त्याची आकाशात प्रवास करण्याची उंची हि कमी असावी असे वाटले. एखाद्या उंच इमारतीवरून खाली पाहिल्यास जसे दृश्य दिसेल, तसेच हेहि थोड्याफार फरकाने तसेच दृश्य होते. फक्त येथे उंची खूप होती. खालील जमीन दिसत होती, डोंगर दिसत होते, नद्या दिसत होत्या, उंच उंच इमारती चित्रात जशा छोट्या दिसतात तशा दिसत होत्या. वर आजूबाजूला ढग दिसत होते. लांबवर क्षितीज दिसत होते. अशाप्रकारे एक नवीन अनुभव पदरात पडला होता.  
थोड्याच वेळात चेन्नईचे विमानतळ येणार आहे अशी हवाई सुंदरीने उद्घोषणा केली आणि आपले मोबाईल आणि चालू असल्यास लॅपटोप बंद करण्याची विनंती केली. त्यामुळे मी आता बाहेरील दृश्यांवर माझे लक्ष्य केंद्रित केले. आता हे विमान विमानतळावर कसे उतरणार हे पाहणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. तो अनुभव कसा असेल, ह्याची वाट पाहणे हेच शिल्लक राहिलेले होते. खालील दृश्य खूपच मनोहारी होते. विमान हळू हळू खाली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले. कधी ते खाली जाते आहे असे वाटायचे, तर मध्येच ते वर उचलले जाते आहे वाटायचे. अशाप्रकारे पाच दहा मिनिटे असेच चालले होते. वाटायचे हे आता खाली जाईल आणि आम्ही लॅंड होवू. परंतु तेव्हढ्या सहजपणे ते होणार नव्हते कारण त्याला रन वे मोकळा मिळावयास हवा होता व नियंत्रण कक्षातून त्याला खाली उतरण्याची परवानगी हवी होती, ती मिळाली असता ते खाली जाणार होते. अन्यथा ते वरच घोटाळत राहिले असते. एकदाची परवानगी मिळाली असे दिसते, त्याने एक छोटेसे वळण घेतले आणि आता ते भरभर खाली जावू लागले. त्यामुळे खिडकीतून दिसणारे दृश्य जवळ जवळ आल्याचे भासमान होवू लागले. विमानातील आणि जमिनीतील अंतर कमी कमी होवू लागले आणि विमानाचा टायर जमिनीला लागला. जोरात टायर घासल्याचा आवाज होवून, विमान जमिनीवर उतरून पळू लागले व हळू हळू त्याची गती कमी झाली व थोड्याच अवधीत त्याने मुख्य रन वे सोडून विमानतळाकडे येण्यास सुरुवात केली. एकदाचे हायसे वाटले. थोड्याच वेळात ते बाजूला येवून थांबले. त्याबरोबर उतरणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरु झाली. आम्हीही सगळ्यात शेवटी शांतपणे उतरून खाली आलो व बसची वाट पाहू लागलो. तद्नंतर बसमध्ये बसून आम्हाला मुख्य गेटवर सोडण्यात आले. ह्या संपूर्ण प्रवासात एकच गोष्ट राहून गेली ती म्हणजे मला आवड असणार्या चित्रीकरणाची. मनोमन वाटत होते कि हा संपूर्ण अनुभव कॅमेर्यामध्ये बंदिस्त करणे गरजेचे होते, परंतु ते मला साधता आले नाही, ह्याची खंत मनाला लागून मात्र राहिली. त्यातही सुखाची गोष्ट हि कि भाची व भाचे सून ह्यांनी थोडा बहुत हा आमचा विमान प्रवास विडीयो कॅमेर्यामध्ये बंदिस्त केलेला होता, त्यामुळे तो अनुभव पुन्हा कधीतरी घेता येईल, ह्या आशेबरोबर हा विमान प्रवास आम्ही संपविला. 

Friday, February 8, 2013

काळा घोडा आर्ट फेस्टिवल - २०१३ .....भाग पहिला


काळा घोडा कला उत्सव – २०१३ (KALA GHODA ART FESTIVAL 2013)


हा वार्षिक कला उस्तव असून, १९९९ ला ह्याची सुरुवात झाली आणि हे ह्याचे १५ वे वर्ष आहे.. ह्या कला उस्तवात देशाच्या निरनिराळ्या भागातून कलाकार येवून भाग घेत असतात, त्या दृष्टीने हा फक्त काला घोडा परिसराचा किंवा मुंबई, महाराष्ट्राचा उत्सव न राहता तो खर्र्या अर्थाने राष्ट्रीय कला उस्तव म्हणून साजरा केला जात आहे. ह्याचा एक फायदा असा झाला की ह्याची कीर्ती देशातच न राहता देशाबाहेरही गेलेली असून, परदेशी प्रवाशी देखील ह्या कालावधीत ह्या उस्तावासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. ह्या उस्तावाची तारीख जरी निश्चित नसली तरी कालावधी हा साधारणता जानेवारी महिन्याचा शेवट किंवा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कधीही निश्चित केली जाते. हा काला घोडा असोसियेशनद्वारे दक्षिण मुंबईत राष्ट्रीय स्मारके जशी गेट वे ऑफ इंडिया, म्युझियम, मुंबई नेचरल हिस्टरी सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलेरी परिसरातील रॅमपार्ट रोडवर मुख्यत्वेकरून आयोजिण्यात येत असतो.
काला घोडा आर्ट फेस्टिवल हा मुख्य उस्तव असून त्यासोबतच विज्युअल आर्टस, डांस, म्युझिक, थियटर, सिनेमा, लिटरेचर, लेक्चर्स, सेमिनार्स आणि वर्कशोप्स, हेरीटेज वाॅक्स, मुलांसाठी खास कार्यक्रम त्याचबरोबर स्ट्रीट फेस्टिवल देखील साजरे करण्यात येत असून ह्या सगळ्या कार्यक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नसून, ते मोफत असतात. ह्या सगळ्या कार्यक्रमाचा खर्च हा मोठ मोठ्या संस्था उचलत असतात हे शक्य होते.
ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या जागांमध्ये जहांगीर आर्ट गॅलेरी, दि नेशनल गॅलेरी ऑफ मोडर्न आर्ट, दि देविड ससून लायब्ररी, मेक्स मुल्लर भवन, एल्फिन्स्टोन कॉलेज, दि कामा इन्स्टीट्यूट, दि एम सी घिया हाल, आणि राम्पार्ट रोडचा समावेश असतो. ह्या संपूर्ण भागामध्ये एक उस्तावाचे वातावरण ह्या आठ ते दहा दिवसात आपणास पहावयास मिळते. ह्या सगळ्यांमध्ये एक जत्रेचे स्वरूप आल्याचे जाणवते आणि त्यामुळे जत्रांमधून दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टाल्स (कले संदर्भातील) देखील येथे दिसून येतात.
हल्ली काही वर्षांमध्ये हा कला उत्सव काला घोडा आणि आजूबाजूच्या परिसरात पसरल्याचे देखील दिसून येत आहे आणि त्यामध्ये क्रोस मैदान, आझाद मैदान, होर्निमन सर्कल ह्यांचा देखील समावेश करण्यात येत असतो.
ह्या उस्तवाला मिळालेल्या उत्तम प्रतिसाद आणि यशामुळे ह्या उस्तवासोबतच इतर कला तथा सांस्कृतिक उत्सव देखील साजरे करण्यात येत असतात. हा काळ साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारीचा असल्यामुळे वातावरणात एक सुखद गारवा असतो, त्यामुळे सदर उस्तव जरी मोकळ्या जागेत आणि वातावरणात असला तरी, इतर वेळी असणार्र्या वातावरणाच्या त्रासाप्रमाणे ह्यावेळी तसा त्रास होत नाही, जसे, उष्ण किंवा पावसाळी वातावरण. ह्या उस्तवाच्या महिन्यामध्ये वातावरण अति उष्ण नसते, पाऊस पाण्याचा त्रास नसतो, उलट दिवस अखेर किंवा सूर्यास्त लवकर होत असल्यामुळे त्या गोष्टीचा फायदाच उस्तवप्रेमी जनतेला होत असतो, आणि त्यामुळेच येथे दिवसभर प्रचंड गर्दी दिसून येते व हा उस्तव यशस्वी होण्यास हातभार लावते. ह्याला गालबोट लागले आहे ते येथील रहिवाश्यांना होणार्र्या त्रासाचे. त्यांना ह्या आठ ते दहा दिवसात आवाजाचे प्रदूषण आणि प्रचंड गर्दीमुळे व त्यानंतर उस्तव संपला की उस्तावातील उरल्या सुरल्या वस्तूंमुळे अनाहूतपणे होणार्या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतो.
२०१३ च्या ह्या उस्तावला साधारणपणे १,५०,००० लोकं हजेरी लावतील असा अंदाज आहे. ह्यामध्ये ३५० कार्यक्रमांची रेलचेल असून, हा ९ दिवसांमध्ये विभागाला गेलेला आहे. सर्र्या जगभरातून येणार्र्या प्रवाशांनी ह्यासाठी अगोदरच ह्या तारखांची काला घोडा उस्तवाला येण्यासाठीची तिकिटे बुक करून ठेवली आहेत हे दररोज येथे हजेरी लावनार्र्या विदेशी प्रवाशांनी दाखवून दिले आहे. ह्या काला घोडा उस्तवातून निर्माण होणारा निधी हा ह्या उत्सवाच्या आजूबाजूच्या परिसराचा उत्कर्ष साधण्यासाठी वापरण्यात येणार आहे, कारण ह्या परिसरामध्ये बर्र्याच अशा इमारती आहेत की त्यांना हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेला आहे.

Sunday, November 18, 2012

योद्धा गेला, सम्राट हरपला, मराठ्यांचा वाली राहिला नाही, महाराष्ट्राचा कैवारी, यम राजानाही परत पाठविणारा यम जेती, असा कोणी जेता पाहिला नाही........!!!


योद्धा गेला, सम्राट हरपला, मराठ्यांचा वाली राहिला नाही
महाराष्ट्राचा कैवारी, यम राजानाही परत पाठविणारा यम जेती,
असा कोणी जेता पाहिला नाही........!!! 

अशी सार्थ बिरुदे मिरविणारे जनसामान्यांचे लाडके कै. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या निधनाची बातमी सार्र्या न्यूज चॅनेलनी दिली आणि सार्र्या देशात आणि परदेशात हाहा:कार उडाला. 




नेरूळ स्टेशन वरील रात्रौ ९ वाजताचे हे छायाचित्र स्पष्ट करते कि जसा ह्या स्टेशनात 

एकाद दुसरा माणूस तिकिटासाठी उभा होता

तशीच परििस्थती मुंबईतील इतर स्टेशनवर देखील दिसून येत होती. 






त्याचबरोबर रेल्वे कमपार्टमेंटमधूनही शुकशुकाटच जाणवत होता. 

ह्याची प्रचीती ह्या सोबतच्या छायाचित्रावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. 




माणसे घराबाहेर न पडल्यामुळे नेहमी प्रवाशांनी ओसंडून वाहणारी हि मुंबईची लाईफ

 लाईनआज प्रवाशांविना स्वतची जीवन वाहिनी हि ओळखच हरवून बसली होती.

 इतकेच नव्हे तर बहुतेक स्टेशनवर देखील अशीच दृश्ये दिसून येत होती. एरव्ही 

माणसाना पाय ठेवायला ज्या स्टेशनात आणि रेल्वे डब्ब्यांमध्ये जागा नसते तेथे, आज 

मोकळी जागाच जागा सर्वत्र दिसून येत होती. हा परिणाम होता तो माणसे आप-आपल्या 

घरी टी. वी. समोर बसण्याचा. बाळासाहेब आपण आमच्यातून गेलात काय पण 

सगळेचजन आपल्याच बातम्या ऐकण्यात गर्क झालेले दृश्य सगळ्या घराघरातून दृश्यमान 

होत होते. 







रस्ते सगळे ओस पडले होते. रस्त्यावरून तुरळकच गाड्या धावताना दिसत होत्या शिवाय 

माणसेही शोधून काढावी इतकी नगण्यच होती. बसेस रस्त्यावरून धावताना तर दिसत 

होत्या पण त्यात प्रवासीच नव्हते. 




अशी स्वयं घोषित बंदची िस्थती गेल्या कित्येक वर्षात दिसली नव्हती ती आज आपल्या 

जाण्यामुळे दिसून येत होती. काही जन तर आपल्या जाण्याने आपल्या घरचेच कोणी गेले 

आहे असे वागताना दिसत होते. काहीना अश्रू अनावर झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून ते 

बाहेर पडताना दिसत होते. त्यांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.

Monday, October 29, 2012

सिलिंडर न घेणारा देशभक्त - देशभक्तीची नवी व्याख्या......!!!


सिलिंडर न घेणारा देशभक्त - देशभक्तीची नवी व्याख्या......!!!

काय गम्मत आहे पहा ! काय तर म्हणे गॅस ग्राहकांना ‘देशभक्त’ बनण्याची नामी संधी चालून आलेली आहे. बरे हे कसे बरे व्हावे? तर त्यासाठी फक्त एवढेच करायचे की गॅस कंपन्यांना तुम्ही एक अर्ज करायचा व त्यावर लिहून द्यावयाचे की आम्हाला तुम्ही देत असलेला सवलतींच्या दरातील सिलिंडर नको. बस्स ! इतकेच. आहे की नाही गम्मत. किती साधी अन सरळ योजना आहे ही, आणि तुम्ही म्हणता ‘देशभक्त’ होण्यासाठी देशासाठी रक्त सांडावे लागते, अतिरेक्यांशी मुकाबला करावा लागतो, सामाजिक बांधिलकीची जपणूक करावी लागते, देशासाठी आणि देशाच्या कार्यासाठी वाहून घ्यावे लागते, हे साफ खोटे आहे, हे ह्यांनी वरील गोष्टीतून दाखवून दिलेले आहे. फक्त अर्ज करा, आणि तोही कशासाठी तर सवलतींचा गॅस सिलिंडर नको म्हणण्यासाठी अन व्हा ‘देशभक्त’. आहे की नाही ही अक्कल हुशारी. अशाप्रकारे कोणीही उद्या ‘देशभक्त’ म्हणून मिरवू शकतो आणि ‘देशभक्त’ म्हणून सरकरी सोयी-सुविधा मिळविण्यासाठी मोठ्या रुबाबात त्या मिळवू शकतो. मानायला पाहिजे ह्यांच्या ह्या अकलेला आणि अकलेशी काडीमोड घेतलेल्या अकलेच्या ह्या कांद्यांना.
ह्या साध्या दोन ओळी तुम्ही लिहून दिलात की, झालात की तुम्ही ‘देशभक्त’. वा ! फारच सुंदर कल्पना आहे मांडलेली ह्या पेट्रोलियम कंपन्यांनी आणि पेट्रोलियम मंत्रालयाने. किती साधे अन सरळ आहे हे काम, नाही का? अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखेच हे काम सोपे करून ठेवले आहे ह्या तथाकथित ‘देशभक्तीचा’ नारा पिटना-यांनी. इकडे अर्ज द्या, तिकडे देशभक्त व्हा. वा, काय शक्कल लढविली आहे ह्या बहाद्दरांनी. खुपच छान. असे जर ‘देशभक्त’ निर्माण झाले असते तर मग काय विचारता? सगळीकडे ‘देशभक्त’ अन ‘देशभक्त’च दिसले असते नाही का?
इतकेच करून हे भागवान थांबलेले नाहीत, तर त्यांनी पुढे असेही जाहीर करून टाकलेले आहे की, जो कोणी असे करेल, त्याला वी. आय. पी. सुविधा देण्यात येतील. आता हे वी. आय. पी. कोण? तर सवलतींचा सिलिंडर नाकारणारे तथाकथित, ह्यांच्या सांगण्याप्रमाणे करणारे लोकं.
हे लोकांना खुळे की वेडे समजतात? त्यांना कसे बरे वाटले की, असे लोकं लिहून देतील अन ताबडतोब ‘देशभक्त’ होतील? कोणतेही देशासाठी कार्य न करता, बलिदान न करता, फक्त ह्या तथाकथीताना लिहून दिल्यामुळे जर का लोकांना ‘देशभक्त’ होण्याची संधी हे जर देत असतील, तर लोकांनी ती अवश्य घ्यावयास नको का? घर बसल्या ‘देशभक्त’ होण्याची ही नामी संधी लोकांनी दवडता कामा  नये आणि त्याचबरोबर ‘देशभक्तांसाठी’ देण्यात येणा-या सोयी-सुविधा, सवलती जें जें म्हणून काही हे वाटायला निघाले आहेत ते सगळे, पदरात पाडून घ्यावयास हवे, नाही का? आयतीच संधी ह्या शहाण्यासुरत्या, अक्कल्बाज लोकांनी लोकांना उपलब्ध करून दिलेली असताना, ती सर्व-सामान्यांनी नाकारावी किंवा घेऊ नये असे कसे बरे आम्ही म्हणावे? घ्या बापडयांनो, ही संधी जरूर घ्या, आणि स्वताचे आणि सगळ्यांचे कोटकल्याण करून घ्या. अशी संधी पुन्हा मिळणे नाही. तर, मग घेणार ना ही ‘देशभक्त’ होण्याची संधी? आणि होणार ना ‘देशभक्त’. जरूर व्हा, ताबडतोब व्हा. एकदा का ही संधी तुम्ही गमावलीत, तर पुन्हा अशी संधी तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात सापडायची नाही. तर मग घेताय ना, ही संधी?
मयुर तोंडवळकर – 9869704882/9869450934

Saturday, October 27, 2012

भ्रष्ट्राचारावर रामबाण.......!!!


भ्रष्ट्राचारावर रामबाण.......!!!

कॉंग्रेस काय आणि भाजप काय,
सगळे राजकारणी सारखेच हाय,
अंगाशी येता भ्रष्टाचाराची प्रकरणं
रिंगणातून काढती तत्काळ पाय.........!!

साऱ्या देशभर आलीय भ्रष्टाचाराची लाट,
कोण कोणाची थोपटणार पाठ,
सगळ्यांच्या शिरावर घोटाळ्यांचे ओझे,
जो तो म्हणे हे नसे माझे..........!!

झटकली जबाबदारी, हे झाले मोकळे,
ह्यांच्यावर कार्यवाही करणारे मात्र थकले,
कारण ह्यांना सामील, सरकारी यंत्रणा,
कायद्यातील पळवाटा, ही त्यांची मंत्रणा ........!!

करणार कोण ह्यांना कायमचे शासन?
हे तर आहेत २१ व्या शतकातले रावण,
ह्यांना हवा आहे तो पुरुषोत्तम राम,
जो ह्यांना करायला लावील राम, राम.......!!

राम जर सोडील अपुला धनुष्यबाण,
तोच असेल शेवटचा रामबाण,
त्यासाठी उत्पन्न व्हावा लागेल २१व्या शतकातला राम,
तरच ह्या भ्रष्टाचारी राजकारण्यांवर घालता येईल लगाम......!!!
                        घालता येईल लगाम......!!! 

Wednesday, October 17, 2012

नव रात्रीचे नऊ रंग........!!!!!


नव रात्रीचे नऊ रंग,
प्रथमेचा लाल,
सुरुवात करा नऊ रात्रींची
उधळूनी गुलाल......!

दुस-या दिनीचा रंग निळा,
देई मनाला शांती,
निळ्या निळ्या भरजरी शालुत,
फुलून उठे सौभाग्याची कांती.......!

तृतीयेचा रंग पिवळा,
दिसत असे सोपा अन साधा,
आठवण करून देत असे,
मी आहे मात्र सोवळा.......!

चतुर्थीचा रंग हिरवा,
तरुणाईला वाटे बरवा,

भुरकट रंग पंचमीचा,
स्त्रियांच्या भारी आवडीचा......!

षष्टीचा रंग केशरी,
ललनांना भावतो भारी,

पांढरा रंग सप्तमीचा,
ल्यायल्यावर उठोनी दिसे सादगी......!

अष्टमीचा रंग गुलाबी,
अधरांची खुलवतो कळी,

नवमीचा रंग जांभळा,
गाली खुलवतो छोटीशी खळी.......!!!

Monday, September 24, 2012

सार्वजनिक गणपतींचे वास्तव......!!!


सार्वजनिक गणपतींचे वास्तव......!!!
लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणपती उत्सव चालू केला होता, त्यामागील कारण होते जनजागृती आणि जनजागृतीतून, परदेशी जोखडातून समस्त भारतीयांची muktatमुक्तtता. त्यावेळी इंग्रजांनी सर्वत्र बळाच्या जोरावर समस्त हिंदुस्तानी जनतेची मुस्कटदाबी केलेली होती. बाहेरून आलेले हे परकीय येथील स्वकियांवर इतके हावी झालेले होते की जनसामान्यांना त्यांच्याविरुद्ध ‘ब्र’ देखील काढायची भीती होती. अशा या भयंकर परिस्थितीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी नामी उपाय शोधून काढला व तो म्हणजे सार्वजनिक गणेशोस्तव. आपणा समस्तांस विदित आहेच की त्यावेळेस गणपती हा फक्त घराघरातून पूजिला जायचा. त्यामुळे टिळकांनी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व समस्त भारतीयांना एकत्र आणण्यासाठी हा उत्सव सार्वजनिक रीतीने साजरा करून जनजागृतीचा हा वसा त्यावेळेस उचलला होता.
परंतु आता व्यापारीकरण एवढे झाले आहे की या उत्सवाच्या माध्यमातून जमेल तेवढे व जमेल तसे य उत्सवाचे बाजारीकरण म्हणा किंवा व्यापारीकरण म्हणा सुरु झालेले आहे व तो आता दृश्य स्वरुपात व राजरोसपणे लोकांपुढे मांडला जात आहे. याची ताजी उदाहरणे म्हणजे य गणपती उत्सवात कोणी आपला गणपती राजा आहे म्हणून संबोधतो तर कोणी त्यास महाराजा आहे असे म्हणतो, कोणी त्यास नवसाला पावणारा आहे म्हणून जाहिरात करून लोकांना आकार्शिण्याचे काम करतो, तर कोणी त्याला निरनिराळ्या माध्यमांच्या स्वरुपात जनतेसमोर पेश करून त्याचे भांडवल करीत असतो, जसे, अमुक तमुकचा राजा, महाराजा, नावाने ओळख निर्माण करून आता त्याचे कायदेशीर हक्क म्हणजेच पेटंट / ट्रेड मार्क घेण्याचा मार्गावर हे लोकं आहेत, तर कोणी आपला बाप्पा कसा आकर्षित होईल ह्यासाठी जीवाचा आटापिटा करून त्याला वेगवेगळ्या स्वरुपात लोकांसमोर आणण्याचे काम करीत आहेत, जसे, आता एका नामांकित चोकलेट निर्मात्या कंपनीने एका मॉलमध्ये चक्क त्यांच्या चोकलेटच्या गोळयांचाच गणपती बनवून लोकांना विशेषकरून बच्चे कंपनीला आकर्षित केलेले आहे. या अगोदर काहीजणांनी या गणपतीला नारळाच्या किशीपासून,] सुपारीच्या फळांपासून, केल्यांपासून, ते चक्क मोत्यांच्या मान्यांपासून, काजुगारापासून, अशा वैविध्यतेणे नटविले होते व लोकांना आकर्षित देखील केले होते.
एकंदरीतच काय टिळकांचा सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याचा जो उद्देश्य होता, तोच मुळी पायदळी तुडवून, या उत्सवाला बाजारीकरणाचे सवरून प्राप्त करून दिलेले आहे आणि त्यातून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा घाट घातलेला आहे. हे करता करता ही मनसे यामध्ये इतकी गर्क झालीत की अनवधानाने कां होईना - वरील चित्रात ते वास्तव दृष्टोपत्तीस आले आहे.
या चित्राकडे तुम्ही जर बारीक लक्ष देऊन पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की संपूर्ण गणेशाचे छबीमध्ये कुठेही उणेपणा नाही. परंतु वास्तव हे आहे की त्याच्या पायाजवळ जी दानपेटी ठेविलेली आहे, त्यावर असा उल्लेख आहे की – उपनगराचा राजा आणि त्या खालोखालाच लिहिलेले आहे दानपेटी. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उपनगराचा म्हणा किंवा मुंबईचा म्हणा हा जो कोणी राजा आहे, तो गणपती नसून, ही दानपेटी आहे असे प्रतीत होते आणि हे किती भयानक वास्तव आहे ह्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
एकंदरीतच आजचा गणपती उत्सव पाहता हे सत्य नाकारता येत नाही की आजचा राजा हा गणपती नसून, ही दानपेटीच आहे. ज्याचावर हा समस्तांचा, सर्वच गणेशोस्तव मंडळांचा हा खेळ उभा आहे. आज पैशालाच किंमत आहे ज्याच्याजवळ तो आहे, त्याचीच सद्दी आहे. तो करील ती पूर्व दिशा आहे.
आपण नेहमी वर्तमानपत्रातून वाचतो की या गणेशोस्तवामध्ये कोट्यावधींची उलाढाल या दहा दिवसात होत असते. यावरून कल्पना येईल की जरी जनतेसाठी हा गणपती उत्सव असला तरी काही लोकांसाठी तो उत्सव किंवा सण न राहता व्यापार झालाय. त्याच्याकडे ते व्यापारी दृष्टीकोनातूनच पहात असतात व वर्षभर जेवढी मेहनत करून आर्थिक लाभ मिळणार नसतील, तेवढे ते आर्थिक लाभ या दहा दिवसात कमावित असतात.
पूर्वीसारखे देखावे, समाज प्रबोधन करणारी दृश्ये, त्या अनुषंगाने येणारे सामाजिक सेवेचे भान ठेवलेले कार्यक्रम आता हळू हळू लोप पावत चाललेले असून, त्यांची जागा आता व्यापाराने घेतलेली आहे. याला काही अपवाद आहेत म्हणा, परंतु एकंदरीतच मोठ्या स्वरुपात याचे बाजारीकरण झालेले आपल्या दृष्टोत्पत्तीस पडते, हे सत्य नाकारता येत नाही.
मयुर तोंडवळकर – 9869450934 / 9869704882

अनगडवाणी