Wednesday, November 3, 2010
Sunday, October 31, 2010
सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने
Wednesday, October 20, 2010
ध्यान
Tuesday, October 12, 2010
सत् भक्तीचे स्वरूप
हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गाप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे. पण दोन्ही टोके सांभाळायची. आपण जाणताच हाताच्या बाजू दोन. एक उजवी अन् दुसरी डावी. त्या दोन बाजुमध्ये उजवा गट भक्ती अन् डावा गट तामस, हटयोग, प्राणायाम ही तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी ही सर्व तामस लोकांची उपासना. अन् भक्तियुक्त उपासना कोणती तर अखंड नाम ! त्या परते दुसरे काही नाही. जे सत् पदाने अखंड नाम सत् पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शनयुक्त राहणे, हेच त्याचे मर्म !! अशा स्थितीत राहिले ते ऋषी-मुनी, ब्रह्मऋषी, सप्तऋषी आणि त्यांची गुरुकुले !! अन् या चौकट मुनींच्या कोपीष्ट मुनींची, तामस मुनींची गुरूकुले त्यात शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन् त्यांची गुरुकुले, राक्षस. अघोर ज्यांना संजीवनी मिळाली होती. ही वेगळी चाकोरी आणि भक्ती ही वेगळी चाकोरी. तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मऋषी, सप्त ऋषी यांचा ताफा मात्र लहान होता. परंतू तेजस्वी होता, तेजोबलासहित होता. याचे कारण सत् कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या ! सत् त्यानाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे की मी तुमच्या बरोबर आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती, सत् आणि तामस असलेले लोक हे त्यांचेच भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त. तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी ! म्हणजेच भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग. भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे. त्यात काटे कुटे खाच खळगे काही नाही. परंतु तामसी वृत्तीच्या मार्गात काटे कुटे, खाच खळगे सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात ! परंतू भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे. आता आपण जाणताच की वेगवेगळी शुद्धीकरणे आपण पहिली, अनुभवली. या शुद्धीकरणात आपणा सर्वाना हे कळून चुकले होते की अघोरांकडे वेगवेगळे वरद् हस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्ठी होत्या.
Urgent opening.
Dear Friends,
I have following urgent openings in 100% Export Oriental Unit which is private limited in Pune.
Need dedicated and hardworking candidates.
Job are full time in nature
Following are the details.
- Store In-charge - 1 post - Min Qualification - 12th Pass & above
- Store Assistant - 1 post - min Qualification - 12th Pass
- Office Administrator - 1 post - minimum -12th Pass
- Office Boy - 1 post - 10th pass
Basic requirement
- Computer minimum knowledge is must
- English literacy - read and write is must, speaking will be optional.
Salary would be decide based on Candidate profile and his presence during interview.
Accommodation can be provided for outskirt and selected candidates (optional)
Candidate who is interested can send latest updated resume / CV on mazagaonmazadesh@gmail.com
After scrutiny, respective candidate will call for an interview with suitable time.
--
आभारी,
दीपक बिनेकर
माझं गाव माझा देश
--
आभारी,
दीपक बिनेकर
माझं गाव माझा देश
मेरा गाँव मेरा देश
My Villages My Country.
A Social organisation for building of India.
Saturday, September 18, 2010
विद्ध्येमुळे मिळालेली कीर्ती हीच खरी कीर्ती होय.
आर्य चाणक्य
Mayur Tondwalkar
Wednesday, September 1, 2010
Mobile Tracker Facility !!!
If u loses your mobile in India, you can get it back
Got an interesting fact to share... Nowadays each one of us carries Hi-Fi Mobile devices and always fears that it may be stolen.
Each mobile carries a unique IMEI i.e. International Mobile Identity Number which can be used to track your mobile anywhere in the world.
This is how it works!!!!!!
1. Dial *#06# from your mobile.
2. Your mobile shows a unique 15 digit.
3. Note down this no anywhere but except your mobile as this is the no which will help trace your mobile in case of a theft.
4. Once stolen you just have to mail this 15 digit IMEI no. to cop@vsnl.net
5. No need to go to police.
6. Your Mobile will be traced within next 24 hrs via a complex system of GPRS and internet.
7. You will find where your hand set is being operated even in case your no is being changed.
PASS ON THIS VERY IMP MESSAGE TO ALL YOUR FRIENDS AND RELATIVES.
If you lose your mobile, send an e-mail to cop@vsnl.net
with the following info..
Your name:
Address:
Phone model:
Make:
Last used No.:
E-mail for communication:
Missed date:
IMEI No.:
Tuesday, August 31, 2010
Saturday, August 21, 2010
गुरूचा महिमा !!!
तुमचा खरा गुरू तुमच्या ठायीच आहे. तुम्हाला त्याच्या घरी येण्याची वाट दाखवायला तो उत्सुक आहे. त्याच्या आज्ञेत राहूनच आपण आयुष्यात चांगलं काही करू शकतो. प्रार्थना करणं, ध्यान करणं, पवित्र राहून दानधर्म करणं हा आपल्या कर्माची थकबाकी चुकवण्याचा, आपलं कर्म भोगून संपवण्याचा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
...........................................................................................................................
कठीण परिस्थितीतून जाणारे लोक ब-याचदा आकाशाकडे पाहून, गुरूला किंवा देवाला दोष देतात आणि म्हणतात, माझ्याच वाट्याला हे दु:ख का आलं आहे? पण प्रत्यक्षात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, त्यांच्यावरील गुरू किंवा देवाच्या प्रेमामुळेच त्यांच्यावर ही कठीण परिस्थिती (आलेली नसून त्यांच्या पूर्व जन्माचे ते सुकृत आहे.) या परिस्थितीच्या रूपानं त्यांना 'स्वच्छ' केलं जातंय. अंगाला लागलेली घाण साफ करावी, तसं त्यांच मन, अंतरंग स्वच्छ केलं जात आहे. त्यांची शुश्रूषा केली जात आहे. जर त्यांना स्वच्छ होण्याच्या या प्रक्रियेतून जाताना मनोमन उमगलं की, त्यांच्या देवाचं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे की, त्याला त्याच्यावरील सारा चिखल, सारी घाण धुवून टाकून त्यांना स्वत:जवळ नेण्याची इच्छा आहे, तर ते जगणं मौजेचं होईल नाही का?
शुद्ध सोनं मिळविण्यासाठी सोन्याला अधिक दाहक आगीतून काढावं लागतं. शुद्ध पाणी हवं असेल तर उकळून घ्यावं लागतं. ही मोठी सुखकर क्रिया नव्हे. प्रत्येक गोष्टीला शुद्ध आणि पवित्र बनण्यासाठी त्याच्या स्वत:च्या अशा विस्तवातून जावं लागतं. सितामाईला नाही का अग्नीदिव्यातून जावे लागले?
कल्पना करा, दोन मुलं मातीत खेळत आहेत. दोघांनाही इजा झालेली आहे. त्यातल्या एका मुलाची आई मुलाला गरम पाण्यानं स्वच्छ करते. जिथं मुलाला लागलं आहे, तो भाग जंतुनाशकानं स्वच्छ करते. त्या जंतुनाशकानं त्या मुलाला नक्कीच झोंबेल. ते मूल वेदनांनी ओरडेल. यातनांनी रडेल. कदाचित् आईवर ओरडेल. परंतु, ती माऊली काळजावर दगड ठेवून मुलाच्या जखमा साफ केल्यावाचून राहणार नाही. कारण तिच्या हृदयात आपल्या मुलांबद्दलचं खरंखुरं प्रेम असतं.
परंतु, दुसरं मूल अजूनही घाणीत खेळत असतं. त्याच्या जखमेवर कुणी औषध लावत नाही. या दोघा मुलांमध्ये फायदा कोणाचा आहे?
वास्तविक सर्व समस्यांची उत्तरं, प्रत्येक माणसापाशीच असतात. त्या माणसाला फक्त शांत राहून अंतर्मनाचा मागोवा घ्यायचा असतो. आपल्या श्वासावर चित्त केंन्द्रित करा आणि हळुहळू आपल्या खऱ्या घराकडे प्रवास सुरू करा. त्यासाठी कोणत्याही माध्यमाची, आश्रमाची, पुस्तकांची, खोट्या गुरूची आपल्याला गरज नसते. गरज असते, फक्त विश्वासाची. तुमचा खरा गुरू तुमच्या ठायीच आहे आणि तुम्हाला आपल्या घरी नेण्याची वाट दाखवायला उत्सुक आहे.
तुम्ही शांत बसा, डोळे मिटून घ्या, सारे विचार बाजूला सारा, तुमचं चित्त श्वासावर केंन्द्रित करा. तुम्हाला जाणीव होईल की, तुम्ही म्हणजे तुमचा मूतिर्मंत श्वासच झाला आहात. तुमच्या श्वासाबरोबर तुम्ही अशा दुनियेत पोहोचला आहात, जिथं प्रसन्नता, शांतता, आध्यात्मिकता, ऋषी आणि साक्षात्कारी महापुरुषांचं राज्य चालतं. तुमची सारी उत्तरं तुमच्या ठायीच आहेत. ती बाहेर नाहीत. ऊर्जावलयं, चक्र, अतिमानवी, नवं जग, सारे भपकेबाज शब्द विसरा. आधी प्राथमिक शब्दाशी संपर्क साधा, हा शब्द आहे, शून्याची पोकळी. त्या शून्याच्या पोकळीतच तुम्हाला जगाचा निर्माता भेटेल. त्यानं सारं काही शून्यातून उभं केलं. त्याच्यापाशी पोहचायला तुम्हाला शून्याच्या पोकळीकडे वाटचाल केली पाहिजे.
आपण शून्याकडे जायला वेळ लावतो. का? उत्तर सोपं आहे. जर तुम्ही कोडं निर्माण केलंत, तर ते सोडवायला खूप कठीण पडेल. खरंतर कोडं सोडवायला अगदी सोपं असतं. पण आपण घेतलेला प्रत्येक मार्ग, प्रत्येक पाऊल आपल्याला त्या सोपेपणापासून दूर, गहनतेच्या जाळ्याकडे घेऊन जातं. आपण उत्तरापासून दूर दूर जाऊ लागतो. देव साधा आहे, इतर सारं गहन आहे. तुम्ही साधेपणा, पावित्र्य यांच्याकडे वळा. त्याद्वारे देवस्वरूप बना. ध्यान आणि प्रार्थनेनं माणूस फक्त कर्माचं किल्मिषच जाळून टाकत नाही, तर त्यामुळे संरक्षक कवचही निर्माण होतं. एकतर प्रार्थनेमुळे संकट टळेल किंवा नशिबात लिहिलेलं संकट स्वीकारण्यासाठी माणसाला बळ, शहाणपण आणि प्रेम लाभेल. हे संकट उमदेपणानं, आनंदानं आणि समर्पणाच्या भावनेनं स्वीकारता येईल.
आयुष्यात माणूस सर्वांत चांगलं जे करू शकतो, ते म्हणजे, प्रार्थना करणं, ध्यान करणं, पवित्र, मृदू आणि दयाळू राहून दानधर्म करणं. आपल्या कर्माची थकबाकी चुकवण्याचा, कर्म भोगून संपवण्याचा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रार्थना, ध्यानधारणा आणि देवानं आपल्यासाठी योजलेल्या साऱ्याचा सकारात्मक भावनेनं केलेला स्वीकार.
गुरूला पूर्ण शरण जाणं म्हणजेच देवाशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग. देता येईल तेवढं द्या, देत राहा... जमेल तेवढं देत राहा. गरीब माणूस फारसे पैसे देऊ शकणार नाही. पण तो किंवा ती एक चांगलं माणूस बनू शकतील. कुटुंबीय, मित्र आणि शक्य तेवढ्या सर्वांना मदत करू शकतील. एक चांगलं माणूस बनून, तुम्ही सवोर्त्कृष्ट प्रकारचा दानधर्म करत राहाल.
........................................................................................
(लेखकाच्या 'द फकीर' (रूझबेह एन भरूचा ) (अनुवाद: सुनीती काणे) या पुस्तकातील अंश) सौजन्य : लोकसत्ता
Mayur Tondwalkar
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...



